शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सरकारचा दरारा नाही, काय वाटेल ते सुरू आहे- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 10:05 IST

पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या दडपशाहीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे ट्वीट केले. त्यांनी असे करू नये म्हणून त्यांना सांगणार आहे...

पुणे : राज्यात सरकारचा दरारा राहिलेला नाही. बैलगाड्यांच्या शर्यतींत गोळीबार होतो. कोणीही काहीही गलिच्छ बोलतात. जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन-दोन वेळा गुन्हे दाखल होतात. हे सगळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चिन्ह असून, राज्याला ते परवडणारे नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते सोमवारी सकाळी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झाले. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही उपस्थित होते. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोघांचेही स्वागत केले.

पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या दडपशाहीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे ट्वीट केले. त्यांनी असे करू नये म्हणून त्यांना सांगणार आहे. राजकारणात चढ-उतार येत असतात. आरोप होतात, टीका होते, त्याचा अर्थ ते सगळं खरं असतंच असं नाही. खुद्द पवार साहेबांवर कितीतरी आरोप झाले. आव्हाड यांच्याबाबतीत नक्की काय झाले, याची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घ्यावी. ते संविधान बचाव मोहिमेत असतात. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार सांगतात. त्यांना अटक कशी होते. कलमे कोणती लावतात. हे सगळे पोलिस कोणाच्या तरी सांगण्याने वागतात, असे वाटत आहे.

राज्य कारभारावर लक्षच नाही

राज्याला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून माेठी परंपरा आहे. सध्या जे चालले आहे ते राज्याला परवडणारे नाही. पूर्वीच्या सरकारने योग्य निर्णय घेतला नाही, असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कायम सांगतात. चांगले झाले तर त्यांनी केले, वाईट झाले तर ती आमची चूक असे चालणार नाही. किती दिवस आमच्या नावाने खडे फोडणार आहेत. सहा महिने झाले तरीही यांचे राज्य कारभारावर लक्ष नाही.

सरकारच्या कारभाराविरोधात आम्ही आवाज उठवत आहोत. आव्हाड यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. गर्दीमधून जाताना एखाद्याला धक्का लागला तर तो विनयभंग होत नाही. ज्यांना धक्का लागला म्हणतात त्या भगिनी भाजपच्या पदाधिकारी आहेत, यावरून जाणीवपूर्वक ते कलम लावून गुन्हा दाखल झाला आहे, असे स्पष्ट दिसते.

- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवार