शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Inter Caste Marriage: समाजातून बहिष्कृत केल्याप्रकरणी जातपंचायतीच्या पंचांविरूद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 13:53 IST

मुलाने आंतरजातीय विवाह केल्याने समाजातून बहिष्कृत केलेल्या एका व्यक्तीला साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल अपमानित करण्यात आले.

पुणे : मुलाने आंतरजातीय विवाह केल्याने समाजातून बहिष्कृत केलेल्या एका व्यक्तीला साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल अपमानित करण्यात आले. जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करण्यात आली. त्यांना समाजातून बहिष्कृत केल्याप्रकरणी जातपंचायतीच्या पंचांविरूद्ध दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी खडकी येथे राहाणा-या एका 69 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून अर्जुन रामचंद्र जानगवळी, हरिभाऊ बाळाप्पा हिरणवाळे, चंद्रकांत उर्फ बाळू हरिभाऊ औरंगे यांच्यासह दोघांवर महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण कायद्यानुसार  गुन्हा दाखल झाला आहे. फियार्दीमध्ये नमूद केल्याप्रमाणे फियार्दी यांच्या मुलाने आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे त्यांना समजाजातुन बहिष्कृत करण्यात आले होते. त्याविरुद्ध हे प्रकरण पोलीस ठाणे व न्यायालयात गेल्यानंतर प्रकरण मिटले होते. दरम्यान, फिर्यादीच्या जवळच्या नातेवाईकाच्या मुलाचा साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी २७ नोव्हेंबर रोजी अरण्येश्वर परिसरात गेले होते. तिथे समाजातील वरिष्ठ पंचमंडळी उपस्थित होती.  

या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केले असताना कसे बोलावले? अशी विचारणा पंचांनी चुलत मेव्हण्यांना केली. हे कुटुंब इथे असेल तर आम्ही साखरपुडा होऊ देणार नाही. या कार्यक्रमाला अरण्येश्वर पंच मंडळी मान्यता देणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या मुलाचे लग्न जातीबाहेर केल्यामुळे आमच्या कार्यक्रमात त्यांना येणे बंद केले आहे. त्यामुळे साखरपुड्याचा कार्यक्रम थांबविण्यात आला. त्यांना आम्ही टिळा देणार नाही. त्यांना सोडून आम्ही इतर लोकांना टिळा देऊ. आम्हाला कार्यक्रमात टिळा न देता बहिष्कृत केले. त्यामुळे आम्हाला सर्वांसमोर अपमानित होऊन तिथून जावे लागले. तसेच जानगवळी, हिरणावळे, औरंगे यांनी फियार्दीस अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन त्यांना अपमानीत करुन त्यांची बदनामी केली. त्यांच्यामुळे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाच्या जीवीतास धोका असल्याचे त्यांनी फिर्यादी मध्ये नमूद केले आहे.  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे सामाजिक बहिष्कृत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

गवळी समाजाच्या एका व्यक्तीला साखरपुड्याच्या कार्यक्रमात बहिष्कृत करून अपमानित करण्यात आले. या समारंभाला ते उपस्थित राहातील तर कार्यक्रम होऊ देणार नाही अशी धमकीही देण्यात आली. दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये ते पंचांविरूद्ध तक्रार करण्यास गेले असता त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यांना वारंवार केस दाखल करत आहेत असेच सांगितले जात होते. परंतु अंनिसच्या पाठपुराव्यामुळे पंचाविरूद्ध सामाजिक बहिष्कार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नPoliceपोलिसCourtन्यायालयArrestअटक