शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी येथील चाळकवाडी टोलनाका झाला सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 14:49 IST

पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी येथील टोलनाका पुन्हा सुरू करण्यात आला असून ग्रामस्थांच्या बैठकीत या बाबत निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देमहामार्गात गेलेल्या जमिनींची नुकसानभरपाई बाधित शेतकºयांना न मिळाल्यामुळे व महामार्गाची अर्धवट असलेली कामे या संदर्भात चाळकवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन टोलनाका बंद केला होता.जो पर्यंत येथील स्थानिक नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नाही, तो पर्यंत टोलनाका सुरु न करण्याची भूमिका आमदार शरद सोनवणे व ग्रामस्थांनी घेतली होती.येत्या चार महिन्यात सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर बंद असलेला टोलनाका सुरु करण्यात आला आहे.

पिंपळवंडी : पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी (ता. जुन्नर) येथील टोलनाका ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन करुन बंद केला होता. हा टोलनाका सुरु करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर ३ वेळा बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत चाळकवाडी ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत या मागण्या मान्य करण्यात आल्यामुळे पालकमंत्री गिरीष बापट यांनी टोलनाका सुरु करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गुरुवारी (दि. २८) मध्यरात्री बारा वाजल्यापासून हा टोलनाका सुरु करण्यात आला. पुणे नाशिक महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणात चाळकवाडी येथील धर्मशाळा व पिंपळवंडी बसस्टॅण्ड येथील स्मशानभूमी गेली होती. तसेच पुणे नाशिक महामार्गात गेलेल्या जमिनींची नुकसानभरपाई बाधित शेतकºयांना न मिळाल्यामुळे व महामार्गाची अर्धवट असलेली कामे या संदर्भात चाळकवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन टोलनाका बंद केला होता. जो पर्यंत येथील स्थानिक नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नाही, तो पर्यंत टोलनाका सुरु न करण्याची भूमिका आमदार शरद सोनवणे व ग्रामस्थांनी घेतली होती. या भूमिकेनंतर पालकमंत्री बापट, जिल्हाधिकारी सौरभ राव, आयुक्त रत्नाकर गायकवाड, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी झोडगे आणि इतर अधिकाºयांसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत चाळकवाडी येथील धर्मशाळा व स्मशानभूमी बांधून देण्यात येणार असल्याचे ठरले. तसेच ज्या बारा गावांमधील बाधित शेतकºयांची न्यायालयात असलेली ५३.८४ कोटी रक्कम ३ महिन्यामध्ये दिली जाईल व आळेफाटा नारायणगाव कळंब व मंचर येथील बाह्यवळणांची राहिलेली अपूर्ण कामे व बाधित शेतकºयांना नुकसानभरपाई डिसेंबर २०१७ पर्यंत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच चाळकवाडी टोलनाक्यालगत असलेल्या बाधित १३ शेतकºयांना घरांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. येत्या चार महिन्यात सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर बंद असलेला टोलनाका सुरु करण्यात आला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीhighwayमहामार्ग