शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

आरोप बोगस, पुरावे असतील तर पोलिसांना द्या – मंत्री शिरसाठ यांचे दमानियांना चॅलेंज… 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 15:15 IST

संजय शिरसाठ यांचा अंजली दमानियांवर हल्लाबोल 

पुणे: बीड प्रकरणावरून आरोपांची राळ उडत असतानाच मंत्री संजय शिरसाठ यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “अंजली दमानिया सातत्याने बोगस आरोप करत असतात. त्यांच्या आरोपांमध्ये जर काही तथ्य असेल, तर त्यांनी ते पुरावे पोलिसांकडे सादर करावेत. फक्त बेछूट आरोप करून गोंधळ माजवण्यात काही अर्थ नाही,” असे शिरसाठ यांनी स्पष्ट केले.

शिरसाठ पुढे म्हणाले, “जर हत्या झाल्या आहेत, तर मृतदेह कुठे आहेत? या बेछूट आरोपांमुळे परिस्थिती आणखी चिघळत आहे. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, आणि यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही.” या प्रकरणी सहा विविध तपास यंत्रणा काम करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

“माहिती असल्यास पोलिसांना द्या”

दमानियांवर निशाणा साधताना, “त्यांच्या बोगस आरोपांमुळे वातावरण बिघडते आहे. जर त्यांच्याकडे काही ठोस माहिती असेल, तर त्यांनी ती पोलिसांना दिली पाहिजे. सरकार खोट्या आरोपांमुळे कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र, सत्य समोर आले, तर आरोपींना नक्कीच कठोर शिक्षा होईल.” असे आवाहन शिरसाठ यांनी केले. 

पुण्यातील वसतिगृहांची पाहणी व भीमा कोरेगाव सोहळ्याचा आढावा

संजय शिरसाठ यांनी आज पुण्यातील वसतिगृहांची पाहणी केली. त्यांनी या ठिकाणी झालेल्या पाहणीनंतर समाधान व्यक्त केले, मात्र काही त्रुटींवरही लक्ष वेधले. “सगळे नीट सुरू आहे, पण जिथे त्रुटी आहेत, तिथे त्या लवकरच दूर केल्या जातील,” असे ते म्हणाले.

आजच त्यांच्या खात्याची एक महत्त्वाची बैठक देखील पुण्यात घेण्यात आली. या बैठकीत भीमा कोरेगाव सोहळ्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. शिरसाठ म्हणाले, “या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आमच्या खात्याने १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने योग्य ती तयारी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.”

“कारभारात ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही”

संजय शिरसाठ यांनी वसतिगृह व्यवस्थापनाला स्पष्ट इशारा दिला की, “कारभार नीट होत नसेल तर कुणालाही सोडले जाणार नाही. वसतिगृह व्यवस्थापनात त्रुटी असल्यास त्वरित दुरुस्त्या करण्यात याव्यात.”

त्यांनी भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. “सगळ्या तयारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे, कारण हा सोहळा महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचा आहे,” असे ते म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रanjali damaniaअंजली दमानियाBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSanjay Shirsatसंजय शिरसाट