शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"...त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या वय बदलण्याबाबत कायदा करणार", अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 22:58 IST

Ajit Pawar News: बारामती शहरात गेल्या  काही दिवसांत झालेल्या गंभीर घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठा आहे.मात्र, कायदेशीर अडचणींमुळे  गंभीर गुन्हे करणार्या या मुलांवर कारवाइ करताना पोलीस प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

 बारामती - बारामती शहरात गेल्या  काही दिवसांत झालेल्या गंभीर घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठा आहे.मात्र, कायदेशीर अडचणींमुळे  गंभीर गुन्हे करणार्या या मुलांवर कारवाइ करताना पोलीस प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होते.राज्यात अल्पवयीन मुलांचा  गुन्हेगारीत वाढता सहभाग पाहता याबाबत कायद्यात बदल करण्याची गरज  आहे.त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बारामती येथे पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील वाढत्या सहभागाबाबत चिंता व्यक्त केली आहे. पवार म्हणाले,गुन्हा करणाऱ्या  अल्पवयीन मुलांची वयोमर्यादा १४ वर्षाच्या आत ठेवण्याची गरज आहे.आपला काळ आणि आजच्या पिढीचा काळ यामध्ये मोठा फरक आहे.आताची पिढीची  प्रखर  बुद्धीमत्ता आहे.परीणामी आजची परिस्थिती वेगळी बनली आहे. या संदर्भात आम्ही गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहोत. राज्यसरकार याबाबत कायदा करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. कारण हा विषय केंद्राशी निगडित आहे. शालेय विद्यार्थी १४ वर्षाच्या पुढे गेले की त्यांचा वापर हा गुन्हेगारीसाठी केला जात आहे. या मुलांमध्ये रागावर नियंत्रण न ठेवण्याची वृत्ती देखील वाढत आहे. यामुळे गुन्हे वाढत आहेत. दरम्यान, ही मुळे अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर गुन्हेगाराप्रमाणे कारवाई केली जात नाही. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अल्पवयीन गुन्हेगाराचे वय १४ वर्षाच्या आत असण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली आहे.

चौदा वर्षाच्या पुढील प्रत्येक युवकाचा गुन्ह्यातील सहभाग कडक कारवाइसाठी पात्र ठरावा,  हे अधिकाऱ्यांचं देखील हेच म्हणणं आहे.गंभीर गुन्हा करणार्या  अल्पवयीन मुलांना कमी वय असल्याने,तसेच  १८ वर्ष होइपर्यंत आपण गुन्हात अडकू शकत नसल्याचे माहिती आहे.बारामतीत नुकत्याच झालेल्या गंभीर गुन्ह्यातील मुले देखील अल्पवयीन आहेत.शहरात वेदना देणारी दुर्दैवी घटना घडली आहे.अल्पवयीन मुलांच्या वयाच्या कायदेशील बाबीची वरीष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे.याबाबत ‘डीपार्टमेंट’च्या अधिकार्यांनी वयात बदल करण्याची गरज व्यक्त केली आहे. अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे.हा कायद्यात बदल करताना केंद्र सरकारशी बोलाव लागणार  आहे.राज्यात अल्पवयीन मुलांचा मुद्दा समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें,उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कानावर देखील हि बाब सांगणार आहे.आम्ही या बाबत केंद्र सरकारला पत्र देऊन या बाबतचा प्रस्ताव देणार असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार