शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अजित पवार म्हणाले की,  किमान तीन मंत्रीपदं पुणे जिल्ह्याला मिळावीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 19:46 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी किमान तीन मंत्रीपदं पुणे जिल्ह्याला मिळावीत अशी मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशीही बोललो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी किमान तीन मंत्रीपदं पुणे जिल्ह्याला मिळावीत अशी मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशीही बोललो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमानंतर बोलताना पवार यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरही मत मांडले. ते म्हणाले की, 'पुणे जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक ताकद दिली आहे. त्यामुळे मंत्रीपदाच्या किमान तीन जागा जिल्ह्याला मिळायला हव्यात असे मी शरद पवार यांना सांगितले आहे.आत्ता झालेले खातेवाटप हा तात्पुरता  विस्तार आहे.  अधिवेशनात उत्तर देण्यासाठी झालेला हा विस्तार आहे.  या महिन्याच्या अखेरीस तीनही पक्ष मिळून मुख्य विस्तार करतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. 

  तुम्हीच पालकमंत्री व्हा या पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाला उत्तर देताना  त्यांनी जिथं राष्ट्रवादीची ताकद आहे, तिथलं पालकमंत्री पद राष्ट्रवादीला मिळेल. डिसेंबरच्या शेवटच्या याचा निर्णय होईल. जो कोणी पालकमंत्री होईल त्याला विश्वासात घेऊन काम करू याचा अर्थ समजून घ्या की असेही सांगायला ते विसरले नाहीत.   

यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • मंत्रीमंडळातील सहभागाबद्दल तीनही पक्षांचे वरिष्ठ निर्णय घेतील. 
  • कालपर्यत जे तिकडे होते, ते आज बुके घेऊन इकडे आले, तुम्ही लगेच पाघळता  
  • पंकजा मुंडे आणि भाजप हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न त्यात नाक खूपसण्याची गरज नाही. 
  • महाविकासआघाडीचे सरकार आले  म्हणून अतिउत्साह दाखवून उतू नका, मातू नका, जमिनीवर पाय ठेवून काम करा.  
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार