शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांच्याही बदल्यांचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2015 01:00 IST

पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांच्याही बदल्यांचे वेध लागले आहेत

पुणे : पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांच्याही बदल्यांचे वेध लागले आहेत. पुण्यातील काही बदल्यांनंतर उर्वरित अधिकाऱ्यांच्या बदल्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील तीन अतिरिक्त आयुक्त आणि पाच उपायुक्तांचा दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली अपेक्षित आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. शहाजी सोळुंके, अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण) चंद्रशेखर दैठणकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) अब्दुर रहमान यांच्यासह उपायुक्त एम. बी. तांबडे, जयंत नाईकनवरे, मनोज पाटील, राजेश बनसोडे, राजेंद्र माने यांची बदली अपेक्षित आहे. तांबडे सध्या परिमंडल एक, नाईकनवरे गुन्हे शाखा, पाटील परिमंडल चार, बनसोडे सायबर शाखा आणि माने परिमंडल तीनचे उपायुक्त म्हणून काम पाहत आहेत. नवीन बदली अधिनियमानुसार उपायुक्त आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा कार्यकाल दोन वर्षांचा करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्यामुळे एक प्रकारचा ‘गॅप’ निर्माण होणार आहे. पुणे हे एक स्वतंत्र ‘केडर’ मानले जाते. पोलीस आयुक्तालय, त्यानंतर सीआयडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे ग्रामीण अशा पुण्यातील विभागांमध्येच काही अधिकारी फिरत राहतात. पुणे सोडायला सहसा कोणी तयार नसते. त्यामुळे अनेक अधिकारी पुणे ग्रामीण, सीआयडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह एटीएसमध्ये नेमणूक होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पुण्यातील उपायुक्त दर्जाचे तीन अधिकारी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदासाठी जोरदार ‘लॉबिंग’ करीत आहेत. ग्रामीण अधीक्षक मनोज लोहिया यांची बदली होणार आहे. त्यांनीही मुंबई पोलीस दल किंवा दहशतवाद विरोधी पथकामध्ये बदली करण्याची विनंती शासनाकडे केली आहे. यासोबतच ग्रामीणचे अतिरिक्त अधीक्षक विजयकुमार मगर आणि रवींद्रसिंह परदेशी यांच्याही बदल्या अपेक्षित आहेत. त्यामुळे या रिक्त होणाऱ्या पदांवर बसण्यासाठी शहरातील काही उपायुक्त जोरदार प्रयत्न करीत आहेत. यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून पोलीस निरीक्षकांच्या बढत्याही रखडलेल्या आहेत. त्यांचेही एसीपी प्रमोशन लवकरच निघण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)४सूत्रांच्या माहितीनुसार अधिवेशन संपल्याबरोबर पहिल्याच आठवड्यात बदल्या आणि बढत्यांची यादी बाहेर काढण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांना बदल्यांबाबत ‘प्रेस्टीज इश्यू’ न करण्याची विनंती केली आहे. ४कोणत्याही अधिकाऱ्यासाठी लॉबिंग करु नका, असेही फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितल्याची चर्चा पोलीस दलात आहे. त्यामुळे ‘क्रीम पोस्टिंग’साठी धडपडणाऱ्या अधिकाऱ्यांची अडचण झाली आहे. ४मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकूणच पोलीस खात्याच्या कामगिरीबाबत असमाधानी असल्याचे चित्र आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यापासून राज्यामध्ये उद्भवलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या, नागपूर कारागृहातून पळालेले कैदी, त्यानंतर सापडत गेलेल्या मोबाईलची मालिका, पुण्यातील टोळीयुद्ध अशा अनेक घटनांमुळे पोलिसांच्या कामावरून नाराजी आहे.