शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त वक्तव्य करून उमेदवारची मते घटणार नाहीत, त्याची काळजी घ्या, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

By नितीन चौधरी | Updated: April 11, 2024 19:09 IST

विरोधक सध्या मतदारांच्या मनात शंकाकुशंका निर्माण करण्याचे काम करत आहेत

पुणे: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी अनेकदा वादात सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी मात्र, मतदारांशी बोलताना डोक्यावर बर्फ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ‘मी सकाळी उठल्यावर चिडायचे नाही, आवाज वाढवायचा नाही असे स्वतःला बजावत असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील मतदारांशी बोलताना सत्तेचा दर्प येणार नाही याची याचे भान ठेवावे,’ असा वडीलकीचा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला. वादग्रस्त वक्तव्य करून उमेदवारची मते घटणार नाहीत, त्याची काळजी ही कार्यकर्त्यांनी घ्यावी असेही ते यावेळी म्हणाले.

पुण्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आयोजित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, धीरज घाटे, दीपक मानकर, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव पाटील यावेळी उपस्थित होते.

निवडणुकीत पुण्यातील मतदारांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे महायुतीतील सहकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असून रुसवे फुगवे दूर करून विरोधकांना धूळ चारावी, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले. मतदारांची स्मरणशक्ती छोटी असल्याने मोदी यांनी केलेले काम मतदारांना पुन्हा सांगावे लागणार आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी कोणतेही हेवेदावे न बाळगता कामाला लागावे, असा सल्लाही त्यांनी दिला. लोकसभेची निवडणूक ही विधानसभा निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम असल्याचे ते यावेळी म्हणाले.

विरोधक सध्या मतदारांच्या मनात शंकाकुशंका निर्माण करण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. कोणताही उमेदवार कमकुवत नसून मतदार राजा कोण निवडून येईल हे ठरवतो. केवळ विरोधासाठी विरोध केल्यास विकास होत नाही ही पुणेकरांना पटवून द्यावे लागेल. कार्यकर्त्यांनी एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जाऊया असे सांगून कार्यकर्त्यांनी वादग्रस्त कृती किंवा वक्तव्य टाळावे. मतदारांशी बोलताना उमेदवाराची मते घटणार नाहीत, याची काळजी घ्यावी. एखादा मतदार मत देणार नाही असा सांगत असल्यास त्याला विरोध करू नये. मतदाराला मत देण्याचा अधिकार असून आपल्याला मत मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अशा मतदाराला विरोध करून मत नाही दिले तर गेला उडत अशी भूमिका ठेवल्यास तुम्ही राहाल तिथेच राहाल पण उमेदवार मात्र उडून जाईल, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मी रोज सकाळी उठल्यावर लोकांना भेटायला जातो, तेव्हा डोक्यावर बर्फ ठेवून जातो. आज चिडायचे नाही आवाज चढवायचा नाही, असे स्वतःला बजावत असतो. गमतीचा भाग सोडल्यास लोकांशी नम्रतेने वागा. केंद्र व राज्य राज्यात आपले सरकार आहे त्यामुळे आपल्याला सत्तेचा दर्प येणार नाही याची काळजी घ्यावी. शेवटच्या कार्यकर्त्यांनी तसेच व्यासपीठावरील सर्वांनी याचे भान ठेवले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला.

टॅग्स :Puneपुणेlok sabhaलोकसभाAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४