शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पर्यटनाला चालना देणार - सुरेश गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 03:11 IST

खेड तालुक्यात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी पीक पद्धतीत बदल करून आधुनिकतेची जोड मिळाली तर सकारात्मक भूमिका शेतकरीच बदलू शकतो, असे मत आमदार सुरेश गोरे यांनी व्यक्त केले.

राजगुरुनगर - खेड तालुक्यात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी पीक पद्धतीत बदल करून आधुनिकतेची जोड मिळाली तर सकारात्मक भूमिका शेतकरीच बदलू शकतो, असे मत आमदार सुरेश गोरे यांनी व्यक्त केले.चांडोली (ता. खेड) येथील जिल्हा फळरोपवाटिकेत कृषी विभागाच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), ग्रामस्वराज्य अभियान आयोजित किसान कल्याण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार गोरे बोलत होते.याप्रसंगी प्रांताधिकरी आयुष प्रसाद, कृषी उपविभागीय अधिकारी संगीता माने, तालुका कृषी अधिकारी अ‍ॅड. लक्ष्मण होटकर, पंचायत समिती कृषी अधिकारी मनोज कोल्हे, मंडल अधिकारी नरेंद्र वेताळ, आर. बी. बारवे, शेतकरी सेना तालुकप्रमुख एल. बी. तनपुरे, संभाजी कुडेकर, बाळासाहेब खैरे आदींसह शेतकरी आणि कृषी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गोरे म्हणाले, की पीक पद्धतीत बदल करून सकारात्मक भूमिकेत शेती करणे काळाची गरज आहे. आज शेतकरी २४ तास शेतीत राबत आहे. मात्र, या बेभरवासाचा कारखाना चालवताना अनेक अडचणीवर मात करून आपली उपजीविका चालवताना कर्जबाजारी होत असल्याने नकारात्मक भुमिका तयार होत आहे. या शेतीला जोड व्यवसायाशिवाय पर्याय नाही. तालुक्याची भौगोलिक रचना पहाता पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिचंन होऊनही बाजारपेठेत शेतीमालाला हमी भाव मिळत नाही तोपर्यंत बळीराजाचे जीवनमान उंचवणार नाही.यावेळी तालुक्यातील शेती क्षेत्रात विविध तंत्रज्ञान वापरुन आधुनिक पद्धतीने शेती पिके घेणाऱ्या आदर्श शेतकरी चितांमण हांडे (धामणगाव खुर्द), दत्तात्रय मोरमारे (टोकावडे), भगवंता शिंदे (रोहकल), बाबूराव पिचड (आंबोली), बाळासाहेब पानसरे (निघोजे), सीताबाई जाधव ( चिबंळी), भाऊ केदारी (दोंदे), कैलासराव ठाकुर (पिपंरी), कैलास डावरे (पिपंरी), दिलीप नाईकडे (कमान), मारुती गडदे (पाईट), रामदास लांडगे, सतीश जैद (बुरसेवाडी) आणि सह्याद्री स्कूलच्या समन्वयक दीपा मोरे यांचा सत्कार करण्यात आला.या एकदिवशीय कार्यशाळेतील तालुक्यातील उपस्थित शेतकºयांना शैलेंद्र घाडगे, डॉ. सलिम शेख, श्री कुºहाडे पाटील, धनेश पडवळ, दीपा मोरे यांनी शेतीविषयक विषयावर मार्गदर्शन केले. अनेक शेतकºयांनीदेखील त्यांच्या हलाखीचे वर्णन सांगून लोकप्रतिनिधी व कृषी अधिकारी यांच्याकडून असलेल्या अपेक्षा बेधडकपणे मांडल्या.सूत्रसंचालन मंडल अधिकारी वसंतराव खंडागळे यांनी तर आभार डी. एन. गायकवाड यांनी मानले.सामूहिक शेती पद्धतीची आज काळाची गरज आहे. शेती पिके थेट बाजारपेठेत विक्री करण्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन व्यवस्थापन करून शेती फायदेशीर असूनही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे.- आयुष प्रसाद, प्रांताधिकारी

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या