शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 19:16 IST

शासनाने ५० लाख गुंठा भाव दिला तरी जमिनी न देण्याचा शेतकऱ्यांचा इशारा, शेतकरी आंदोलनाच्या तयारीत

ठळक मुद्देप्रशासनाची शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी नोटीसा देऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरवात

राजगुरूनगर: पुणे -नाशिक रेल्वेच्या मार्गिकामुळे होलेवाडी, मांजरेवाडी खरपुडी या परिसरातील शेतकरी भुमिहिन होऊन देशोधोडीला लागणार आहे. शासनाने जमिनीला ५० लाख रुपये गुंठ्याला भाव दिला तरी रेल्वे मार्गिका होऊ देणार नाही. तसेच होणाऱ्या रेल्वे मार्गाची मोजणी होऊ देणार नाही. असा इशारा शेतकऱ्यांनी दिला असून तो आंदोलनाच्या तयारीत उतरला आहे.

पुणे -नाशिक रेल्वे मार्गिकेसाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी नोटीसा देऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरवात केली आहे. स्थानिक शेतकऱ्यांची जमीन देण्याबाबत रेल्वे अधिकारी व खेड प्रशासनाची बैठक घेण्यात आली. यावेळी खेडचे प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण, रेल्वे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.  पुणे - नाशिक रेल्वे मार्ग देशातील पहिला हायस्पीड रेल्वे मार्ग असणार आहे. या मार्गावर ताशी २२० कि.मी. वेगाने रेल्वे धावणार आहे. त्यामुळे या दोन शहरातील अंतर आता केवळ दोन तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. या भागातील शेतकऱ्याचा फायदा होणार असल्याचे रेल्वे अधिकारी यांनी सांगितले.

दरम्यान रेल्वे साठी जाणाऱ्या जमिनीची मोजणी न करताच शेतकऱ्यांना थेट नोटीसा कशासाठी दिल्या, शेतकऱ्यांना अंधारात ठेवून कवडीमोल भावाने शेतजमिनी घेण्याचा प्रशासनाचा डाव आहे. असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.  प्रांत विक्रांत चव्हाण यांनी शेतकऱ्यांची भूमिका समजून घेत प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र शेतकऱ्यांचे समाधान न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्नाचा भडीमार होताच प्रशासनाला बैठक उरकती घ्यावी लागली. 

रेल्वे मार्गिकेची मोजणी होऊ देणार नाही. असा आक्रमक पवित्रा घेत या भागातून रेल्वे मार्ग जाऊ देणार नाही. यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल असे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेFarmerशेतकरीGovernmentसरकार