शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

...आणि तासात झाले उरुळी कांचन, सासवड शहर स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:47 PM

‘स्वच्छ वारी स्वस्थ वारी - निरोगी मनाची मशागत भारी’, ‘निर्मलवारी निसर्गवारी पर्यावरणाचे रक्षण करी’ या उक्तीचा खऱ्या अर्थाने जर कोणी वापर केला असेल, तर तो उरुळी कांचनच्या ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने.

उरुळी कांचन : ‘स्वच्छ वारी स्वस्थ वारी - निरोगी मनाची मशागत भारी’, ‘निर्मलवारी निसर्गवारी पर्यावरणाचे रक्षण करी’ या उक्तीचा खऱ्या अर्थाने जर कोणी वापर केला असेल, तर तो उरुळी कांचनच्या ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने. फक्त एका मोबाइलच्या मेसेजवर विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी उपस्थित होऊन गावाची स्वच्छता केली.संत तुकाराममहाराज पालखी प्रस्थानानंतर गावामध्ये झालेला कचरा घाण साफ करण्यासाठी येथील उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था, महिला मंडळे, गणेश मंडळे, गाव पुढारी इत्यादींना आवाहन केले होते. त्याप्रमाणे मंगळवारी (दि. १०) गावातील पालखी मार्गावर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या सातत्याचे हे तिसरे वर्ष आहे.संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी दुपारच्या विसाव्यासाठी उरुळी कांचन येथे आला होता. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, खासगी व सामाजिक संस्था वारकºयांसाठी चहा, बिस्किटे, फळे, अल्पोपहार, जेवण देतात व त्यामुळे परिसरात कचºयाची प्रचंडप्रमाणात वाढ झाल्याने गावाची आरोग्यसमस्या वाढते.यावर उपाय म्हणून उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्या, ग्रामपंचायत सदस्य, मंडलाधिकारी, पोलीस अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी , निसर्गोपचार आश्रम ट्रस्ट, साईनाथ मित्र मंडळ, शौर्य करिअर अ‍ॅकॅडमी, शिक्षणा फाउंडेशन, पद्मश्री मणिभाई देसाई कॉलेज यांनी स्वच्छता मोहिमेत सर्वांनी हातात झाडू घेऊन सहभागी होऊन गावातील आश्रम रोड, मुख्य बाजारपेठ, महात्मा गांधी रोड, तळवाडी चौक, शाळा परिसर आणि पालखी मार्गावरील दिंड्यांच्या विसाव्याची ठिकाणे स्वच्छ करत. एका तासाच्या आत पालखी गावात आली होती का नव्हती, असे वाटावे, असा परिसर स्वच्छ केला.हवेलीचे नायब तहसीलदार सुनील शेळके, गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे यांनी पालखीलादौंड हद्दीत पोहोचवून परत येतानागाव चकाचक पाहून या उपक्रमाचे कौतुक केले. सासवड : संत ज्ञाननेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवड येथे ९ व १० जुलै रोजी होता. १० जुलै रोजी संत सोपान व संत चांगा वटेश्वर यांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरला मार्गस्थ झाल्यानंतर सासवड नगर परिषदेने तातडीने सासवड येथील पालखीतळ स्वच्छ करण्यास सुरुवात केली. वारकºयांनी जेवणानंतर टाकलेले पत्रावळी, द्रोण, पाण्याच्या बाटल्या, चहाचे ग्लास, फळांच्या साली, अशा तत्सम प्रकारचा तब्बल २५ ते ३० टन कचरा यावेळी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या मदतीने संकलीत करून पालखी तळा सोबतच सासवड शहर देखील स्वच्छ केले.नगरपालिकेकडुन कचरा संकलना नंतर लगेचच शहर परिसरात जंतुनाशक पावडर टाकण्यात आली. तसेच पुणे महानगरपालिकेच्या वाहनाच्या सहाय्याने जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली. नगरपालीकेच्या अग्निशमन वाहनाच्या सहाय्याने शहरातील रस्ते पाण्याने स्वच्छ धुण्याचे काम चालु आहे.पालखी सोहळ्यातील दिंड्यांना नगरपालिकेने कचरा साठवुन ठेवण्याकरिता ४०० गोण्या दिल्या होत्या. यामुळे कचरा इतरत्र टाकला न जाता त्याचे एकाच ठिकाणी सहज संकलन करता आले. नगरपालिकेचे ४ बोलेरो, २ ट्रॅक्टर, आदर पुनावाला ग्रुपचे कचरा संकलनाची ४ वाहने, पुणे महानगरपालिकेचे जंतुनाशक वाहन, नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. स्वच्छता उपक्रमात सासवड नगरपालिकेस पुणे महानगरपालिका, आदरपुनावाला, थं क्रिएटीव्ह, या संस्थाचे सहकार्य लाभले, अशी माहिती आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण व नगरसेवक अजित जगताप व संदिप जगताप यांनी दिली.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा