शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

Adnan Sami: ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच निनादले अदनान सामींच्या पियानोचे स्वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 09:05 IST

मला प्रथमच या जागतिक कीर्तीच्या स्वरमंचावर वादन करण्याची संधी मिळाली, हा मोठा आनंदयोग वाटतो

पुणे : सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सायंकाळचे सत्र संगीत कलाकार अदनान सामी यांच्या पियानो वादनाने अनोखे ठरले. पं. मिलिंद चित्ताळ यांच्या गायनालाही श्रोत्यांनी पसंतीची दाद दिली. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुल येथे ७० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सुरू होता.

संगीत क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या अदनान सामी यांच्या ‘सवाई’च्या स्वरमंचावरील सादरीकरणाविषयीची कमालीची उत्सुकता मंडपातील हाऊसफुल्ल गर्दी देत होती. सायंकाळी अदनान सामी यांचे वाद्यासह स्वरमंचावर आगमन होताच मंडपात चैतन्याची लहर पसरली. विशेषत: तरुणाईने अदनान यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ते किती उदारमतवादी होते, याचे उदाहरण सांगतो. मी पियानोवर भारतीय शास्त्रीय संगीत वाजविण्याचा प्रयत्न करतो, असे मी पं. भीमसेनजींना सांगितले. त्यावर ते प्रतिकूल मत नोंदवणार, असेच मला वाटले होते. पण मी आश्चर्यचकित झालो. कारण, भीमसेनजी म्हणाले, ‘बहुत अच्छा कर रहे हैं.’ परंपरा वाहती ठेवायची असेल तर त्यामध्ये नवे प्रवाह मिसळले पाहिजेत. नवे, वेगळे विचार स्वीकारले पाहिजेत. काळानुरूप योग्य आणि आवश्यक बदल स्वीकारले पाहिजेत, त्यांचे हे विचार किती प्रगल्भ आहेत, अशी आठवण अदनान सामी यांनी सांगितली.

उस्ताद झाकीर हुसेन यांच्या आठवणी सतत जाग्या आहेत. माझा पहिला अल्बम झाकीर भाईंच्या साथीने सजला होता. १२ डिसेंबर रोजी आमची मैफल ठरली होती, जी आता शक्य नाही, अशी खंतही अदनान सामी यांनी व्यक्त केली.

राग यमनमधील रचनेने अदनान सामी यांनी पियानो वादनाला सुरुवात केली. रूपक तालात सुरुवातीला वादन करून त्यांनी द्रूत त्रितालातील रचना पेश केली. तत्पूर्वी प्रसिद्ध गायक पं. मिलिंद चित्ताळ यांनी गायिलेला राग ‘मधुवंती’ त्यांच्या प्रतिभेचे आणि विद्वत्तापूर्ण सादरीकरणाचा प्रत्यय देणारा ठरला. सुरदासांच्या रचनेची अनुभूती रसिकांना देतानाच त्यांनी गुरू पं. फिरोज दस्तूर यांनी गाजवलेल्या ‘गोपाला मेरी करुणा...’ या भक्तिरचनेने गायनाची सांगता केली. त्यांना भरत कामत (तबला), अविनाश दिघे (हार्मोनियम), माउली टाकळकर (टाळ) व प्रवीण कारदगी व अभोगी सेवेकर यांनी तानपुरा साथ केली.

योग्यता, गुणवत्ता यांचा आदर्श म्हणजे भीमसेनजी

मला आज प्रथमच या जागतिक कीर्तीच्या स्वरमंचावर वादन करण्याची संधी मिळाली, हा मोठा आनंदयोग वाटतो. पं. भीमसेनजी आणि माझे विशेष कनेक्शन होते. मी टीन एजर असताना प्रथमच मी त्यांचे गाणे ऐकले आणि भारावून गेलो होतो. खरोखरच ‘भारतरत्न’ हा सन्मान भीमसेनींमुळे अधिक बुलंद झाला आहे. कलेच्या सर्वोच्च गुणवत्तेचा तो दीपस्तंभ आहे. त्यांना कधीही ऐका, त्यांना तोड नाही, ते अजोड आहेत, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते. योग्यता, गुणवत्ता यांचा आदर्श म्हणजे भीमसेनजी, असे सामी म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेartकलाmusicसंगीतAdnan samiअदनान सामीBhimsen Joshiभीमसेन जोशीMaharashtraमहाराष्ट्र