शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

चक्क ऐंशीव्या वर्षी निवृत्त प्राध्यापकाने मिळविली पीएच. डी.

By प्रशांत बिडवे | Updated: April 7, 2023 13:20 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सहकाराच्या इतिहासावर केले संशाेधन

पुणे : काेणतेही काम अडले की माणूस वयाचा दाखला देत विषयाला बगल देताे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तळमळीतून सेवानिवृत्तीनंतर बारा वर्षांनी एका निवृत्त प्राध्यापकानेज्येष्ठ नागरिक काेट्यातून संशाेधनासाठी विद्यापीठात नाेंदणी केली आणि चक्क वयाच्या ऐंशीव्या वर्षी इतिहास या विषयात डाॅक्टर ऑफ फिलाॅसाॅफी ‘पीएच. डी.’ ही पदवी संपादित केली.

प्रा. डाॅ. वसंत गाेपाळराव ठाेंबरे (वय ८०, रा. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे पीएच. डी. पदवी संपादित केलेल्या ज्येष्ठ संशाेधकाचे नाव आहे. बी. ए. उत्तीर्ण झाल्यानंतर १९६५ साली तत्कालीन पुणे विद्यापीठात एम. ए. इतिहास वर्गात प्रवेश घेतला. विभागाच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी असल्याची आठवणही त्यांनी सांगितली. त्यानंतर वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात १९६८ ते २००३ या कालावधीत इतिहास विषयाचे अध्यापन केले. गंगापूर येथील मुक्तानंद काॅलेजमध्ये १९९४ ते १९९६ या काळात प्राचार्य म्हणून काम केले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मनात कुतूहल हाेते. त्यांचे प्रश्न साेडविण्यासाठी ज्या व्यक्तीने सहकाराच्या माध्यमातून देशात पहिल्यांदा प्रयत्न केले त्यांचा अभ्यास करणे तसेच सद्यस्थितीत या प्रश्नांवर काय उपाय शाेधता येतील का? या विचारातून हा विषय निवडला. ज्येष्ठ नागरिक काेट्यातून पीएच. डी.ची संधी उपलब्ध करून देत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१५ मध्ये निवड केली. ‘डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे सहकार क्षेत्रातील याेगदान : एक चिकित्सक अभ्यास १९०१ ते १९८०’ हा विषय संशाेधनासाठी घेतला. त्यासाठी डाॅ. ए. एस. विद्यासागर यांनी मार्गदर्शन केले. गत सात वर्षे संशाेधन करत संशाेधन प्रबंध सादर केला. दि. ५ एप्रिल २०२३ राेजी विद्यापीठाने पीएच. डी. पदवी बहाल केली.

डाॅ. ठाेंबरे म्हणाले, संशाेधनातून सहकार क्षेत्रात सुधारणेसाठी काही उपायही सांगितले आहेत. शेतकऱ्यांना ४ टक्के व्याजाने कर्ज द्यावे. पतसंस्थांची कर्ज बुडविणाऱ्यांवर कारवाई व्हावी. शेतीच्या मशागतीसाठी भाड्याने यंत्र पुरवावे, राज्यातील विक्री झालेल्या सहकारी कारखान्यांची केंद्राने चाैकशी करावी आणि पतसंस्थांना संजीवनी द्यावी.

भारतीय शेती मान्सूनचा जुगार

अनेक संदर्भग्रंथांचा अभ्यास केला. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकारावर आयाेजित केलेल्या परिषदांची कागदपत्रेही अभ्यासली. भारत कृषिप्रधान देश आहे. मात्र, सिंचनात अपेक्षित वाढ झाली नाही. सिंचनासाठी हिमालय ते कन्याकुमारी असा कालवा तयार करावा, भारतीय शेती हा मान्सूनचा जुगार आहे आणि सहकार वाढविणे हाच त्यावर पर्याय आहे. सहकार टिकला तर शेतकरी, कामगार आणि समाजातील दुर्बल घटक जगेल. - डाॅ. वसंत ठाेंबरे, ज्येष्ठ संशाेधक

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणSocialसामाजिकSenior Citizenज्येष्ठ नागरिकProfessorप्राध्यापक