शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Pune मेट्रोबाबत अजित पवार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत नाही? मुरलीधर मोहोळ यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 17:47 IST

लकडी पुलावरील मेट्रोचं कामकाज अनेक दिवसांपासून रखडल्याने आज पुणे महापालिका सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला

पुणे : लकडी पुलावरील मेट्रोचं कामकाज अनेक दिवसांपासून रखडलं आहे. त्यावरुन आज पुणे महापालिका सभागृहात विरोधक गोंधळ घालतात. गणेश मंडळांच्या बाजूने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे यांनी कल दिला. ज्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारपर्यंत सभागृहाचं कामकाज तहकूब केलं. या सर्वप्रकाराबाबत महापौरांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय.

यावेळी मोहोळ म्हणाले, ''अजित पवारांनी पोलीस देखरेखीत पुणे मेट्रोचं काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. या बाबतीत स्पष्ट उल्लेख मेट्रोनं पुणे महापालिकेला दिलेल्या पत्रात केला आहे. जेव्हा लकडी पुलावरचं मेट्रोचं काम थांबवण्यात आलं त्यानंतर या कामावर आक्षेप घेणाऱ्या शहरातील गणेश मंडळांसोबत महापालिका प्रशासनाची बैठक झाली. गणपती मिरवणूक या पुलावरुन जाताना मेट्रोमुळे अडचण येईल म्हणून हे काम रोखण्यात आलं होतं. मात्र मेट्रोचं काम सुरु राहील, असं या बैठकीत ठरलं. तेव्हा गणेश मंडळं या निर्णयावर तयारही झाली होती. तरीही मेट्रोचं काम सुरु होऊ नये म्हणून गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी पुलावर जाऊन आंदोलनं केलीत. ज्यानंतर गणेश मंडळांनी मेट्रो कामाबाबतीत सुचवलेले पर्याय आणि मेट्रोची बाजू जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो पदाधिकाऱ्यांशी बैठकीत चर्चा केली. ज्यानंतर बैठकीत ठरलेल्या बाबींची माहिती मेट्रोकडून एक पत्र लिहून पुणे महापालिकेला देण्यात आलीये. एकीकडे उपमुख्यमंत्री मेट्रोचं काम सुरु करण्याचे आदेश देतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी महापालिका सभागृहात गोंधळ घालतात.''

मेट्रोच्या तांत्रिक विभागाकडून दोन पर्याय पुणे महापालिकेला सुचवले आहेत.

१. आता जर पुलाची उंची २१ फूटाहून ३० फूटापर्यंत न्यायची असेल. तर आता बांधकाम झालेले नदीपात्रातील १७ पिलर पाडावे लागतील. त्याला २७ कोटी अतिरिक्त खर्च येईल. हे काम पुन्हा व्हायला त्या वेळेपासून पुढे दिड वर्षाचा कालावधी लागेल.२. जर या पुलाची उंची ४० फूट वाढवायची असेल, तर नदीपात्रातील एकुण ३८ पिलर पाडावे लागतील. ७९ कोटी त्यासाठी खर्च येईल. अधिकचे दोन वर्ष मेट्रोचं काम करायला लागतील. 

मात्र, पुणे महापालिकेनं त्यानंतर मेट्रो अधिकारी आणि गणेश मंडळ यांच्याशी या पर्यायांवर चर्चा केली. हे पर्याय खर्च आणि वेळ यांबाबतील सुयोग्य नव्हते. त्यामुळे महापौरांनी मेट्रोच्या कामाला हरकत नसल्याचं स्पष्ट केलं. 

टॅग्स :Metroमेट्रोMayorमहापौरAjit Pawarअजित पवारGanesh Mahotsavगणेशोत्सव