शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

खोर येथे पैसे टाका आणि पाणी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:08 IST

पाण्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की, ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी देऊळगावगाडा, पडवी, खोर, भांडगाव या गावांच्या यात्रा पार पडल्या गेल्या.

खोर : पैसे टाका आणि पाणी घ्या... अशी परिस्थिती आज खोर (ता. दौंड) परिसरात निर्माण झाली आहे. या वर्षी दौंड तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये पाऊस झाला नसल्याने या पट्ट्यातील खोर, देऊळगावगाडा, पडवी, कुसेगाव, माळवाडी, नारायण बेट ही गावे आज पाणी... पाणी करीत आहेत.

पाण्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की, ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी देऊळगावगाडा, पडवी, खोर, भांडगाव या गावांच्या यात्रा पार पडल्या गेल्या. मात्र, केवळ ४० टक्के पाण्यावर त्या पार पडल्या. यात्रांंवरती देखील पाणीटंचाईचे संकट उभे राहिले गेले. या वर्षी उन्हाळा अतिशय कडक स्वरूपात असल्याने अजून एप्रिल, मे, जून हे तीन महिने पाण्याच्या संदर्भात अतिशय कडक व तीव्र दुष्काळी जाणार असल्याने पाणी जपून वापरण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.या वर्षी पाणी नसल्याने शेतकरीवर्गाच्या शेतजमिनी पडीक ठेवण्यात आल्या आहेत. खोरचे उपसरपंच विकास चौधरी व त्यांचे बंधू बापू चौधरी यांनी खोर गावामध्ये कॉईन बॉक्स सेन्सरद्वारे पिण्याचे पाणी ग्रामस्थांंनां कमी पैशांमध्ये देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कॉईन बॉक्समध्ये पैसे टाका आणि पाणी घ्या, या उपक्रमाच्या माध्यमातून चौधरी यांनी ५0 पैशाला १ लीटर पाणी, ५ रुपयाला १0 लीटर पाणी तर १0 रुपयांना २0 लीटर पाणी या उपलब्ध कॉईन बॉक्सद्वारे मिळत आहे. खोरमधील अनेक ग्रामस्थ, नागरिक, महिलावर्ग या पद्धतीने पाणी सध्या घेत आहेत.पाणी असूनही विजेअभावी गावे तहानलेलीकवठे : कवठे गावची पाणीपुरवठा योजना घोड नदीच्या फत्तेश्वर बंधाऱ्याहून आहे. फत्तेश्वर बंधारा आता पाण्याने तुडुंब भरला आहे. मात्र, पुरेशा विजेअभावी या परिसरातील २० हजार नागरिकांना पाण्यावाचून वंचित राहावे लागत आहे. यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी एक दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.४वीजपुरवठ्याबाबत शिरूर तहसीलदारांकडे लेखी निवेदन देऊनदेखील फक्त चार तास वीज उपलब्ध होत असल्याने कवठे गावची पाण्याची तहान पूर्ण होत नसल्याने कवठे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.४फत्तेश्वर बंधाऱ्यापासून कवठे गावचे अंतर तीन किलोमीटर आहे. कवठे गावातील पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी किमान ८ तास विजेची आवश्यकता असते.४आठ तास वीजपुरवठा उपलब्ध होत नसल्याने पाण्याची टाकी अर्धवट भरली जाते. त्यामुळे गावाला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतीला शक्य होत नाही. याबाबत पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी कवठे ग्रामस्थांंसह शिरूर तहसीलदारांकडे लेखी निवेदन सादर केले होते.४तसेच वेळोवेळी तहसीलदार शिरूर यांच्याशी फोनवरून संपर्क करूनदेखील याची दखल घेतली जात नसल्याने प्रशासनाचे याकडे त्वरित लक्ष वेधण्यासाठी कवठे ग्रामस्थांनी संपूर्ण कवठे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.४याबाबत दोन दिवसांत गावपातळीवर बैठकीचे आयोजन केले असून कवठे गावचा एकदिवसीय गाव बंदचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. 

टॅग्स :Puneपुणे