शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांचेच नाव ‘मातोश्री’वर बैठकीत ठरले होते; अमित शहांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 05:07 IST

सत्ता सोडून पुन्हा निवडणुका लढण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल आणि सत्ता आल्यास तेच मुख्यमंत्री होतील, असे माझ्या उपस्थितीत ‘माताेश्री’वर ठरले होते. तरीही शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली. भाजपशी विश्वासघात केला आणि ज्यांच्याशी लढायचे, त्यांच्या मांडीवर जाऊन बसले, असा घणाघात केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी पुण्यात केला. असा खुलासा शहा यांनी दोन वर्षांनी केला आहे.  हिंमत असल्यास राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुका लढा, असे खुले आव्हानही त्यांनी शिवसेनेला दिले.

भारतीय जनता पक्षाच्यावतीने अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर आदी उपस्थित होते. 

२५ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘अटल शक्ती महासंपर्क अभियाना’ची घोषणा यावेळी करण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी अमित शहा यांनी भाषणाला सुरुवात केली. माझ्या कारकिर्दीची सुरुवात बुथ अध्यक्ष म्हणून झाली. बुथचा अध्यक्ष हा राष्ट्रीय अध्यक्ष होतो, हे केवळ भाजपमध्येच घडू शकते. पक्षात जो मागत नाही, त्याला न मागताच सगळे काही मिळते. हा नेत्यांचा नव्हे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि तेच पक्षाचे भविष्य आहे. कार्यकर्ता हा जनता आणि नेता यामधील दुवा असतो, असेही ते म्हणाले.

राज्य सरकारने पेट्रोलऐवजी दारू स्वस्त केली!

- महाआघाडी सरकार कायम महागाईच्या नावाने आरडाओरड करते. 

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल स्वस्त करा, असे सांगितले. मात्र, या सरकारने चुकीचे ऐकले आणि दारू स्वस्त केली. नागरिकांनी सरकारला प्रश्न विचारायला हवेत. सिद्धांतरहित राजकारण कोणालाही आवडत नाही. 

- राजकारणाचे अपराधीकरण आणि वसुलीचे शासन हेच शिवसेनेचे ध्येय आहे, अशी टीका शहा यांनी केली.

‘विजयाची मुहूर्तमेढ पुण्यातूनच व्हावी’

- आपल्याला विश्वासघाताचे परिमार्जन करायचे आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. जुने वैभव परत मिळवायचे आहे. 

- वैभव परत मिळविण्याची संधी पुणेकरांच्या हातात आहे. विजयाची मुहूर्तमेढ पुण्यातूनच व्हावी, अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेPuneपुणे