शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'जनाई'च्या पाणी प्रश्नाबाबत ३० जानेवारीला बैठक घेऊन मार्ग काढणार- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 12:29 IST

सुपे ( पुणे ) : शासनाच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे. यासाठी मंत्रालयात ३० जानेवारीला ...

सुपे (पुणे) : शासनाच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे. यासाठी मंत्रालयात ३० जानेवारीला शेतकरी संघर्ष कृती समितीच्या दहा जणांच्या शिष्टमंडळासह जलसंपदाचे अधिकारी आणि मी स्वत: उपस्थित राहुन बैठकीतून मार्ग काढू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपोषणस्थळी दिली.

मात्र २६ जानेवारीपासुन सुरु झालेले आमरण उपोषण आंदोलन ३० जानेवारीच्या बैठकिपर्यंत सुरुच ठेऊ. या बैठकीत उपोषण कर्त्यांचे समाधान झाले नाही तर आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे कृती समितीच्यावतीने यावेळी पवार यांना सांगण्यात आले. अजित पवार यांनी संध्याकाळी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकरी संघर्ष कृती समितीची भेट घेतली. यावेळी त्यांनी १२ मागण्यांपैकी बहुतांश मागण्या पवार यांनी मार्गी लावल्या. तर हक्काचे २.१७ टीएमसी पाणी शेतकऱ्याला मिळावे. तसेच शेतकऱ्यांना हे पाणी तीन आवर्तनात देण्याविषयी चर्चा करण्यात आली. येथे अधिकारी नाहीत त्यामुळे मला त्याबाबत सांगता येणार नाही. आपण अधिकाऱ्यांसह कृती समितीतील १० जणाचे शिष्टमंडळाची बैठक मंत्रालयात घेऊ. येत्या ३० जानेवारीला तुम्ही मुंबईला या असे पवार यांनी सांगितले. टेलला असणाऱ्या शेतकऱ्याला पाणी मिळत नसेल तर तुम्हाला बंद पाईपलाईनमधुन पाणी देऊ, असे पवार यांनी सांगून कालवा सल्लागार समितीवर तीन सदस्य घेतले जातील असे त्यांनी सांगितले.

यावेळी पवार म्हणाले, कऱ्हा नदीवरील बंधाऱ्यांची दुरुस्तीसाठी ९० कोटींची तरतुद केली आहे. पुरंदरसाठी ६० कोटी मंजुर केले आहेत. जनाई चालु करुन ३० वर्ष झाले असून त्यांच्या विद्युत मोटारी, पंपाची दुरुस्तीची आवश्यकता आहे. त्यासाठी ४० कोटीची आवश्यकता असुन येत्या फेब्रुवारीच्या पुरवणी यादीत मंजुर करता येईल असे पवार यांनी सांगितले. सद्या आपण शिंदे सरकारामध्ये असल्याने आणि केंद्रातील मोदी सरकारचा पाठींबा असल्याने आपली विविध विकासकामे मार्गी लागत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवार