शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री- मुख्यमंत्री करु नका; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 15:56 IST

आज पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रम पार पडला.

Ajit Pawar ( Marathi News ) : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस मधील कार्यकर्ते अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करत आहेत. याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. "जरा कळ सोसा, सारखं सारखं मुख्यमंत्री करु नका, आधी संघटना बांधू ती मजबूत करु, असा सल्ला आजित पवारांनी दिला. आज पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रम पार पडला. यावेळी अजितदादांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

"आता आपल्याला विकासावर लक्ष द्यायचं आहे, महिला धोरण आपण आणलं आहे. काळानुरुप काही बदल करायचे असतात. युवकांसाठी आपण २०१२ मध्ये धोरण आणलं होतं. आपण लोकशाहीत काम करतो. बहुमताला आदर देऊन त्यांना संधी द्यावी लागते, आपल्या जिल्हा अध्यक्षांनी खालच्या पदाधिकाऱ्यांकडून जास्त अपेक्षा ठेऊ नये. आपल्या पक्षात निवड करताना जातीपातीचा विचार केला नाही पाहिजे. आम्ही आमच्या उमेदीच्या काळात नव्या जबाबदाऱ्या स्विकारल्या त्यामुळे आता इथेपर्यंत येऊन पोहोचलो, असंही अजित पवार म्हणाले. 

ईडीने कारवाई केलेल्या नेत्यांमध्ये एकही भाजप नेता नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

"२००४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता पण त्यावेळी काय झालं आपल्याला माहित आहे. पण आता थोड कळ सोसा लगेच मुख्मंत्री मुख्यमंत्री अस करुन नका. आधी आपण संघटना मजबूत करुया, असंही पवार म्हणाले. आपल्या पक्षात लोक प्रवेश करत आहेत, त्यांना आपला विश्वास वाटत आहे.आपण बेरजेचं राजकारण करायचं आहे. आता फक्त आम्हीच काम करुन चालणार नाही, सर्वांनी काम करायला पाहिजे. आपल्याला बहुजन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या पक्षातील अनेकांच्या समस्या होत्या पण आपले वरिष्ठ काही समजून घेत नव्हते म्हणून हा निर्णय घ्यावा लागला. निर्णय कसे धाडसाने घ्यायचे असतात याची आम्हाला समज आहे, तरुण-तरुणींना त्यांचा रोजगार देता आला पाहिजे. त्याकरता आपण महायुतीमध्ये आपण गेलो आहे. आज देशात नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही,असंही अजित पवार म्हणाले. 

"आपल्या पक्षाचे भवितव्य तुम्ही आहात. आपल्या पक्षाने कायम बहुजनांचा विचार केलेला आहे. आपण कुठल्याही परिस्थितीत कमी पडायचे नाही. आपण सत्तेत गेलो तरीही आपली विचारधारी तिच आहे. विचार बदलेले नाहीत. तुम्हाला आता कोणाचेही फोन येतील तुम्ही लगेच हळवे होऊ नका, मी सगळ्यांना फोन करायला लागलो तर काम कधी करु, मला काम सांगा मी करुन देतो, असंही पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार