शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

धरणातील पाणी राखून ठेवण्याची काळजी प्रशासनाने घेतली नाही: दिलीप वळसे पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 13:17 IST

पुणे जिल्हा प्रशासनाने पाणी वाटपात आपली बाजू भक्कमपणे मांडली नाही त्यामुळे आज टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, यामध्ये सर्वस्वी चुक प्रशासनाची आहे.

ठळक मुद्देप्रशासनाने पाऊस पडेपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करणे गरजेचे

घोडेगाव : डिंभे धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याची काळजी पाटबंधारे विभाग व प्रशासनाने घ्यायला पाहिजे होती. या वर्षी धरणातील पाणी लवकर संपल्याने पिण्याच्या पाण्याचाप्रश्न गंभीर झाला आहे. यासाठी प्रशासनाने पुढील काळात नदीमधील पाणी, विहिरींमध्ये असलेले पाणी पाऊस पडेपर्यंत पुरेल असे नियोजन करावे, अशा सूचना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या. आंबेगाव तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे नियोजन करण्यासाठी दि. ३१ रोजी पंचायत समितीच्या हुतात्मा बाबू गेनू सभागृहात दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीत टँकर आढावा, चारा छावण्या, विंधनविहिरी, नुकसानाचे पंचनामे इत्यादी विषयांवर चर्चा झाली.यावेळी प्रांत अधिकारी संजय पाटील, कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर, पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता सचिता डुंबरे, तहसीलदार सुषमा पैकेकरी, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, कृषी अधिकारी संजय विश्वासराव, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, उपसभापती नंदा सोनावले, माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, जिल्हा परिषद सदस्या रूपा जगदाळे, घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे तसेच सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. पुणे जिल्हा प्रशासनाने पाणी वाटपात आपली बाजू भक्कमपणे मांडली नाही त्यामुळे आज टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, यामध्ये सर्वस्वी चुक प्रशासनाची आहे. निवडणूक आचारसंहितेमध्ये आम्ही काही बोलू शकत नव्हतो, यामध्ये प्रशासनाने सुध्दा टंचाईची काही दखल घेतली नाही अशी टीका वळसे पाटील यांनी केली.तालुक्यासाठी बोअरची नवीन गाडी येणार आहे. ही गाडी पहिली आदिवासी भागात पाठवली जावी. येथे पाऊस सुरू होण्यापुर्वी बोअर घेतल्या जाव्यात.

 घोडेगाव व मंचरला पाणी पुरवठा होणा-या बंधा-यांचे ढापे काढले जाऊ नयेत असा निर्णय मागिल बैठकीत झाला असतानाही ढापे काढले गेले आहेत. त्यामुळे या गावांना पाणी कमी पडू लागले आहे. - गाळमुक्त धरण, बंधारा हि शासनाचीच संकल्पना आहे. स्वखर्चाने शेतकरी, विटभट्टी चालवणारे कुंभार माती उचलून न्यायला तयार असतील तर महसुल विभागाने याची अडवणूक करू नये. हा गाळ उचलण्याची परवानगी दयावी.

- पाण्या अभावी झालेल्या  पिकांच्या नुकसानीचे व जनावरांचे पंचनामे कृषी, महसुल व पंचायत समिती विभागाने करून घ्यावेत.  - तहसिल कार्यालयाच्या खुप तक्रारी सतत येत असतात. येथील अधिकारी व कर्मचा-यांना रोजगार हमी योजना, टंचाई या कामांना वेळ नाही मात्र इतर कामांसाठी वेळ आहे. येथे प्रत्येक कामासाठी अडवणूक केली जात असेल तर तालुक्यासाठी हे योग्य नाही.- तळेघर व अडिवरे येथे शासन आपल्या दारीचे कॅम्प घेतले जावेत. इत्यादी विषयांवर चर्चा झाली.

टॅग्स :ambegaonआंबेगावWaterपाणीdroughtदुष्काळ