शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

बारामतीचा निकाल पाहून अजित पवार म्हणाले...; आता काय कपाळ फोडावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 17:57 IST

पुण्यातील अल्पबचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते

पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा शिक्षक पुरस्काराच्या कार्यक्रमात बारामती तालुक्यातील निकाल वाचताना नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या ५ वी आणि ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुण वाचून दाखवताना ज्या तालुक्यातील निकाल शुन्य टक्के लागला आहे. त्या तालुक्यातील शिक्षकांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांचे कान टोचले. यावेली, बारामती आणि हवेली तालुक्यातील कामगिरीवरही भाष्य केलं. हवेतील शिक्षक बदल्यांसाठी सारखं येतात, पण विद्यार्थ्यांचा निकाल हा असा, असे म्हणत त्यांनी स्पष्टपणे भाष्य केलं. 

पुण्यातील अल्पबचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, सुनंदा वाखारे, कमलाकांत म्हेत्रे, रणजित शिवतारे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जिल्हा परिषद शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल मी गायकवाडकडून विचारत होतो. त्यावेळी, त्यांनी सांगितलं, १९-२०,२०-२१,२१-२२ या कालावधीतील देखील निकाल माझ्यासमोर आहेत. इयत्ता ५ वीचा यंदाचा आणि गतवर्षीचा निकाल साधारण सारखाच लागलेला आहे. गेल्यावर्षी ६४० विद्यार्थी-विद्यार्थींनी गुणवत्ताधारक म्हणून आले होते, यंदाही ६४० च आलेले आहेत. तर, आठवीचे गेल्यावर्षी ७० होते, यंदा ८३ आले आहेत. दरम्यान, गेल्या ४ वर्षांतील निकाल पाहिला असता, यंदा सर्वात चांगला निकाल लागलेला आहे. त्यामुळे, सर्वच शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थींनींचं मी कौतुक करतो, असे म्हणत अजित पवार यांनी शिष्यवृत्ती निकालाची माहिती दिली. 

पुणे जिल्ह्यात शिष्यवृत्ती निकाल जरी चांगला लागला असली तरी काही तालुके मागे राहिले आहेत. आपल्या १३ तालुक्यात ८ वीचे ८३ विद्यार्थी गुणवत्ताधारक झाले, त्यात सर्वाधिक शिरुर तालुक्यातील आहेत. ८३ पैकी ४२ विद्यार्थी शिरुर तालुक्यातील आहेत. आंबेगाव तालुक्याचे १५ आले, तिसरा खेड १४, चौथा मुळशी तालुका ५, मावळ तालुक्यात ४ विद्यार्थी आले आणि वेल्हा तालुक्याचे ३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. तर, शून्य निकाल बारामतीचा लागला, आता काय कपाळ फोडावं, असे म्हणत अजित पवारांनी बारामतीच्या निकालावर थेट नाराजी व्यक्त केली. 

आमची लोकं काय करतात, आम्ही मर-मर सकाळी ६ वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो. शिरुरचे माझे शिक्षक, शिक्षिका आणि स्टाफ यश मिळवू शकतो. आंबेगाव, खेडचा मिळवू शकतो अन् आम्ही शून्य, असे म्हणत अजित पवार यांनी बारामती शिष्यवृत्ती निकालावर थेट नाराजी व्यक्त केली. दौंड शून्य, हवेली शून्य, द्या हवेलीत तर सगळ्या शिक्षकांना बदल्या पाहिजे असतात. दादा हवेली द्या, दादा पुण्याच्याजवळ द्या, असे म्हणत अजित पवार यांनी शिक्षकांच्या गुणवत्तेवरच थेट सवाल उपस्थित केला. आपल्या तालुक्यातील निकाल शुन्य ही बाब समाधानकारक नाही, असेही अजित पवार म्हणाले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसEducationशिक्षणScholarshipशिष्यवृत्तीBaramatiबारामती