शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

धरणातील पाणी राखून ठेवण्याची काळजी प्रशासनाने घेतली नाही: दिलीप वळसे पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 13:17 IST

पुणे जिल्हा प्रशासनाने पाणी वाटपात आपली बाजू भक्कमपणे मांडली नाही त्यामुळे आज टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, यामध्ये सर्वस्वी चुक प्रशासनाची आहे.

ठळक मुद्देप्रशासनाने पाऊस पडेपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करणे गरजेचे

घोडेगाव : डिंभे धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याची काळजी पाटबंधारे विभाग व प्रशासनाने घ्यायला पाहिजे होती. या वर्षी धरणातील पाणी लवकर संपल्याने पिण्याच्या पाण्याचाप्रश्न गंभीर झाला आहे. यासाठी प्रशासनाने पुढील काळात नदीमधील पाणी, विहिरींमध्ये असलेले पाणी पाऊस पडेपर्यंत पुरेल असे नियोजन करावे, अशा सूचना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या. आंबेगाव तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे नियोजन करण्यासाठी दि. ३१ रोजी पंचायत समितीच्या हुतात्मा बाबू गेनू सभागृहात दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीत टँकर आढावा, चारा छावण्या, विंधनविहिरी, नुकसानाचे पंचनामे इत्यादी विषयांवर चर्चा झाली.यावेळी प्रांत अधिकारी संजय पाटील, कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर, पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता सचिता डुंबरे, तहसीलदार सुषमा पैकेकरी, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, कृषी अधिकारी संजय विश्वासराव, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, उपसभापती नंदा सोनावले, माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, जिल्हा परिषद सदस्या रूपा जगदाळे, घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे तसेच सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. पुणे जिल्हा प्रशासनाने पाणी वाटपात आपली बाजू भक्कमपणे मांडली नाही त्यामुळे आज टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, यामध्ये सर्वस्वी चुक प्रशासनाची आहे. निवडणूक आचारसंहितेमध्ये आम्ही काही बोलू शकत नव्हतो, यामध्ये प्रशासनाने सुध्दा टंचाईची काही दखल घेतली नाही अशी टीका वळसे पाटील यांनी केली.तालुक्यासाठी बोअरची नवीन गाडी येणार आहे. ही गाडी पहिली आदिवासी भागात पाठवली जावी. येथे पाऊस सुरू होण्यापुर्वी बोअर घेतल्या जाव्यात.

 घोडेगाव व मंचरला पाणी पुरवठा होणा-या बंधा-यांचे ढापे काढले जाऊ नयेत असा निर्णय मागिल बैठकीत झाला असतानाही ढापे काढले गेले आहेत. त्यामुळे या गावांना पाणी कमी पडू लागले आहे. - गाळमुक्त धरण, बंधारा हि शासनाचीच संकल्पना आहे. स्वखर्चाने शेतकरी, विटभट्टी चालवणारे कुंभार माती उचलून न्यायला तयार असतील तर महसुल विभागाने याची अडवणूक करू नये. हा गाळ उचलण्याची परवानगी दयावी.

- पाण्या अभावी झालेल्या  पिकांच्या नुकसानीचे व जनावरांचे पंचनामे कृषी, महसुल व पंचायत समिती विभागाने करून घ्यावेत.  - तहसिल कार्यालयाच्या खुप तक्रारी सतत येत असतात. येथील अधिकारी व कर्मचा-यांना रोजगार हमी योजना, टंचाई या कामांना वेळ नाही मात्र इतर कामांसाठी वेळ आहे. येथे प्रत्येक कामासाठी अडवणूक केली जात असेल तर तालुक्यासाठी हे योग्य नाही.- तळेघर व अडिवरे येथे शासन आपल्या दारीचे कॅम्प घेतले जावेत. इत्यादी विषयांवर चर्चा झाली.

टॅग्स :ambegaonआंबेगावWaterपाणीdroughtदुष्काळ