शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 15:54 IST

शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली.

Ajit Pawar : ज्येष्ठ समाजसेवक व लेखक बाबा आढाव हे पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. विधानसभा निवडणुकीत सरकारी पैशांचा वापर झाला असून ईव्हीएमबाबत संशय घेण्यास जागा असल्याचे बाबा आढाव यांनी म्हटलं आहे. आज सकाळी शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार हे देखील आंदोलनाच्या स्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. "संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या प्रमाणे बाबा आढाव यांनी आपलं मत मांडले. काही गोष्टी या निवडणूक आयोगाशी तर काही सुप्रीम कोर्टाशी संबधित आहेत. त्यामुळे त्यांना जे योग्य वाटतं त्यानुसार त्यांनी निकाल दिले आहेत. खरंतर वयस्कर लोकांना मतदार केंद्रावर जाऊन त्रास होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने ८५ वर्ष्यांच्या व्यक्तींच्या घरी जाऊन मतदान करण्याची योजना राबवली होती. लवकर अंधार होत असल्याने लाईटची सुविधा मतदान केंद्रांवर करण्यात आली होती," असं अजित पवार यांनी म्हटलं.

"लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३१ जागा आल्या. आमच्या १७ जागा आल्या. हा जनतेचा कौल असल्याचे आम्ही मान्य केलं. त्यावेळी ईव्हीएमबद्दल कुणी बोललं नाही.बारामतीमध्ये मी जो उमेदवार उभा केला होता तो ४८ हजार मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच सात महिन्यांनी निवडणुका आल्या. त्या निवडणुकीत मीच ४८ हजारांची भर काढून १ लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आलो. जनतेचा कौल आहे. जनताच म्हणत होती लोकसभेला ताईला आणि विधानसभेला दादाला. त्यामध्ये जनतेने कुणाचं ऐकलं नाही. जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार," असा सवाल अजित पवार यांनी केला.

"१९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीत लोकांनी वाजपेयींना मतदान केलं आणि विधानसभेला विलासराव देशमुखांना केले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. मतदार लोकसभेला शरद पवारांना आणि विधानसभेला मला मतदान करत होता. तरीही शरद पवारांना ८५ हजार तर मला ५० हजारांचे मताधिक्य मिळालं. त्यावेळी मी असं म्हटलं नाही की मला २५ हजार मते कमी का पडली. हा लोकांचा कौल होता आणि तो मान्य केला पाहिजे," असंही अजित पवार म्हणाले.

"काही पराभूत उमेदवार मला सांगतात की आमचा पराभव झाला. मी त्यांना सिद्ध करुन दाखवा असं सांगतो. नाना पटोले परवा म्हणाले की संध्याकाळी कसं मतदान वाढलं. साडेचार आणि पाचच्या पुढे लोक रांगेत आले मग त्यांना आतमध्ये घेतलं. माझ्या इथे सकाळी सात ते नऊ पाच टक्के मतदान झालं होतं. त्यानंतर मतदान संपेपर्यंत टक्केवारी १५ टक्क्यांनी वाढली. त्याला आमचा काय दोष आहे. मतदारांनी कधी रांगेत यायचं आणि कधी मतदान करायचं तेच ठरवणार," असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारBaba Adhavबाबा आढावEVM Machineईव्हीएम मशीन