शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

Arogya Bharati : 'टोपे साहेब, एका बेंचवर दोन विद्यार्थी बसवले, हेच का तुमचे नियोजन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 21:18 IST

Arogya Bharati : राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर नियोजनशून्य कारभारा पाहायला मिळाला. त्यामुळे, परीक्षार्थींनी आपला संताप व्यक्त केला आहे. पुण्यात अबेदा इनामदार कॉलेज येथे बऱ्याच मुलाना हॉल तिकीटचा नंबर मिळाला नाही.

ठळक मुद्देआज समितीच्या ट्विटर हँडलवरुन आरोग्य भरतीसंदर्भातील अनेक चुका स्पष्टपणे दाखवून देण्यात आल्या आहेत. 

राज्य शासनाने आरोग्य विभागाच्या परीक्षेची ढकलगाडी करून ठेवली होती. मध्यंतरी विद्यार्थ्यांच्या केंद्रावरूनही गोंधळ निर्माण झाला होता. अखेर राज्य शासनाने २४ ऑक्टोबरला परीक्षा होणार असे जाहीर केले. आज संपूर्ण राज्यासहित पुण्यातही आरोग्य विभागाची परीक्षाही घेण्यात आली. मात्र, या परीक्षेतील गोंधळावरुन उमेदवारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर, सोशल मीडियातून आपला अनुभवही कथन केलाय. 

राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर नियोजनशून्य कारभारा पाहायला मिळाला. त्यामुळे, परीक्षार्थींनी आपला संताप व्यक्त केला आहे. पुण्यात अबेदा इनामदार कॉलेज येथे बऱ्याच मुलाना हॉल तिकीटचा नंबर मिळाला नाही. सकाळी १० वाजून गेले तरी विद्यार्थ्यांना आसनव्यवस्था उपलब्ध नव्हती. परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था नसणे, पेपर उशीरा सुरू होणे, चूकीची प्रश्नपत्रिका देणे, अशा अनेक समस्यांचा सामना रविवारी झालेल्या आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान उमेदवारांना करावा लागला. तर, काही परीक्षा केंद्रावर एकाच बँचवर दोन उमेदवारांना बसविण्यात आले होते. MPSC महाराष्ट्र समन्वय समितीने याचे फोटोही ट्विटरवरुन शेअर केले आहेत.    स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या परिक्षेतील भ्रष्टाचार, MPSC मधील असंख्य समस्या संदर्भात राज्यव्यापी चळवळ चालविण्याच्या हेतुने ही समिती ऑनलाईन स्थापन करण्यात आली आहे. आज समितीच्या ट्विटर हँडलवरुन आरोग्य भरतीसंदर्भातील अनेक चुका स्पष्टपणे दाखवून देण्यात आल्या आहेत. 

परीक्षा केंद्रांवर सावळा गोंधळ

एकदा नियोजित परीक्षा रद्द करूनही दुसऱ्यांदा परीक्षांच्या नियोजनात सावळा गोंधळ झाल्याचे दिसून आले. त्यावेळी विदयार्थ्यांनी केंद्र प्रमुखांना बोलावण्याची मागणी विद्यार्थांनी केली. यावेळी केंद्र प्रमुखांनी हॉल तिकीट आणि आसनव्यवस्था दोन्ही अडथळे दूर केल्याशिवाय विद्यार्थी परीक्षा देणार नाहीत असे जाहीर केले. उशिरा पेपर सुरु झाल्यावरही विद्यार्थांना वेळ वाढवून दिली जाईल असेही यावेळी सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण 

विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यातील विद्यार्थी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक या मोठ्या शहरात परीक्षेसाठी येत असतात. आधीच दोन, तीन वेळा केंद्रांवरून गोंधळ निर्माण झाला होता. आता पुन्हा आसनव्यवस्था आणि हॉल तिकीटयावरून गोंधळ निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.  

यापूर्वी परीक्षाच रद्द झाली होती

राज्याच्या आरोग्य विभागात ६५०० पेक्षा जास्त गट-क आणि गट-ड पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबर २०२१ रोजी परीक्षा आयोजित केली होती. आरोग्य विभागाने २४ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान एक पत्रक प्रसिद्ध करत भरती प्रक्रिया पुढे ढकलल्याचे जाहीर केले. परीक्षेला अवघे १०-१२ तास शिल्लक असताना आपण परीक्षा रद्द करण्याचा तुघलकी निर्णय जाहीर केल्या आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. आरोग्य विभागाच्या आणि राज्याचे आरोग्य मंत्रीराजेश टोपे यांच्या निर्णयांचा भोंगळ कारभाराचा आर्थिक फटका गरीब उमेदवारांना बसला होता. त्यानंतर २४ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेministerमंत्रीexamपरीक्षा