शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

हॉलतिकीटसाठी अडवणाऱ्या शाळांवर कारवाई होणार; मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावींचा इशारा

By प्रशांत बिडवे | Published: February 20, 2024 5:06 PM

गाेसावी म्हणाले, तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळांवर आपण कारवाई करीत असताे...

पुणे : शैक्षणिक शुल्क अथवा इतर काेणत्याही कारणामुळे दहावी तसेच बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे हाॅलतिकीट न देणे गंभीर बाब आहे. याप्रकारे शाळांनी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये. विद्यार्थी, पालकांची तक्रार आल्यास संबंधित शाळांवर परीक्षा झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिला. तसेच आतापर्यंत आशा स्वरूपाच्या दाेन तक्रारी प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

गाेसावी म्हणाले, तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळांवर आपण कारवाई करीत असताे. संबंधित प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि संचालक यांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना हाॅलतिकीट न देणे अत्यंत गंभीर आहे. राज्य मंडळ काेणत्याही कारणामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता गांभीर्याने घेत असते. आतापर्यंत आमच्याकडे दाेन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दरवर्षी सरासरी दाेन ते तीन तक्रारी येत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून हे प्रकार घडल्याचे दिसून आले आहे.

गतवर्षी ११ गुन्ह्यांची नाेंद

परीक्षेदरम्यान गतवर्षी जे गैरप्रकार झाले, त्याबाबत ११ गुन्हे दाखल झाले असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिघात १४४ कलम लागू असते. केंद्राजवळ झेराॅक्स सेंटरही बंद केली जातात. परीक्षेदरम्यान मूळ विद्यार्थी तसेच डमी बसलेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला जातो तसेच मूळ विद्यार्थ्यांस पुढील पाच परीक्षेला बसू दिले जात नाही.

परीक्षेचा निकाल लवकर लावणार

गतवर्षी सुरुवातीचे काही दिवस शिक्षकांचा संप सुरू हाेता, तरीही आम्ही बारावीचा निकाल वेळेवर जाहीर केला हाेता. यंदाही मे च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बारावीचा निकाल लावण्यावर आमचा भर आहे, असेही गोसावी यांनी सांगितले.

टॅग्स :examपरीक्षाssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा