शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

पुणे शहरातील ‘कंजेशन’ रोखण्याकरिता ‘अर्बन रिन्यूवल’चा पर्याय : तज्ज्ञांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 17:31 IST

कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव शहरातील दाटीवाटीच्या मध्यवस्ती भागात..

ठळक मुद्देशहरातील हे ‘कंजेशन’कमी करण्याची आवश्यकता निर्माण साथींच्या वेळी गावेच्या गावे बाहेर हलविण्यात आल्याची उदाहरणेशहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सर्वाधिक रुग्ण

पुणे : शहरातील दाटीवाटीचा भाग वाढल्यामुळे नागरी समस्या वाढत चालल्या आहेत. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव याच मध्यवस्तीच्या भागात झालेला आहे. या प्रसाराला दाटीवाटी अधिक सहायक ठरत आहे. त्यामुळे शहरातील हे ‘कंजेशन’कमी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यावर ‘अर्बन रिन्यूवल’ चा पर्याय उपयोगी ठरु शकतो, असे मत नगररचना क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करु लागले आहेत.यापुर्वी प्लेगसह अनेक प्रकारच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. या साथींच्या वेळी गावेच्या गावे बाहेर हलविण्यात आल्याची उदाहरणे आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि साथ रोगांच्यावेळी शहरातील दाट वस्तीतील लोकांना बाहेर हलविण्याचा निर्णय घेतला जातो.  शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळेले आहेत. या भागातील नागरिकांना शाळांमध्ये हलविण्याची तयारी पालिकेने सुरु केली होती. पालिकेने नागरिकांना शाळांमध्ये जाण्याचे आवाहन केले आहे. परंतू, हा मार्ग तात्पुरता आणि तात्कालीक आहे. यावर कायम स्वरुपी उपाय शोधण्याकरिता १९८२ च्या विकास आराखड्यामध्ये यासाठी ‘अर्बन रिन्यूवल’  अर्थात नागरी पुनर्निमाणाचा पर्यय दिलेला आहे.ज्या प्रभागात अथवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये लोकसंख्येची घनता अधिक असेल अथवा क्षमतेपेक्षा अधिक असेल त्या भागात हा पर्याय वापरुन नव्याने विकसन करण्याची तरतूद आहे. लोकांचे दाटीवाटीने राहणे, त्यामधून निर्माण होणा-या आरोग्य विषयक समस्या, नागरी सुविधांवर येणारा ताण या पयार्यातून कमी करता येऊ शकतो. मुळाच अशा प्रकारे लोकसंख्येची घनता वाढू न देणे ही प्रशासनाची जबाबदारी असते. ज्या भागात पुनर्निमाण करायचे आहे त्यागातील ठराविक परिसर, रस्ते आदी निवडून तेथील कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाते. त्यांच्या नोकरीची ठिकाणे, उत्पन्न, व्यवसाय आदींची माहिती घेऊन त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.त्यानुसार, नागरिकांना शहराच्या अन्य भागात, उपनगरांमध्ये सोयीनुसार हलविणे, त्यांना घरे उपलब्ध करुन देणे हा एक पर्याय आहे. किंवा आहे त्याच ठिकाणी पुनर्निमाण करुन उभारलेल्या इमारतींमध्ये घरे देणे असाही एक पर्याय असतो. अलिकडच्या काळात राबविण्यात येत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसारख्या योजना 'नागरी पुनर्निर्माण' या प्रकारातच मोडतात. नगररचना कायद्यामध्ये दाटीवाटीच्या भागांचे पुनर्निमाण करण्याकरिता तरतूदी आहेत.=========सध्या कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेला भाग मध्यवस्तीत आहे. दाटीवाटीने नागरिक राहात असले तरी त्यांच्यादृष्टीने या भागात राहणे सर्वाथार्ने फायद्याचे आणि सोईचे आहे. त्यामुळे कितीजण बाहेर राहण्यास जातील असा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी जागेवरच पुनर्निमाण करणे हा एक पर्याय असू शकतो.=========लोकवस्ती शहराच्या हद्दीबाहेर हलवायची असल्यास त्यासाठी जागा शोधणे, घरे उभारणे आदी कामे करावी लागतील. वास्तविक शहराच्या बाहेर नव्या नगराचा विकास करण्यासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली आहे. जवळपास ८४२ गावे पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये समाविष्ठ करण्यात आली आहेत. पालिका हद्दीत वाढणारी लोकसंख्या या भागात जावी आणि लोकसंख्येची घनता कमी व्हावी हा त्यामागील हेतू होता. त्याला अधिक चालना देण्याची गरज आहे.============साथीचे आजार, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गावे अथवा लोकवस्ती हद्दीबाहेर हलविणे हा तात्पुरता उपाय असतो. १९८२ च्या विकास आराखड्यात लोकसंख्येची घनता कमी करण्यासाठी 'अर्बन रिन्युअल'ची कल्पना मांडण्यात आलेली आहे. त्याचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर ही घनता कमी करता येऊ शकते. तसेच नागरी सुविधांवर येणारा ताणही कमी होऊ शकतो आणि आरोग्य विषयक समस्यांनाही आळा घालता येऊ शकतो. या पयार्याचा विचार होणे गरजेचे आहे.- रामचंद्र गोहाड, नगररचनाकार

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका