शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

मुलीच्या 'त्या' वाक्याने मन हेलावून टाकलं आणि त्यांनी थेट सहा हजार झाडांना वेदनामुक्त केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 18:55 IST

मुक्या झाडांना वेदनांपासून मुक्त करणाऱ्या पुण्यातील माधव पाटील यांनी विडा उचलला असून आत्तापर्यंत महाराष्ट्राबराेबरच इतर राज्यांमधील सहा हजाराहून अधिक झाडांना वेदनामुक्त केले आहे.

पुणे : मुक्या झाडांना वेदनांपासून मुक्त करणाऱ्या पुण्यातील माधव पाटील यांनी विडा उचलला असून आत्तापर्यंत महाराष्ट्राबराेबरच इतर राज्यांमधील सहा हजाराहून अधिक झाडांना वेदनामुक्त केले आहे. त्यांच्या या माेहीमेची कहाणी तेवढीच इमाेशनल आहे. चार वर्षापूर्वी पाटील कुटुंबीय सहलीसाठी 10 दिवस काेलकात्याला गेले हाेते. बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या घरातील झाडांसाठी पाण्याची व्यवस्था केली हाेती. पाण्याच्या बाटलीच्या सहाय्याने त्यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देण्याचे ठरवले हाेते. परंतु जाण्याची गडबडीत त्यांच्याकडून बाटलीचे झाकण उघडायचे राहून गेले. 10 दिवस पाणी न मिळाल्यामुळे ती झाडं मरुन गेली. मेलेली झाडं पाहिल्यावर त्यांची 4 वर्षाची हिरकणी ही मुलगी ''बाबा आपण झाडांना मारुन टाकलं''  असं म्हणाली. हे वाक्य ऐकून पाटील यांचं मन हेलावून गेलं आणि सुरु झाला झाडांना वेदनामुक्त करण्याचा प्रवास. 

माधव पाटील गेल्या अनेक वर्षांपासून झाडांना वेदनामुक्त करत आहेत. 'नेल फ्री पेन फ्री ट्री' हे त्यांच्या माेहीमेचे वाक्य आहे. शहरातील झाडांवर विविध जाहीरातींचे बाेर्ड खिळे मारुन टांगलेले असतात. यामुळे त्या झाडाची तसेच निसर्गाची हानी हाेत असते. झाड सजीव असते परंतु त्याला बाेलता येत नसल्याने त्यांचे दुःख त्यांना व्यक्त करता येत नाही. माधव पाटील त्यांचे दुःख दूर करतात. सुरुवातील माधव आणि त्यांच्या काही मित्रांनी पुण्यात ही माेहीम सुरु केली. दर रविवारी पुण्यातील एक भाग निवडून तेथील झाडांना ठाेकण्यात आलेले खिळे ते काढत असत. पाहता पाहता ही माेहीम वाढत गेली. त्यांना शहरातील अनेक वृक्षप्रेमींनी साथ दिली. आत्तापर्यंत या माेहिमेत तब्बल 500 स्वयंसेवक सहभागी झाले असून त्यांनी 50 हजाराहून अधिक खिळे 6 हजाराहून अधिक झाडांवरुन काढले आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर बिहार, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये देखील ही माेहिम सुरु आहे. 

माधव पाटील यांनी या आधी 'अंघाेळीची गाेळी' ही माेहीम सुरु केली हाेती. काही वर्षांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळामुळे भयाण परिस्थिती निर्माण झाली हाेती. त्यामुळे पाणी वाचविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस आंघाेळ करायची नाही असे या माेहिमेचे धाेरण हाेते. त्या दिवशी अंघाेळीची गाेळी घ्यायची असे ते म्हणत. या माेहिमेला देखील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 'मामाच्या गावाला जाऊया' या माेहिमेअंतर्गत त्यांनी पुण्याची अनेक वर्षे सैर घडवली आहे. सध्या ते उघड्यावर जाळण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या विराेधात माेहिम राबवत आहेत. त्याचबराेबर सिंहगडावर टाकण्यात येणाऱ्या प्लाॅस्टिकच्या बाटल्या देखील गाेळा करण्याचे काम ते करतात. त्यांचे हे काम सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. 

टॅग्स :Puneपुणेsocial workerसमाजसेवक