शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

वर्षभरात लाख घरांपर्यंत वायू वाहिनी पोहोचवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “येत्या वर्षभरात शहरातल्या एक लाख घरांपर्यंत नैसर्गिक वायू वाहिनी पोहोचवणार आहे. यासाठी येणाऱ्या तांत्रिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “येत्या वर्षभरात शहरातल्या एक लाख घरांपर्यंत नैसर्गिक वायू वाहिनी पोहोचवणार आहे. यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि इतर परवान्यांमधल्या समस्या सोडवल्या जातील,” अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली.

महाराष्ट्र नँचरल गँस लिमीटेड (एमएनजीएल)ला पंधरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत बापट बुधवारी (दि. १३) बोलत होते. एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे, कार्यकारी संचालक एस. हलदार, वाणिज्य संचालक संतोष सोनटक्के यावेळी उपस्थित होते.

बापट म्हणाले की, एमएनजीएलच्या माध्यमातून शहरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यात मोठे यश आले आहे. शहरातील सार्वजनिक बस सेवेच्या सुमारे दीड हजार गाड्या तर पन्नास हजार रिक्षा आता पारंपरिक इंधनाऐवजी नैसर्गिक वायू वापरतात. भविष्यात हे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न आहे. “कोरोना काळात ‘एमएनजीएल’ने सीएसआरमधून दिलेल्या निधीमधून रिक्षाचालकांना रोख रकमेची तसेच अनेक गरजूंना आवश्यक मदत करता आली,” असेही त्यांनी सांगितले.

पांडे यांनी सांगितले की, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही आता एमएनजीएलचे काम सुरु होणार आहे. या नव्या भागातील रिक्षा चालकांना ‘गँस कीट’साठी मदत केली जाणार आहे. एका गँस कीटला तीस हजार रुपये खर्च आहे. यावरील व्याज ‘एमएनजीएल’ भरणार आहे. सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षाला प्रती किलोमीटर १ रुपये तीस पैसे खर्च येतो तर डिझेलवरील रिक्षाचा खर्च किलोमीटरला ३ रुपये वीस पैसे आहे. शिवाय यातून वायू प्रदूषणही थांबते.

चौकट

पाचशे रुपयात कनेक्शन

“एका कनेक्शनसाठी सहा हजार रुपये तर एका घरापर्यंत कनेक्शन पोहोचवण्यासाठी एमएनजीएलला पंधरा हजार रुपये खर्च येतो. या पार्श्वभूमीवर केवळ पाचशे रुपयात कनेक्शन देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मोठ्या सोसायट्यांनी एकदम नोंदणी केल्यास सवलत देण्याचाही विचार करता येईल.”

-राजेश पांडे.

चौकट

‘एमएनजीएल’ देशात चौथी

दर दिवशी १० लाख क्युबीक मीटर वायूचा पुरवठा एमएनजीएलतर्फे सध्या केला जातो. नैसर्गिक वायू क्षेत्रात देशात असणाऱ्या चाळीस कंपन्यांमध्ये एमएनजीएल चौथ्या क्रमाकांवर आहे. पुण्यात ३ लाखांपेक्षा जास्त घरगुती जोडण्या देण्यात आल्या आहेत. तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेततल्या सतराशे गाड्या नैसर्गिक वायू वापरतात. शिवाय, चाकण तळेगाव औद्योगिक वसाहतीमधल्या २२० उद्योगांनाही वायू पुरवठा केला जातो.