शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नीरा नदीकाठच्या गावांना अ‍ॅलर्ट, धरणातून विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:10 IST

पाणीपातळीत वाढ : धरणातून विसर्ग

भोर : तालुक्याच्या पश्चिम भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नीरादेवघर धरणाच्या पाच दरवाजांतून सुमारे ७१८८ क्युसेक्सने, तर वीजनिर्मिती केंद्रातून ७५० क्युसेक्स असा एकूण ७९३८ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू असल्याने नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाऊस वाढल्यास पातळीत अधिकच वाढ होणार आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागातील महाड-पंढरपूर रोडवरील सुमारे १२ टीएमसीचे संपूर्ण मातीचे धरण असून धरण १३ आॅगस्टलाच १०० टक्के भरले आहे. नीरादेवघर धरण भागात आज ५५ मिलिमीटर व एकूण २०४७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आठवडाभरापासून पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने रविवारी सकाळी ११ वाजता धरणाच्या पाच दरवाजांतून विसर्ग सुरू केला आहे. एकूण ७९३८ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होत आहे. पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास नीरा नदीच्या पाणीपातळीत अधिकच वाढ होणार असल्याने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणे