शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

Ajit Pawar | "कोणत्याही टुकार पोराला सोडणार नाही..." अजित पवार यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 15:53 IST

आप्पासाहेब पवार उद्योग भवनाचे उद्घाटन

बारामती (पुणे) :बारामती शहरातील विकासकामे नीटनेटकी ठेवणे आपले काम आहे. बारामतीकरांना सुरक्षित वाटले पाहिजे. मुली आणि कुटुंबाला काही केले तर वेडेवाकडे प्रकार सहन केले जाणार नाहीत. तो कोणीही असो, टुकार पोरांना सोडणार नाही. आई-वडिलांनी ‘त्या’ पोरांना समजावून सांगा, बारामतीकरांना सुरक्षित वाटले पाहिजे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कायदा- सुव्यवस्था राखण्याबाबत कडक सूचना दिल्या.

विरोधी पक्षनेते पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि. १८) येथील आप्पासाहेब पवार उद्योग भवनाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्हाइस चेअरमन मनोज पोतेकर, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, अविनाश लगड, रोहिदास हिरवे, पौर्णिमा तावरे, पुरुषोत्तम जगताप, संग्राम सोरटे, जय पाटील, संभाजी होळकर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, बारामती परिसरात एक लाख मुले- मुली शिक्षण घेत आहेत. शहराची अर्थव्यवस्था बदलत आहे, लोकांचे राहणीमान बदलत आहे. बारामती शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. सत्ता गेल्यानंतर विकासाचा वेग मंदावेल, असे वाटत होते. राजकीय मतांतरे असू शकतात; पण जेव्हा आम्ही सत्तेत असतो तेव्हा कामात राजकारण आणत नाही. त्यामुळे सत्ता नसताना आपली कामे अडत नसल्याचे पवार म्हणाले.

बारामतीत लघुउद्योगांना चालना देण्यासाठी आणखी उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आपणदेखील त्यासाठी प्रयत्नशील आहोत. बारामतीत स्पोर्टस हब सुरू करणार असून त्यासाठी आवश्यक निधी मंजूर झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमसमोर सुंदर शॉपिंग कॉम्प्लेक्ससह प्रशस्त नाट्यगृह, मोठे उद्यान तसेच मोठे वाचनालय उभारण्यात येणार आहे.

यावेळी बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन रणजित पवार यांनी प्रास्ताविक केले. संचालक अविनाश लगड यांनी आभार मानले.

रेल्वेमंत्रालयाची ‘ती’ रक्कम दीड टक्क्यांवर

खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून रेल्वेच्या बारामती शहरातील सर्व्हीस रस्त्यासाठी आवश्यक जागेचा विषय मार्गी लागला आहे. तेथील रेल्वेच्या जागेसाठी पूर्वी सहा टक्के रकमेची मागणी केली होती, ती दीड टक्क्यावर आली आहे. त्यामुळे आता पंचायत समितीपर्यंत रखडलेल्या सेवा रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, असेही अजित पवार म्हणाले.

कालव्याचे १,००० ते १,१०० क्युसेक्सने पाणी वाहणार

तीन हत्ती चौकात उंचवटा करण्याशिवाय पर्याय नव्हता. पूर्वी निरा डावा कालव्याचे पाणी ४५० क्युसेक्सने जात असे. आता उंचवट्यामुळे १,००० ते १,१०० क्युसेक्स पाणी वाहणार आहे. ते काम पूर्ण झाल्यावर जाणवेल, विकासकामे करताना सहनशीलता आवश्यक आहे. नवीन कल्पना सुचल्यास जरूर सांगा, त्यावर चर्चा करा. बारामतीत ‘बेस्ट’ करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रBaramatiबारामती