शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मास्क न लावता आंदोलन करणे पडले महागात; ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 11:28 IST

कचऱ्याचे कंटेनर गणेश विसर्जनासाठी दिल्यामुळे भावना दुखाविल्याचे कारण देत आंदोलन

ठळक मुद्देशिवाजीनगर पोलिसांनी केला त्यांच्याविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल

पुणे : गणेश विसर्जनासाठी कचर्‍याचे कंटेनर पाठवून हिंदु धर्मातील गणेश भक्तांच्या भावना दुखाविल्याच्या कारणावरुन मास्क न लावता आंदोलन करणे ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकार्‍यांना चांगलेच महागात पडले. फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याने त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आनंद कन्हैयालाल दवे (वय ४७, रा. गुरुवार पेठ), निलेश श्रीकांत जोशी (वय ३९, रा. आनंदनगर, वडगाव), मनोज सदाशिव तारे (वय ४४, रा. कळस), तुषार नंदकुमार निंबर्गी (वय २८, रा. शिवणे), सौरभ मनोहर वैद्य (वय २६, रा. मांजरी), दिलीप सुरेश तांबेकर (वय ५२, रा़ कोथरुड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.महापालिकेने नवीन कंटेनरमध्ये गणेश विसर्जनाची सोय केली आहे. मात्र, हे कचर्‍याचे कंटेनर असून त्यामुळे आमच्या भावना दुखाविल्याचा दावा करत ब्राह्मण महासंघाच्या या पदाधिकार्‍यांनी सोमवारी महापालिकेसमोर आंदोलन केले. त्यात त्यांनी महापालिकेचे प्लॅस्टिकचे फोटो असलेला फलक पाण्याच्या बादलीत बुडविला. पुणे महानगर पालिका निषेध असो अशा घोषणा दिल्या.हे आंदोलन करताना त्यांनी पूर्व परवानगी घेतली नाही. सह पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग करुन तोंडाला मास्क न लावता कोवीड १९ साथ रोगाचा संसर्ग होईल, असे घातकी कृत्य करुन आंदोलन केले. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला. त्या सर्वांना पोलिसांनी फरासखाना येथे घेऊन गेले. त्यानंतर त्यांची नोंद करुन घेऊन सर्वांची जामिनावर सुटका केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसGanesh Mahotsavगणेशोत्सवPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाbrahman mahasanghब्राह्मण महासंघ