शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आषाढी वारी : माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी संबंधित ५० व्यक्तींनाच दिला जाणार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 18:10 IST

तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चल पादुकांचे उद्या प्रस्थान ; पोलीस बंदोबस्त तैनात

ठळक मुद्देशनिवारी पहाटे चार ते साडेपाच वाजता माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक व आरती एकूण सतरा दिवसांसाठी आजोळघरातच माऊली मुक्कामी असणारयाठिकाणी अवघ्या पाच लोकांच्या उपस्थितीत सतरा दिवस कीर्तन आणि जागरचा कार्यक्रम

शेलपिंपळगाव : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीच्या १९० व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी सज्ज झाली आहे. शनिवारी (दि. १३) सायंकाळी चारच्या सुमारास शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून तसेच पन्नास लोकांच्या उपस्थितीत माऊलींच्या चांदीच्या चल पादुकांचे प्रस्थान होणार आहे. तत्पूर्वी माऊलींचे मंदिर, भक्त निवास व परिसराचे निजंर्तुकीकरण करण्यात आले आहे. प्रस्थान सोहळ्याला परवानगीशिवाय मंदिरात कोणालाही प्रवेश देण्यात येणार नसून सुरक्षेच्या कारणास्तव शहरात सुमारे शंभराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.            माऊलींच्या पादुकांचे प्रस्थान सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ वद्य अष्टमीला अर्थातच शनिवारी (दि.१३) पहाटे चार ते साडेपाच वाजता माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व आरती होईल. दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान माऊलींना नैवद्य दाखविला जाईल. नंतर दुपारी चारला प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरूवात होईल. मोजक्या ब्रम्हवृंदाच्या हस्ते माउलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख केला जाईल. त्यानंतर माउलींची व गुरू हैबतबाबांची आरती होईल.

          देवस्थानच्या विश्वस्तांकडून माउलींच्या पादुका परंपरेनुसार पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हातात दिल्या जातील. त्यानंतर चलपादुकांचे प्रस्थान होईल. वीणा मंडपातून पादूका बाहेर आणल्यानंतर मंदिर आवारातून प्रदक्षिणा होईल. त्यानंतर देऊळवाड्याच्या दरवाजाने पादुका लगतच्याच आजोळघरात विराजमान केल्या जातील. समाजआरती झाल्यावर जागर सुरू होईल. एकूण सतरा दिवसांसाठी आजोळघरातच माऊली मुक्कामी असणार आहेत. याठिकाणी अवघ्या पाच लोकांच्या उपस्थितीत सतरा दिवस कीर्तन आणि जागरचा कार्यक्रम पार पाडला जाईल. त्यानंतर राज्य सरकार आदेशानुसार आषाढ शुद्ध दशमीला (दि. ३० जून) माउलींच्या चल पादुका हेलीकॉप्टर अथवा बसने पंढरपूरला विठुरायाच्या भेटीला घेऊन जाणार आहेत.                 दरम्यान राज्य शासनाच्या आदेशानुसार मुख्य मंदिर बंद आहे. त्यामुळे प्रस्थान सोहळ्यास परवानगी शिवाय कोणीही येऊ नये असे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड. विकास ढगे - पाटील यांनी सांगितले. .................. शहराला जोडणाऱ्या चारही प्रमुख मार्गांवर पोलीस तैनातमाऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला संबंधित परंपरेने आवश्यक असे मोजकेच मानकरी, सेवेकरी तसेच रथापुढील २७ व रथामागील २० दिंड्यापैकी केवळ पुणे भागातील दिंड्यांच्या मोजक्याच प्रतिनिधींना प्रवेश दिला जाईल. दरम्यान मंदिरात प्रवेश करणाऱ्यापूर्वी संबंधितांना थर्मल स्कॅन व सॅनिटाईज करून मास्क लावल्यानंतर त्यांना मंदिरात घेतले जाईल. वारकऱ्यांना मंदिरात संस्थानतर्फे सॅनिटाईज केलेले टाळ, मृदुंग व पताका दिल्या जातील. दरम्यान शहराला जोडणाऱ्या चारही प्रमुख मार्गांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत............................. प्रस्थानच्या दिवशी मंदिरालगतची सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश  माऊली मंदिर परिसर कंटेन्मेंट झोनलगत असल्याने प्रस्थानपूर्वी माऊलींचे संपूर्ण मंदिर, भक्त निवास तसेच परिसर स्वच्छ करून निजंर्तुक केला आहे. तर नगरपालिकेने परिसरात औषध फवारणी केली आहे. विशेष खबरदारी म्हणून प्रस्थानच्या दिवशी मंदिरालगतची सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश नगरपालिका प्रशासनाने जारी करण्यात आल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारी