शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

प्रदूषणाच्या विरोधात जनआक्रोशानंतर कुरकुंभमध्ये कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:05 IST

कुरकुंभ (ता. दौंड) येथील ग्रामस्थांनी प्रदूषणाच्या विरोधात जनआक्रोशानंतर संपूर्ण गाव बंद ठेवून आज होणा-या तहसीलदार यांच्या बैठकीस जनमानसात आक्रोश किती पसरला आहे, हे दाखवून दिले.

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील ग्रामस्थांनी प्रदूषणाच्या विरोधात जनआक्रोशानंतर संपूर्ण गाव बंद ठेवून आज होणा-या तहसीलदार यांच्या बैठकीस जनमानसात आक्रोश किती पसरला आहे, हे दाखवून दिले. प्रदूषणाच्या विषयावर बोलावलेल्या या बैठकीस खुद्द तहसीलदारच गैरहजर राहिले, तसेच प्रदूषण मंडळाच्या अधिका-यांनीदेखील तहसीलदारांच्या पत्राला केराची टोपली दाखवली. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. पुढील बैठकीस कुठलेही कारण पुढे न करण्याची मागणी करीत निवेदन दिले.कुरकुंभ येथील ग्रामस्थांनी रासायनिक प्रकल्पाच्या मुजोरीपणाला कंटाळून शेवटी जनआक्रोश व्यक्त करीत कुरकुंभ येथील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला जाब विचारला. त्यामुळे गोंधळ उडालेल्या या केंद्राने प्रक्रिया बंद ठेवून ग्रामस्थांच्या विरोधाला उत्तर देण्याऐवजी अन्य मार्गाद्वारे ग्रामस्थांना घाबरून सोडण्याचे काम केले. परिणामी या सर्व प्रकारावर दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी दखल घेत बैठक आयोजिण्याचे व निष्कर्ष काढण्याचे संकेत दिले. त्याप्रमाणे त्यांनी लेखी पत्राद्वारे ग्रामस्थांना व प्रदूषणासंबंधी सर्व अधिकाºयांची बैठक आयोजिली, मात्र ऐन वेळेस बैठकीला बगल देत ग्रामस्थांच्या संतापाला फुंकर मारली आहे.कुरकुंभ येथे वर्षानुुवर्र्षे चालत आलेल्या प्रदूषणाच्या विषयाला नुकतीच चालना मिळाली असून या ठिकाणचा तरुणवर्ग पेटून उठला आहे. मुजोर कंपनीच्या मालकांनी पैशाच्या जोरावर आतापर्यंत या विषयावर शासकीय अधिकारी, प्रदूषण मंडळ इत्यादींना हाताशी धरून राजरोसपणे सांडपाणी उघड्यावर सोडून कुरकुंभ, पांढरेवाडी व परिसरातील पर्यावरण, हजारो एकर जमीन व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे तरुणवर्गाने या प्रश्नावर प्रशासनासहित प्रदूषण मंडळ व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला धारेवर धरले असून याबाबत दूरगामी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील मोठमोठे प्रकल्पदेखील सामूहिक सांडपाणी केंद्रात रासायनिक सांडपाणी सोडत आहेत. त्यामुळे या मोठ्या उद्योगांना स्वत:ची प्रक्रिया केंद्रे उभारणे गरजेचे आहे. जेणेकरून या सामूहिक केंद्रातील प्रक्रिया होणारे रासायनिक पाण्यावर नियंत्रण ठेवता येईल. सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात फक्तलहान उद्योगांना पाणी सोडण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. त्यामुळे या केंद्राची कार्यक्षमता वाढेल. या उद्योगसमूहातील काही उद्योग झीरो डिस्चार्ज (शून्य सांडपाणी सोडण्याचा उद्योग) चालवत आहेत. त्यामुळे त्या उद्योगांनीदेखील सांडपाणी कुठेही गैररीत्या सोडू नये, एवढीच अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत. या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांचा या औद्योगिक क्षेत्रातील कुठल्याच उद्योगांना विरोध नसून बेकायदेशीरपणे सांडपाणी उघड्यावर सोडणा-या कंपनी व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला असल्याचे दिसत आहे.प्रदूषण मंडळाचे दुर्लक्षकुरकुंभ ग्रामस्थांच्या प्रदूषणविरोधात जनआक्रोशाला जवळपास महिना उलटत आला तरीदेखील महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा एकही अधिकारी कुरकुंभ येथे फिरकला नाही. आज तहसीलदारांनी बोलावलेल्या बैठकीलादेखील त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रदूषण मंडळाचा दुर्लक्षपणा स्पष्टपणे उघडकीस आला आहे.शासनाने नियुक्त केलेल्या या अधिका-यांना त्वरित बरखास्त करण्याची मागणीदेखील ग्रामस्थ करीत आहेत. प्रदूषण मंडळाचे अधिकारी हे परस्पर कंपनीमालकांशी आर्थिक संबंध ठेवत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.उत्स्फूर्त गाव बंददौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी त्यांच्या कार्यालयात आयोजिलेल्या बैठकीला समर्थन देण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थांनी वकुरकुंभ येथील प्रत्येक व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवले. मात्र जनमताचा विचार न करता तहसीलदारांनी बैठकीला दांडी मारत निराशा पसरवली. याचाच परिणाम ग्रामस्थ जास्त आक्रमक झाले असून पुढील बैठक फक्त कुरकुंभलाच होणार, त्याशिवाय कोणीच बैठकीला येणार नाही, याचा चंग बांधला आहे. या सर्व घटनेत ग्रामस्थांनी स्वंयस्फूर्तीने गाव बंद ठेवून युवकांना पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Puneपुणेpollutionप्रदूषण