शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

...तर पुढील ५ वर्ष काही कमी पडू देणार नाही; अजित पवारांचं इंदापूरकरांना साकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 13:29 IST

विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाला सामान्य जनताच गॅरंटी आहे. नरेंद्र मोदींकडे व्हिजन आहे असं सांगत अजित पवारांनी आपल्या विचाराचा खासदार बारामतीतून पाठवण्याचं आवाहन केले.

इंदापूर - केंद्रात आपल्याला सरकार आणायचंय आणि त्यासाठी इथला खासदार केंद्र सरकारच्या विचाराचा हवाय. केंद्र सरकारकडून मतदारसंघात निधी आणायचंय. अनेक कामे मंजूर करून घ्यायची आहे. २ मार्चला बारामतीत नमो महारोजगार मेळावा घेतोय, देशपरदेशातील कंपन्या येतात. मला जे जे काही तुमच्यासाठी करता येईल ते ते करायचे आहे. त्यात मी कुठेही कमी पडणार नाही. पण तुम्ही लोकसभेच्या मतदानाला घड्याळाचं बटण दाबा. त्यात कुठेही कमतरता आणू नका. तुम्ही जितकं भरभरून मतदान कराल तितके पुढच्या ५ वर्षात काही कमी पडू देणार नाही हा शब्द आहे असं आवाहन अजित पवारांनी घातली. 

इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसनं मेळावा घेतला, त्यात अजित पवार म्हणाले की, सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम आपण करतोय. देशाचे नेतृत्व सक्षम नेत्याच्या हाती आहे हीच गॅरंटी आहे. देशाची वाटचाल पुढे असताना विकासाची पूर्ती करणारे सरकार आहे. ८० कोटी जनतेला मोफत धान्य वाटप केले जाते. वेगवेगळ्या योजना गरिबांसाठी कार्यन्वित आहे. ४ कोटी लोकांना घरे बांधण्याचा कार्यक्रम करणार आहेत. राजकारण कुठल्या स्तरावर न्यावे याचेही भान काहींना राहिले नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाला सामान्य जनताच गॅरंटी आहे. नरेंद्र मोदींकडे व्हिजन आहे. सकाळपासून उशिरापर्यंत काम करण्याची ताकद आहे. देशात राष्ट्रीय महामार्ग झालेत, पूर्वी असं होत नव्हते. वंदे भारत ट्रेन सुरू झालीय. कमी वेळात कुठेही जाता येते. आपला लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा गेला तर केंद्र सरकार कितीतरी जास्त पटीने निधी देऊ शकते. हक्काने मोदींना सांगू शकतो. तुमच्या विचारांचा खासदार दिलेला आहे. आता मतदारसंघात हे काम करून द्या असं अजित पवारांनी म्हटलं. 

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात मदत कशी करता येईल असं आम्ही बघत होतो. आम्ही जो निर्णय घेतला तो संघटनेच्या आणि तुमच्या पाठबळावर घेतला आहे. विरोधकांमध्ये एक वाक्यता नाही. चार दिशेला चार तोंड आहे. मतदारांमध्ये खूप ताकद आहे. कुठेही भावनिक होऊ नका. मला सगळ्या गोष्टींची जाण आहे. कुठल्याही कामासाठी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. प्रत्येकाचा काळ असतो. चार दिवस सासूचे असले की चार दिवस सूनेचे येतात, आता सासूचे दिवस गेले सूनेचे दिवस आले अर्थात तुम्ही बटण दाबलं तर..विरोधाला विरोध म्हणून राजकारण करायचे नाही असंही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस