शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील ‘कंजेशन’ रोखण्याकरिता ‘अर्बन रिन्यूवल’चा पर्याय : तज्ज्ञांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 17:31 IST

कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव शहरातील दाटीवाटीच्या मध्यवस्ती भागात..

ठळक मुद्देशहरातील हे ‘कंजेशन’कमी करण्याची आवश्यकता निर्माण साथींच्या वेळी गावेच्या गावे बाहेर हलविण्यात आल्याची उदाहरणेशहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सर्वाधिक रुग्ण

पुणे : शहरातील दाटीवाटीचा भाग वाढल्यामुळे नागरी समस्या वाढत चालल्या आहेत. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव याच मध्यवस्तीच्या भागात झालेला आहे. या प्रसाराला दाटीवाटी अधिक सहायक ठरत आहे. त्यामुळे शहरातील हे ‘कंजेशन’कमी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यावर ‘अर्बन रिन्यूवल’ चा पर्याय उपयोगी ठरु शकतो, असे मत नगररचना क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करु लागले आहेत.यापुर्वी प्लेगसह अनेक प्रकारच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. या साथींच्या वेळी गावेच्या गावे बाहेर हलविण्यात आल्याची उदाहरणे आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि साथ रोगांच्यावेळी शहरातील दाट वस्तीतील लोकांना बाहेर हलविण्याचा निर्णय घेतला जातो.  शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळेले आहेत. या भागातील नागरिकांना शाळांमध्ये हलविण्याची तयारी पालिकेने सुरु केली होती. पालिकेने नागरिकांना शाळांमध्ये जाण्याचे आवाहन केले आहे. परंतू, हा मार्ग तात्पुरता आणि तात्कालीक आहे. यावर कायम स्वरुपी उपाय शोधण्याकरिता १९८२ च्या विकास आराखड्यामध्ये यासाठी ‘अर्बन रिन्यूवल’  अर्थात नागरी पुनर्निमाणाचा पर्यय दिलेला आहे.ज्या प्रभागात अथवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये लोकसंख्येची घनता अधिक असेल अथवा क्षमतेपेक्षा अधिक असेल त्या भागात हा पर्याय वापरुन नव्याने विकसन करण्याची तरतूद आहे. लोकांचे दाटीवाटीने राहणे, त्यामधून निर्माण होणा-या आरोग्य विषयक समस्या, नागरी सुविधांवर येणारा ताण या पयार्यातून कमी करता येऊ शकतो. मुळाच अशा प्रकारे लोकसंख्येची घनता वाढू न देणे ही प्रशासनाची जबाबदारी असते. ज्या भागात पुनर्निमाण करायचे आहे त्यागातील ठराविक परिसर, रस्ते आदी निवडून तेथील कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाते. त्यांच्या नोकरीची ठिकाणे, उत्पन्न, व्यवसाय आदींची माहिती घेऊन त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.त्यानुसार, नागरिकांना शहराच्या अन्य भागात, उपनगरांमध्ये सोयीनुसार हलविणे, त्यांना घरे उपलब्ध करुन देणे हा एक पर्याय आहे. किंवा आहे त्याच ठिकाणी पुनर्निमाण करुन उभारलेल्या इमारतींमध्ये घरे देणे असाही एक पर्याय असतो. अलिकडच्या काळात राबविण्यात येत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसारख्या योजना 'नागरी पुनर्निर्माण' या प्रकारातच मोडतात. नगररचना कायद्यामध्ये दाटीवाटीच्या भागांचे पुनर्निमाण करण्याकरिता तरतूदी आहेत.=========सध्या कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेला भाग मध्यवस्तीत आहे. दाटीवाटीने नागरिक राहात असले तरी त्यांच्यादृष्टीने या भागात राहणे सर्वाथार्ने फायद्याचे आणि सोईचे आहे. त्यामुळे कितीजण बाहेर राहण्यास जातील असा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी जागेवरच पुनर्निमाण करणे हा एक पर्याय असू शकतो.=========लोकवस्ती शहराच्या हद्दीबाहेर हलवायची असल्यास त्यासाठी जागा शोधणे, घरे उभारणे आदी कामे करावी लागतील. वास्तविक शहराच्या बाहेर नव्या नगराचा विकास करण्यासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली आहे. जवळपास ८४२ गावे पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये समाविष्ठ करण्यात आली आहेत. पालिका हद्दीत वाढणारी लोकसंख्या या भागात जावी आणि लोकसंख्येची घनता कमी व्हावी हा त्यामागील हेतू होता. त्याला अधिक चालना देण्याची गरज आहे.============साथीचे आजार, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गावे अथवा लोकवस्ती हद्दीबाहेर हलविणे हा तात्पुरता उपाय असतो. १९८२ च्या विकास आराखड्यात लोकसंख्येची घनता कमी करण्यासाठी 'अर्बन रिन्युअल'ची कल्पना मांडण्यात आलेली आहे. त्याचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर ही घनता कमी करता येऊ शकते. तसेच नागरी सुविधांवर येणारा ताणही कमी होऊ शकतो आणि आरोग्य विषयक समस्यांनाही आळा घालता येऊ शकतो. या पयार्याचा विचार होणे गरजेचे आहे.- रामचंद्र गोहाड, नगररचनाकार

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका