शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी करणार वणव्यांचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 7:21 PM

वणवे किंवा आगी लागायचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक म्हणजे नैसर्गिक व दुसरे मानवनिर्मित असते.

ठळक मुद्देउन्हाळ्यामुळे आगीच्या घटना वाढणार वन विभागाकडून उपाययोजना
पुणे : उन्हाळा सुरू झाल्याने टेकडी, वन विभागाच्या परिसरात आगी लागण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तळजाई टेकडीवर आणि सोमवारी म्हातोबा टेकडीवर आग लागली. त्यात टेकडीचे नुकसान तर झालेच पण जैवविविधतेसाठी आवश्यक घटक कीटक, किडे, छोटे प्राणी, पक्ष्यांचे घरटे यांचाही त्यामध्ये बळी गेला. दरम्यान असे वणवे विझविण्यासाठी वन विभागातर्फे विविध यंत्रांचा उपयोग करण्यात येत आहे. वणव्यांचा सामना करण्यासाठी संपूर्णपणे वन विभाग सज्ज झाले आहे. त्यासाठी अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे. वणवे किंवा आगी लागायचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक म्हणजे नैसर्गिक व दुसरे मानवनिर्मित असते. नैसर्गिक वणव्यांचे अथवा आगी लागण्याचे प्रमाण केवळ १२ ते १५ टक्के एवढेच आहे, तर मानवनिर्मित बाबींचे सर्वसाधारण प्रमाण ८० ते ८५ टक्के असते. नैसर्गिक आगी ही झाडे किंवा बांबू यांच्या घर्षणाने लागू शकतात अथवा वीज पडून, शॉर्टसर्किट होऊन आदी गोष्टींमुळे आग लागू शकतात. परंतु मानव निर्मित आग किंवा वणवे हे अनेक वेळा समाजकंटक, विकृत लोकांकडून लावले जातात. यामध्ये सिगरेट, बीडी, काडेपेटीचे थोटके जंगलात, डोंगरात फेकून दिले जातात. त्यामुळे आग लागते. वणवे हे अनेक वेळा गैरसमजुती मधून लावले जातात. वणवे, आगीच्या भक्ष्यस्थानी पडून दरवर्षी अनेक हेक्टर जागेतील देशी झाडे, औषधी झाडे, अनेक जातीचे पशु, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक, फुलपाखरे, बेडूक, साप यांचा मोठा अधिवास असतो. तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक होतो. साधारणत जानेवारी ते मे अखेरपर्यंत आगीचे प्रमाण किंवा वनव्याचे सत्र मोठे असते, अशी माहिती टेल्स ऑर्गनायझेशनचे लोकेश बापट यांनी लोकमत ला दिली. शहरात आणि जिल्ह्यात ज्या ठिकाणी वणवे लागण्याची शक्यता आहे, अशी ठिकाणे आम्ही शोधली आहेत. त्या ठिकाणी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांसाठी एक मजूर नेमण्यात आला आहे. तो वणव्यावर लक्ष ठेवेल. जिथे आग लागली असेल, त्याची माहिती तो वन विभागाला देईल. तसेच वणवे ज्या ठिकाणी लागतात, त्या ठिकाणी जाळपट्टी टाकली आहे. शक्य त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहेत. जेणेकरून त्वरित आगीवर पाणी टाकून विझवता येईल. अनेक नागरिक दुपारी टेकडीवर फिरायला येतात. त्यातील बरेचजण बिअर पितात, पत्ते खेळतात, सिगारेट ओढतात. त्यातून आग लागल्याच्या घटना घडतात. त्यावरही आमचे लक्ष आहे, असे सहाय्यक वनसंरक्षक महेश भावसार यांनी सांगितले. आग विझविण्यासाठी अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी फायर ब्लोअर हे अ‍ॅडव्हान्स यंत्रही आम्ही वापरत आहोत. ते मजूराकडे दिले असून, हे यंत्र पाठीवर ठेवून आग विझवता येते. त्यातून हवेचा मोठा झोत बाहेर येतो आणि आग विझते. छोटे छोटे फायर बिटरही उपलब्ध करून दिले आहेत. पूर्वी झाडाच्या फांद्या किंवा माती टाकून आग विझविली जात असे. परंतु, नागरिकांना त्यासाठी आगीच्या जवळ जावे लागे आणि त्यात अनेकदा ते भाजले जात असत. त्यामुळे आम्ही आता हाताने वापरता येतील, असे यंत्र उपलब्ध केली आहेत. ग्राक कटर हे यंत्र, कर्मचाºयांना फायर प्रुफ ड्रेस देत आहोत, असे सहाय्यक वनसंरक्षक महेश भावसार यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले. वणवा लावल्याने पुढील वर्षी गवत चांगलं येते, जमीन सुपीक राहते, झाडे चांगली येतात. प्रथम हा गैरसमज दूर केला पाहिजे. निसर्गामधील वृक्ष, वेली, झाड, कीटक प्राणी हे निसर्गचक्र व्यवस्थित ठेवण्याचे काम माणसापेक्षा कितीतरी जास्त चांगलं करीत असतात. आपण मात्र उगीचच मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत राहतो. वनवे लावल्याने जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. पहिल्याच पावसात गवत जळून गेल्याने त्याच्या आजूबाजूची सर्व माती मोकळी होते व हीच माती डोंगरदºयात वाहून धरणामध्ये जाते. तिथे गाळ मोठ्या प्रमाणात साठत राहतो. - लोकेश बापट, टेल्स आॅर्गनायझेशन ..............वणवा लागला तर १९२६ वर कॉल करा राज्यात कुठेही वन क्षेत्राला वनवा लागला, कुठे अतिक्रमण होत असेल, वन्यजीव जखमी असेल किंवा वन विभागाशी संबंधित काही समस्या असेल तर त्वरित कारवाई होण्यासाठी वन विभागाने १९२६ हा २४ तास कॉल सेंटर नंबर सुरू केला. नागरिकांनी वणवा लागला किंवा वन विभागाच्या इतर समस्येबाबत यावर माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले. ...........................म्हातोबा टेकडीवर सोमवारी खूप मोठा वणवा लागला. हा वणवा चांगलाच वाढला होता. त्याबाबत वनविभागाला कॉल केला होता. परंतु, त्यांचे कोणीही घटनास्थळी आले नाही. स्थानिक नागरिकांनीच इकडून-तिकडून पाणी आणले आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. - अ‍ॅड. विंदा, स्थानिक नागरिक .....................