शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

आरोप बोगस, पुरावे असतील तर पोलिसांना द्या – मंत्री शिरसाठ यांचे दमानियांना चॅलेंज… 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 15:15 IST

संजय शिरसाठ यांचा अंजली दमानियांवर हल्लाबोल 

पुणे: बीड प्रकरणावरून आरोपांची राळ उडत असतानाच मंत्री संजय शिरसाठ यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “अंजली दमानिया सातत्याने बोगस आरोप करत असतात. त्यांच्या आरोपांमध्ये जर काही तथ्य असेल, तर त्यांनी ते पुरावे पोलिसांकडे सादर करावेत. फक्त बेछूट आरोप करून गोंधळ माजवण्यात काही अर्थ नाही,” असे शिरसाठ यांनी स्पष्ट केले.

शिरसाठ पुढे म्हणाले, “जर हत्या झाल्या आहेत, तर मृतदेह कुठे आहेत? या बेछूट आरोपांमुळे परिस्थिती आणखी चिघळत आहे. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, आणि यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही.” या प्रकरणी सहा विविध तपास यंत्रणा काम करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

“माहिती असल्यास पोलिसांना द्या”

दमानियांवर निशाणा साधताना, “त्यांच्या बोगस आरोपांमुळे वातावरण बिघडते आहे. जर त्यांच्याकडे काही ठोस माहिती असेल, तर त्यांनी ती पोलिसांना दिली पाहिजे. सरकार खोट्या आरोपांमुळे कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र, सत्य समोर आले, तर आरोपींना नक्कीच कठोर शिक्षा होईल.” असे आवाहन शिरसाठ यांनी केले. 

पुण्यातील वसतिगृहांची पाहणी व भीमा कोरेगाव सोहळ्याचा आढावा

संजय शिरसाठ यांनी आज पुण्यातील वसतिगृहांची पाहणी केली. त्यांनी या ठिकाणी झालेल्या पाहणीनंतर समाधान व्यक्त केले, मात्र काही त्रुटींवरही लक्ष वेधले. “सगळे नीट सुरू आहे, पण जिथे त्रुटी आहेत, तिथे त्या लवकरच दूर केल्या जातील,” असे ते म्हणाले.

आजच त्यांच्या खात्याची एक महत्त्वाची बैठक देखील पुण्यात घेण्यात आली. या बैठकीत भीमा कोरेगाव सोहळ्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. शिरसाठ म्हणाले, “या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आमच्या खात्याने १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने योग्य ती तयारी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.”

“कारभारात ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही”

संजय शिरसाठ यांनी वसतिगृह व्यवस्थापनाला स्पष्ट इशारा दिला की, “कारभार नीट होत नसेल तर कुणालाही सोडले जाणार नाही. वसतिगृह व्यवस्थापनात त्रुटी असल्यास त्वरित दुरुस्त्या करण्यात याव्यात.”

त्यांनी भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. “सगळ्या तयारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे, कारण हा सोहळा महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचा आहे,” असे ते म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रanjali damaniaअंजली दमानियाBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSanjay Shirsatसंजय शिरसाट