शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

"...त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या वय बदलण्याबाबत कायदा करणार", अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 22:58 IST

Ajit Pawar News: बारामती शहरात गेल्या  काही दिवसांत झालेल्या गंभीर घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठा आहे.मात्र, कायदेशीर अडचणींमुळे  गंभीर गुन्हे करणार्या या मुलांवर कारवाइ करताना पोलीस प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

 बारामती - बारामती शहरात गेल्या  काही दिवसांत झालेल्या गंभीर घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठा आहे.मात्र, कायदेशीर अडचणींमुळे  गंभीर गुन्हे करणार्या या मुलांवर कारवाइ करताना पोलीस प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होते.राज्यात अल्पवयीन मुलांचा  गुन्हेगारीत वाढता सहभाग पाहता याबाबत कायद्यात बदल करण्याची गरज  आहे.त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बारामती येथे पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील वाढत्या सहभागाबाबत चिंता व्यक्त केली आहे. पवार म्हणाले,गुन्हा करणाऱ्या  अल्पवयीन मुलांची वयोमर्यादा १४ वर्षाच्या आत ठेवण्याची गरज आहे.आपला काळ आणि आजच्या पिढीचा काळ यामध्ये मोठा फरक आहे.आताची पिढीची  प्रखर  बुद्धीमत्ता आहे.परीणामी आजची परिस्थिती वेगळी बनली आहे. या संदर्भात आम्ही गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहोत. राज्यसरकार याबाबत कायदा करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. कारण हा विषय केंद्राशी निगडित आहे. शालेय विद्यार्थी १४ वर्षाच्या पुढे गेले की त्यांचा वापर हा गुन्हेगारीसाठी केला जात आहे. या मुलांमध्ये रागावर नियंत्रण न ठेवण्याची वृत्ती देखील वाढत आहे. यामुळे गुन्हे वाढत आहेत. दरम्यान, ही मुळे अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर गुन्हेगाराप्रमाणे कारवाई केली जात नाही. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अल्पवयीन गुन्हेगाराचे वय १४ वर्षाच्या आत असण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली आहे.

चौदा वर्षाच्या पुढील प्रत्येक युवकाचा गुन्ह्यातील सहभाग कडक कारवाइसाठी पात्र ठरावा,  हे अधिकाऱ्यांचं देखील हेच म्हणणं आहे.गंभीर गुन्हा करणार्या  अल्पवयीन मुलांना कमी वय असल्याने,तसेच  १८ वर्ष होइपर्यंत आपण गुन्हात अडकू शकत नसल्याचे माहिती आहे.बारामतीत नुकत्याच झालेल्या गंभीर गुन्ह्यातील मुले देखील अल्पवयीन आहेत.शहरात वेदना देणारी दुर्दैवी घटना घडली आहे.अल्पवयीन मुलांच्या वयाच्या कायदेशील बाबीची वरीष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे.याबाबत ‘डीपार्टमेंट’च्या अधिकार्यांनी वयात बदल करण्याची गरज व्यक्त केली आहे. अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे.हा कायद्यात बदल करताना केंद्र सरकारशी बोलाव लागणार  आहे.राज्यात अल्पवयीन मुलांचा मुद्दा समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें,उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कानावर देखील हि बाब सांगणार आहे.आम्ही या बाबत केंद्र सरकारला पत्र देऊन या बाबतचा प्रस्ताव देणार असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार