शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

कायदा झाला; अंमलबजावणीचे काय? पीईटी बाटली नियमाचे नियमन नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 02:23 IST

प्लॅस्टिकची बाटली घ्या आणि ग्राहकाला दोन रुपये द्या, असा नियम दुकानदारांना शासनाने घालून दिला असताना प्रत्यक्षात ग्राहक काही केल्या प्लॅस्टिकची बाटली दुकानदाराला आणून देईनात.

- युगंधर ताजणेपुणे  - प्लॅस्टिकची बाटली घ्या आणि ग्राहकाला दोन रुपये द्या, असा नियम दुकानदारांना शासनाने घालून दिला असताना प्रत्यक्षात ग्राहक काही केल्या प्लॅस्टिकची बाटली दुकानदाराला आणून देईनात. दुसरीकडे, काही विक्रेत्यांना नवीन नियमांची माहिती नसल्याने ‘आमच्यापर्यंत अजून काही माहिती नसल्याची’ गाºहाणे ते मांडत आहेत. नव्या बाटल्यांवर पुनर्खरेदी छापलेली असावी, असे असताना पूर्वीच्याच स्टॉकमधील बाटल्या अजून विकण्याचे काम सुरू आहे. या सगळ्यात मात्र प्लॅस्टिकबंदीला जो अर्धवट प्रतिसाद मिळाला, त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होत असल्याचे चित्र कायम आहे.महाराष्ट्र शासनाने २३ मार्च रोजी प्लॅस्टिक वस्तूंवर निर्बंध जारी केले. त्यापैकी पीईटी बाटल्यांवर असलेले निर्बंध अमलात आणण्यासाठी ११ जुलैची मुदत दिली होती. मात्र, त्याकडे दुकानदार, विक्रेते यांनी सोयीस्कररीत्या पाठ फिरवल्याचे दिसून येते. उत्पादक, विक्रेते व वितरक यांनी पर्यावरणासंबंधी विस्तारित जबाबदारी म्हणून पूर्वनिर्धारित पुनर्खरेदी किंमत निश्चित केलेल्या पीईटी व पीईटीई बाटल्यांच्या पुनर्चक्रण व पुनर्खरेदीसाठी ठेव व्यवस्था करणे अपेक्षित होते. हे संकलन व पुनर्चक्रण केंद्र नियम प्रकाशित होण्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत प्रस्तावित जागी कार्यान्वित करायचे होते. वापरलेली बाटली दुकानदार, विक्रेते यांनी पुनर्खरेदी करणे बंधनकारक आहे. याचबरोबर एक लिटर व त्यापेक्षा जास्त द्रव धारणक्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पीईटी व पीईटीई बाटल्यांवर ठेव व परतावा यांची किंमत १ रुपया अथवा उत्पादकाने ठरवलेली पुनर्खरेदी किंमत छापणे बंधनकारक असून एक लिटरपेक्षा कमी व २०० मिलीपेक्षा जास्त द्रव धारणक्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पीईटी व पीईटीई बाटल्यांवर ठेव व परतावा यांचे किंमत २ अथवा उत्पादकाने ठरवलेली पुनर्खरेदी किंमत छापणे सक्तीचे केले आहे. बदलत जाणाऱ्या प्लॅस्टिकबंदी धोरणाबाबत प्रतिक्रिया देताना पर्यावरणतज्ज्ञ व प्लॅस्टिक जनजागृती या विषयाचे अभ्यासक प्रा. मिलिंद पगारे म्हणाले, ‘‘नागरिक, विक्रेते, दुकानदार हे कायद्याचे पालन करावे याकरिता फारसे सजग असल्याचे दिसत नाही. साधकबाधक चर्चा व्हावी; मात्र त्यातून जो काही निर्णय समोर येईल त्याचा स्वीकार सर्वांनीच करणे बंधनकारक आहे, ही भावनाच मुळी आपल्या पचनी पडत नाही. आता तर प्रत्येक जण सोयीने आदेशाचा अर्थ लावू पाहतो, त्यातून पळवाटा शोधतो. यातून कायद्याची अंमलबजावणी होत नाही. सध्या व्यावसायिकदेखील वेगळ्या पद्धतीच्या बातम्या सोशल मीडियातून पसरवत असल्याने त्याचा नकारात्मक परिणाम ग्राहकांवर होत आहे.’’ग्राहक / विक्रेते म्हणतात...११ जुलैची मुदत संपण्याच्या आत या अटींचे पालन करणे गरजेचे होते-विक्रेत्यांपर्यंत त्यांच्या असोसिएशनकडून याविषयी कुठल्याही प्रकारच्या सूचना आलेल्या नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.- ग्राहकांना बाटली दुकानदाराकडे जमा करायची आहे, हेच माहिती नाही. तशा सूचना शासनाने प्रसिद्ध केल्या आहेत.- शासनाला कुठल्या प्रकारची प्लॅस्टिकबंदी अपेक्षित आहे? एकीकडे बंदी, दुसरीकडे नियमांमध्ये बदल; मग पुन्हा बंदी यामुळे सगळाच गोंधळ आहे.- खानपानाच्या वस्तू सोडून सरसकट प्लॅस्टिकबंदी केली, तरच काही होईल. पाण्याच्या बाटल्या एकाच मापाच्या ठेवाव्यात.- खाद्यपदार्थ साठविण्यायोग्य चांगल्या गुणवत्तेची बाटली असावी.- बिसफेनॉल अ विरहित (बीपीए फ्री) असावी.- पुनर्खरेदीसाठी ठेव व्यवस्था (बाय बँक डिपोझेटरी सिस्टीम) निर्माण करणे.- संकलन व पुनर्चक्रण केंद्र मोक्याच्या ठिकाणी कार्यान्वित करणे.- २०० मि.लि.पेक्षा कमी पेय द्रव धारण क्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांवर बंदी.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या