शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कृषी पर्यटनाला चालना देणार - सुरेश गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 03:11 IST

खेड तालुक्यात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी पीक पद्धतीत बदल करून आधुनिकतेची जोड मिळाली तर सकारात्मक भूमिका शेतकरीच बदलू शकतो, असे मत आमदार सुरेश गोरे यांनी व्यक्त केले.

राजगुरुनगर - खेड तालुक्यात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी पीक पद्धतीत बदल करून आधुनिकतेची जोड मिळाली तर सकारात्मक भूमिका शेतकरीच बदलू शकतो, असे मत आमदार सुरेश गोरे यांनी व्यक्त केले.चांडोली (ता. खेड) येथील जिल्हा फळरोपवाटिकेत कृषी विभागाच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), ग्रामस्वराज्य अभियान आयोजित किसान कल्याण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार गोरे बोलत होते.याप्रसंगी प्रांताधिकरी आयुष प्रसाद, कृषी उपविभागीय अधिकारी संगीता माने, तालुका कृषी अधिकारी अ‍ॅड. लक्ष्मण होटकर, पंचायत समिती कृषी अधिकारी मनोज कोल्हे, मंडल अधिकारी नरेंद्र वेताळ, आर. बी. बारवे, शेतकरी सेना तालुकप्रमुख एल. बी. तनपुरे, संभाजी कुडेकर, बाळासाहेब खैरे आदींसह शेतकरी आणि कृषी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गोरे म्हणाले, की पीक पद्धतीत बदल करून सकारात्मक भूमिकेत शेती करणे काळाची गरज आहे. आज शेतकरी २४ तास शेतीत राबत आहे. मात्र, या बेभरवासाचा कारखाना चालवताना अनेक अडचणीवर मात करून आपली उपजीविका चालवताना कर्जबाजारी होत असल्याने नकारात्मक भुमिका तयार होत आहे. या शेतीला जोड व्यवसायाशिवाय पर्याय नाही. तालुक्याची भौगोलिक रचना पहाता पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिचंन होऊनही बाजारपेठेत शेतीमालाला हमी भाव मिळत नाही तोपर्यंत बळीराजाचे जीवनमान उंचवणार नाही.यावेळी तालुक्यातील शेती क्षेत्रात विविध तंत्रज्ञान वापरुन आधुनिक पद्धतीने शेती पिके घेणाऱ्या आदर्श शेतकरी चितांमण हांडे (धामणगाव खुर्द), दत्तात्रय मोरमारे (टोकावडे), भगवंता शिंदे (रोहकल), बाबूराव पिचड (आंबोली), बाळासाहेब पानसरे (निघोजे), सीताबाई जाधव ( चिबंळी), भाऊ केदारी (दोंदे), कैलासराव ठाकुर (पिपंरी), कैलास डावरे (पिपंरी), दिलीप नाईकडे (कमान), मारुती गडदे (पाईट), रामदास लांडगे, सतीश जैद (बुरसेवाडी) आणि सह्याद्री स्कूलच्या समन्वयक दीपा मोरे यांचा सत्कार करण्यात आला.या एकदिवशीय कार्यशाळेतील तालुक्यातील उपस्थित शेतकºयांना शैलेंद्र घाडगे, डॉ. सलिम शेख, श्री कुºहाडे पाटील, धनेश पडवळ, दीपा मोरे यांनी शेतीविषयक विषयावर मार्गदर्शन केले. अनेक शेतकºयांनीदेखील त्यांच्या हलाखीचे वर्णन सांगून लोकप्रतिनिधी व कृषी अधिकारी यांच्याकडून असलेल्या अपेक्षा बेधडकपणे मांडल्या.सूत्रसंचालन मंडल अधिकारी वसंतराव खंडागळे यांनी तर आभार डी. एन. गायकवाड यांनी मानले.सामूहिक शेती पद्धतीची आज काळाची गरज आहे. शेती पिके थेट बाजारपेठेत विक्री करण्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन व्यवस्थापन करून शेती फायदेशीर असूनही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे.- आयुष प्रसाद, प्रांताधिकारी

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या