शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मुख्यमंत्री महोदय, मागच्यांच्या नावाने पावती का फाडता : अजित पवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 20:53 IST

भाजप सरकारला सत्तेत येऊन चार वर्ष झाली आहेत, मात्र अजूनही मुख्यमंत्री महोदय मागच्या सरकारच्या नावाने पावत्या का फाडत आहे असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. 

पुणे : भाजप सरकारला सत्तेत येऊन चार वर्ष झाली आहेत, मात्र अजूनही मुख्यमंत्री महोदय मागच्या सरकारच्या नावाने पावत्या का फाडत आहे असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपयशाचे खापर मागील सरकारवर फोडले जाते यावर बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा समाचार घेतला.सरकारला सत्तेत येऊन चार वर्ष झाल्यावर त्यांनी राज्याच्या प्रश्नासाठी मागच्या सरकारच्या नावाने पावती फाडू नये अशा शब्दात ठणकावले. एक वर्ष ठीक होते पण आता त्यांनी कर्तृत्व दाखवावे असे आव्हानही त्यांनी दिले. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे शिकवणी लावावी या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या बहिणीने ते माझ्या प्रेमाखातर ते विधान सोशल मीडियावर टाकलं असलं तरी मुख्यमंत्री उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या आणि माझ्या पक्षाची ध्येयधोरण वेगळी आहेत, असं कोणी कोणाकडे शिकवणीला जात नसतात असेही ते म्हणाले. 

निरंजन डावखरे यांना भाजपमध्ये जाण्याआधी मी ''तुझ्या वडिलांनाही हे आवडले नसते, शरद पवार यांनी त्यांना २४वर्ष आमदारपद दिले, १८ वर्ष उपसभापतीपद दिले''याची आठवण करून दिली. मात्र काहीजण उगवत्या सूर्याला मदत करतात, काही निष्ठेला महत्व देतात अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुण्यातील खासदारकीची जागा राष्ट्रवादी लढवणार या पवार यांच्या विधानाने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. त्यावर पवार यांनी असा काही निर्णय झाला असून वरिष्ठ अंतिम निर्णय घेतील सांगून पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेस