शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
4
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
5
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
6
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
7
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
8
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
9
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
10
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
11
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
12
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
13
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
14
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
15
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
16
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
17
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
18
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
19
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
20
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी येथील चाळकवाडी टोलनाका झाला सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 14:49 IST

पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी येथील टोलनाका पुन्हा सुरू करण्यात आला असून ग्रामस्थांच्या बैठकीत या बाबत निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देमहामार्गात गेलेल्या जमिनींची नुकसानभरपाई बाधित शेतकºयांना न मिळाल्यामुळे व महामार्गाची अर्धवट असलेली कामे या संदर्भात चाळकवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन टोलनाका बंद केला होता.जो पर्यंत येथील स्थानिक नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नाही, तो पर्यंत टोलनाका सुरु न करण्याची भूमिका आमदार शरद सोनवणे व ग्रामस्थांनी घेतली होती.येत्या चार महिन्यात सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर बंद असलेला टोलनाका सुरु करण्यात आला आहे.

पिंपळवंडी : पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी (ता. जुन्नर) येथील टोलनाका ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन करुन बंद केला होता. हा टोलनाका सुरु करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर ३ वेळा बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत चाळकवाडी ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत या मागण्या मान्य करण्यात आल्यामुळे पालकमंत्री गिरीष बापट यांनी टोलनाका सुरु करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गुरुवारी (दि. २८) मध्यरात्री बारा वाजल्यापासून हा टोलनाका सुरु करण्यात आला. पुणे नाशिक महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणात चाळकवाडी येथील धर्मशाळा व पिंपळवंडी बसस्टॅण्ड येथील स्मशानभूमी गेली होती. तसेच पुणे नाशिक महामार्गात गेलेल्या जमिनींची नुकसानभरपाई बाधित शेतकºयांना न मिळाल्यामुळे व महामार्गाची अर्धवट असलेली कामे या संदर्भात चाळकवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन टोलनाका बंद केला होता. जो पर्यंत येथील स्थानिक नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नाही, तो पर्यंत टोलनाका सुरु न करण्याची भूमिका आमदार शरद सोनवणे व ग्रामस्थांनी घेतली होती. या भूमिकेनंतर पालकमंत्री बापट, जिल्हाधिकारी सौरभ राव, आयुक्त रत्नाकर गायकवाड, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी झोडगे आणि इतर अधिकाºयांसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत चाळकवाडी येथील धर्मशाळा व स्मशानभूमी बांधून देण्यात येणार असल्याचे ठरले. तसेच ज्या बारा गावांमधील बाधित शेतकºयांची न्यायालयात असलेली ५३.८४ कोटी रक्कम ३ महिन्यामध्ये दिली जाईल व आळेफाटा नारायणगाव कळंब व मंचर येथील बाह्यवळणांची राहिलेली अपूर्ण कामे व बाधित शेतकºयांना नुकसानभरपाई डिसेंबर २०१७ पर्यंत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच चाळकवाडी टोलनाक्यालगत असलेल्या बाधित १३ शेतकºयांना घरांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. येत्या चार महिन्यात सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर बंद असलेला टोलनाका सुरु करण्यात आला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीhighwayमहामार्ग