शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

वाहने कमी होतील म्हणून पुणे मेट्रो, मग वेगळा रस्ता कशासाठी करायचा? आदित्य ठाकरेंचा सवाल

By श्रीकिशन काळे | Published: May 06, 2023 5:07 PM

परदेशात देखील अर्बनायझेशन झाले पण त्यामध्ये पार्क, हिरव्या जागा, बागा आहेत तसे प्लान आपण करायला हवेत

पुणे: एकीकडे पुण्यात मेट्रो आणली आहे. त्याने वाहने कमी होतील, असे तेच म्हणत होते, मग वेगळा रस्ता कशासाठी करायचा? असा सवाल ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. शहरातील वाहने वाढत असतील तर ती कमी करण्यासाठी पीएमपी सक्षम करायला हवी. त्याने व मेट्रोने वाहने कमी कशी होतील, ते पहायला हवं. परदेशात देखील अर्बनायझेशन झाले आहे. पण तिथे अर्बनायझेशन मध्येही पार्क, हिरव्या जागा, बागा आहेत. तसे प्लान आपण करायला हवेत. मोबॅलिटी प्लान करून समस्या सोडवावी असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

आदित्य ठाकरे हे वेताळ टेकडीवर आज दुपारी पाहणी करायला आले होते. त्यांनी येथे होत असलेल्या प्रकल्पाविषयी माहिती घेतली‌. रस्ता कुठून जाणार आहे आणि त्यात किती झाडे कापली जातील, ते समजावून घेतले. यावेळी सुमिता काळे, प्राजक्ता दिवेकर, सचिन बहिरट, प्रदीप घुमरे, बाबा सय्यद, गौरी मेहेंदळे, राजकुमार खडके, पृथ्वीराज लिंगायत, परेश लोढा, योगेश आळंदकर, सारंग‌ यादवाडकर आदी उपस्थित होते. 

ठाकरे म्हणाले, वेताळ टेकडी असो किंवा नदीकाठ सुधार योजना यामुळे बेताल विकास सुरू आहे. शाश्वत विकास करणे आवश्यक आहे. अर्बनायझेशन वाढले म्हणजे कसेही रस्ते काढणे नव्हे, मोबॅलिटी प्लान करून योग्य तो निर्णय घ्यायला हवा, जगभरात अर्बनायझेशन झालेल्या शहरात उद्याने, पार्क आहेत, तसे आपल्याकडे व्हायला हवे.  मी पुण्यात होत असलेल्या वेताळ टेकडीवरील आणि नदीकाठ सुधार प्रकल्पाविषयी माहिती घेतली. सध्या जनतेच्या विरोधात हुकुमशाही सुरू आहे. कोणी सत्य बोललं की त्याला अॅक्टिव्हिस्ट बोलून टीका केली जाते. खरंतर नदीकाठ सुधार जो प्रकल्प सुरू आहे, त्याबाबत माहिती घ्यायला हवे की सर्व नद्या सारख्या नसतात. अगोदर नदीची स्वच्छता करायला हवी, मग सुशोभीकरणाचे पहायला हवे. बाहेरील सल्लागार शहराविषयी काहीही सल्ला देतात आणि वाट लावतात, स्थानिक लोकांना याविषयी समजून घ्यायला हवे. त्यांना तिथली अधिक माहिती असते. माहिती अधिकारात आलेल्या माहितीमध्ये आणि राजकीय नेते यांच्यातील माहितीत तफावत आहे. प्रकल्पाची परवानगी घेताना झाडं कापणार नाही, असे सांगितले होते. पण नंतर सात हजार झाडं कापली जाणार असे सांगितले गेले. ही दिशाभूल केली जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेenvironmentपर्यावरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMetroमेट्रो