शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

खोर येथे पैसे टाका आणि पाणी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:08 IST

पाण्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की, ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी देऊळगावगाडा, पडवी, खोर, भांडगाव या गावांच्या यात्रा पार पडल्या गेल्या.

खोर : पैसे टाका आणि पाणी घ्या... अशी परिस्थिती आज खोर (ता. दौंड) परिसरात निर्माण झाली आहे. या वर्षी दौंड तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये पाऊस झाला नसल्याने या पट्ट्यातील खोर, देऊळगावगाडा, पडवी, कुसेगाव, माळवाडी, नारायण बेट ही गावे आज पाणी... पाणी करीत आहेत.

पाण्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की, ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी देऊळगावगाडा, पडवी, खोर, भांडगाव या गावांच्या यात्रा पार पडल्या गेल्या. मात्र, केवळ ४० टक्के पाण्यावर त्या पार पडल्या. यात्रांंवरती देखील पाणीटंचाईचे संकट उभे राहिले गेले. या वर्षी उन्हाळा अतिशय कडक स्वरूपात असल्याने अजून एप्रिल, मे, जून हे तीन महिने पाण्याच्या संदर्भात अतिशय कडक व तीव्र दुष्काळी जाणार असल्याने पाणी जपून वापरण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.या वर्षी पाणी नसल्याने शेतकरीवर्गाच्या शेतजमिनी पडीक ठेवण्यात आल्या आहेत. खोरचे उपसरपंच विकास चौधरी व त्यांचे बंधू बापू चौधरी यांनी खोर गावामध्ये कॉईन बॉक्स सेन्सरद्वारे पिण्याचे पाणी ग्रामस्थांंनां कमी पैशांमध्ये देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कॉईन बॉक्समध्ये पैसे टाका आणि पाणी घ्या, या उपक्रमाच्या माध्यमातून चौधरी यांनी ५0 पैशाला १ लीटर पाणी, ५ रुपयाला १0 लीटर पाणी तर १0 रुपयांना २0 लीटर पाणी या उपलब्ध कॉईन बॉक्सद्वारे मिळत आहे. खोरमधील अनेक ग्रामस्थ, नागरिक, महिलावर्ग या पद्धतीने पाणी सध्या घेत आहेत.पाणी असूनही विजेअभावी गावे तहानलेलीकवठे : कवठे गावची पाणीपुरवठा योजना घोड नदीच्या फत्तेश्वर बंधाऱ्याहून आहे. फत्तेश्वर बंधारा आता पाण्याने तुडुंब भरला आहे. मात्र, पुरेशा विजेअभावी या परिसरातील २० हजार नागरिकांना पाण्यावाचून वंचित राहावे लागत आहे. यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी एक दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.४वीजपुरवठ्याबाबत शिरूर तहसीलदारांकडे लेखी निवेदन देऊनदेखील फक्त चार तास वीज उपलब्ध होत असल्याने कवठे गावची पाण्याची तहान पूर्ण होत नसल्याने कवठे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.४फत्तेश्वर बंधाऱ्यापासून कवठे गावचे अंतर तीन किलोमीटर आहे. कवठे गावातील पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी किमान ८ तास विजेची आवश्यकता असते.४आठ तास वीजपुरवठा उपलब्ध होत नसल्याने पाण्याची टाकी अर्धवट भरली जाते. त्यामुळे गावाला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतीला शक्य होत नाही. याबाबत पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी कवठे ग्रामस्थांंसह शिरूर तहसीलदारांकडे लेखी निवेदन सादर केले होते.४तसेच वेळोवेळी तहसीलदार शिरूर यांच्याशी फोनवरून संपर्क करूनदेखील याची दखल घेतली जात नसल्याने प्रशासनाचे याकडे त्वरित लक्ष वेधण्यासाठी कवठे ग्रामस्थांनी संपूर्ण कवठे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.४याबाबत दोन दिवसांत गावपातळीवर बैठकीचे आयोजन केले असून कवठे गावचा एकदिवसीय गाव बंदचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. 

टॅग्स :Puneपुणे