शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील सिंहगड ग्रामपंचायत हद्दीत वनविभागाची कारवाई; शेतकऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 16:19 IST

कारवाईत जनावरांच्या गोठ्यासह दैनंदिन संसारोपयोगी साहित्याची मोडतोड करण्यात आली आहे

पुणे: पुणेवनविभाग अंतर्गत असलेल्या भांबुर्डां वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्याकडून सिंहगड ग्रामपंचायत हद्दीत खानापूर येथे कारवाई करण्यात आली असून २ शेतकऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. मरगळे कुटुंबियांबरोबरच अन्य शेतकऱ्यांची येथे वस्ती आहे. या कारवाईत जनावरांच्या गोठ्यासह दैनंदिन संसारोपयोगी साहित्याची मोडतोड करण्यात आली आहे. यावेळी गरिबांना कायदा दाखवला जात असल्याचा संताप संबंधित शेतकरी कुटुंबातील तरुण व महिलांनी व्यक्त केला आहे.

आज पहाटे अंधार असतानाच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनपरिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके, वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांच्यासह इतर चाळीस ते पन्नास कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने दोन्ही मरगळे बंधूंचे घर उध्वस्त केले. शासनाकडून अद्याप ये-जा करण्यासाठी रस्ता, वीज, पाणी अशी कोणतीच व्यवस्था येथे करण्यात आलेली नाही. आजूबाजूला जंगल असल्याने येथे  जंगली प्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून मरगळे बंधूंनी घरापासून दिड ते दोन किलोमीटर अंतरावर जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून लोकवस्ती जवळ जनावरांसाठी व राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात निवारा तयार केला होता. पिकवलेले धान्य व इतर घरसामान त्यांनी येथे ठेवले होते.

सायंकाळपर्यंत घेऊन जाण्याचा धमकीवजा इशारा

संध्याकाळ पर्यंत सामान घेवून जा नाहीतर गाडीत भरुन घेऊन जाणार. असे उपस्थित असणाऱ्या वन अधिकाऱ्यांनी अस्ताव्यस्त व मोडतोड करण्यात आलेले घरसामान, धान्य संध्याकाळपर्यंत घेऊन जाण्याचा धमकीवजा इशारा दिला. जर साहित्य नेले नाही तर आम्ही संध्याकाळी गाडी भरुन घेऊन जाऊ असेही मरगळे यांना सुनावले. 

''आम्ही सकाळी यायच्या आत त्यांनी जेसीबी आणून सगळं आमचं नुकसान केलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं होत कि हे काढणार आहे. पण त्यांनी काही ऐकलं नाही. धान्य, भांडीकुंडी सर्व मोडलेले आहे. चार महिन्याच प्रॉब्लेम असतो. घरापासून दिड ते दोन किलोमीटर अंतरावर जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून तात्पुरत्या स्वरूपात निवारा तयार केला होता. तसेच ग्रामपंचायतकडूनही पाणी लाईटची सोय करून दिली नाही. असे ज्ञानेश्वर धाकू मरगळे यांनी सांगितले आहे.'' "संबंधित नागरिकांना नोटीस देण्यात आली होती व त्यानंतरच कारवाई करण्यात आली आहे. काही जीवनावश्यक साहित्य आम्ही बाजूला काढून ठेवले आहे. इतर अवैध अतिक्रमणांबाबत आमची शोधमोहीम सुरू आहे. योग्य पडताळणी करुन कारवाई करण्यात येत आहे. जेथे वन कायद्यांचा भंग झाल्याचे आढळेल तेथे कारवाई होईल असे खानापूर वनपरिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके म्हणाले आहेत."

टॅग्स :sinhagad fortसिंहगड किल्लाPuneपुणेforest departmentवनविभागPoliceपोलिसFarmerशेतकरी