शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'धमक असेल तर साखर कारखाने चालवून दाखवा'; अजित पवारांचे विरोधकांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 12:14 IST

अजित पवारांचे विरोधकांना आव्हान...

सोमेश्वरनगर (पुणे) : विरोधक कारखान्यांच्या बाबतीत आरोप - प्रत्यारोप करतात, मात्र स्वतः कारखाने चालवायला घेतले की ते मागे सरकतात. आता अनेक जिल्ह्यांतील साखर कारखाने बंद आहेत. त्यामुळे कुणामध्ये धमक असेल तर कारखाने चालवायला घ्या, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना दिले.

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थलांतर प्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदोरे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, सरपंच रवींद्र खोमणे व जिल्हा बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, यंदा पावसाळा चांगला असणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन उसाची लागवड करा. मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांना लवकर साखर कारखाने सुरू करायला मी सांगणार आहे. जिल्हा बँकेत आठशे कर्मचाऱ्यांची भरती करायची आहे. यासाठी राज्य सरकार परवानगी मागत आहे. या भरतीत जिल्ह्यातील युवकांना प्राधान्य मिळायला हवे यासाठी प्रयत्न करणार आहे. कांदा खरेदी नाफेडच्या वतीने करण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे. शेतकऱ्यांना मदत होईल, हाच यामागचा हेतू आहे. जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी तुम्ही व्याजदरात २५ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. ही कर्ज मर्यादा वाढविण्यासाठी नाबार्डकडे पत्रव्यवहार करण्याच्या सूचना दिल्या असून, व्याजातही सवलत देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जिल्हा बँकेच्या वतीने शेतकरी व सभासदांसाठी अनेक योजना सुरू आहेत, मात्र हे असताना बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व सभासदांची शेतकऱ्यांशी नम्रपणे वागावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBaramatiबारामती