शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आरोप बोगस, पुरावे असतील तर पोलिसांना द्या – मंत्री शिरसाठ यांचे दमानियांना चॅलेंज… 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 15:15 IST

संजय शिरसाठ यांचा अंजली दमानियांवर हल्लाबोल 

पुणे: बीड प्रकरणावरून आरोपांची राळ उडत असतानाच मंत्री संजय शिरसाठ यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “अंजली दमानिया सातत्याने बोगस आरोप करत असतात. त्यांच्या आरोपांमध्ये जर काही तथ्य असेल, तर त्यांनी ते पुरावे पोलिसांकडे सादर करावेत. फक्त बेछूट आरोप करून गोंधळ माजवण्यात काही अर्थ नाही,” असे शिरसाठ यांनी स्पष्ट केले.

शिरसाठ पुढे म्हणाले, “जर हत्या झाल्या आहेत, तर मृतदेह कुठे आहेत? या बेछूट आरोपांमुळे परिस्थिती आणखी चिघळत आहे. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, आणि यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही.” या प्रकरणी सहा विविध तपास यंत्रणा काम करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

“माहिती असल्यास पोलिसांना द्या”

दमानियांवर निशाणा साधताना, “त्यांच्या बोगस आरोपांमुळे वातावरण बिघडते आहे. जर त्यांच्याकडे काही ठोस माहिती असेल, तर त्यांनी ती पोलिसांना दिली पाहिजे. सरकार खोट्या आरोपांमुळे कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र, सत्य समोर आले, तर आरोपींना नक्कीच कठोर शिक्षा होईल.” असे आवाहन शिरसाठ यांनी केले. 

पुण्यातील वसतिगृहांची पाहणी व भीमा कोरेगाव सोहळ्याचा आढावा

संजय शिरसाठ यांनी आज पुण्यातील वसतिगृहांची पाहणी केली. त्यांनी या ठिकाणी झालेल्या पाहणीनंतर समाधान व्यक्त केले, मात्र काही त्रुटींवरही लक्ष वेधले. “सगळे नीट सुरू आहे, पण जिथे त्रुटी आहेत, तिथे त्या लवकरच दूर केल्या जातील,” असे ते म्हणाले.

आजच त्यांच्या खात्याची एक महत्त्वाची बैठक देखील पुण्यात घेण्यात आली. या बैठकीत भीमा कोरेगाव सोहळ्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. शिरसाठ म्हणाले, “या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आमच्या खात्याने १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने योग्य ती तयारी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.”

“कारभारात ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही”

संजय शिरसाठ यांनी वसतिगृह व्यवस्थापनाला स्पष्ट इशारा दिला की, “कारभार नीट होत नसेल तर कुणालाही सोडले जाणार नाही. वसतिगृह व्यवस्थापनात त्रुटी असल्यास त्वरित दुरुस्त्या करण्यात याव्यात.”

त्यांनी भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. “सगळ्या तयारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे, कारण हा सोहळा महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचा आहे,” असे ते म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रanjali damaniaअंजली दमानियाBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSanjay Shirsatसंजय शिरसाट