शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Ashadhi Ekadashi 2018 : माऊलींना निरास्नान : पुण्याची सीमा ओलांडली, साता-यात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 19:25 IST

टाळ-मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी वारीने पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने नीरा स्नानानंतर आज शुक्रवारी सातारा जिल्ह्यात प्रवेश केला.

नीरा : टाळ-मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी वारीने पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने नीरा स्नानानंतर आज शुक्रवारी सातारा जिल्ह्यात प्रवेश केला.पालखी सोहळा सकाळी साडेसहा वाजता रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हानगरीचा निरोप घेऊन सोहळा वैभवी लवाजम्यासह लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. सकाळी नऊ वाजता न्याहरीसाठी पिंपरे खुर्द येथील अहिल्याबाई होळकर विहिरीच्या समोर विसावा घेतला. पिंपरे ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ग्रामीण भागातील झुणका-भाकर, वेगवेगळ्या चटण्या, ताज्या रानभाज्या अशी शिदोरी घेऊन आले होते. अर्धा तासाच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा दुपारच्या भोजनासाठी व विश्रांतीसाठी नीरेकडे मार्गस्थ झाला.

       नीरा नदीच्या किनाऱ्यावर निसर्गरम्य पालखीतळावर हा सोहळा साडेअकरा वाजता पोहचला. नीरा पंचक्रोशीतील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.

          नीरा हिवरा पडता दृष्टी,   स्नान करिता शुद्ध सृष्टी !          अंती तो वैकुंठप्राप्ती, ऐसे परमेष्ठी बोलिला !

           दुपारच्या भोजन व विसाव्यानंतर दुपारी दिड वाजता हा सोहळा नीरास्नानासाठी मार्गस्थ झाला.  नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिश कालीन पुलावरून मंद गारवार अंगावर घेत, नगारखान्याची बैलगाडी, दोन अश्व, टाळकरी, झेंडेधारी, भगवी पताका खांद्यावर घेत वारकरी मार्गस्थ झाले. पैलतीरावर हैबतबाबांचे वंशज राजाभाऊ अरफळकर आणि सोहळा प्रमुखांच्या हातात विश्वस्तांच्या उपस्थितीत माऊलींच्या पादुका देण्यात आल्या. यावेळी माऊलींच्या पालखीरथाचे सारथ्य गणेश हुंडरे यांनी केले. 'माऊली माऊलीच्या' नामाच्या जयघोषात पालखी सोहळ्यातील रथाचे मानकरी व सोहळ्यातील मान्यवरांच्या समवेत पादुका प्रसिद्ध दत्त घाटावर आणण्यात आल्या.  'माऊली माऊलीच्या' गगनभेदी जयघोषात व टाळ-मृदंगाच्या गजरात माऊलींच्या पादुकांना भक्तीमय वातावरणात शाहीस्नान घालण्यात आले. स्नानानंतर पावसाने हजेरी लावल्याने परीसर ओला चिंब झाला. यंदा पाऊस अल्पशा प्रमाणात झाला आहे. त्यामुळे नदीपात्रात मागील आठवड्यात कमी प्रमाणात पाणी होते. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात आणि नीरा डाव्या व उजव्या कालव्यातून जादा पाणी सोडले होते. त्यामुळे नीरास्नानाचा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSatara areaसातारा परिसर