शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

कायदा झाला; अंमलबजावणीचे काय? पीईटी बाटली नियमाचे नियमन नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 02:23 IST

प्लॅस्टिकची बाटली घ्या आणि ग्राहकाला दोन रुपये द्या, असा नियम दुकानदारांना शासनाने घालून दिला असताना प्रत्यक्षात ग्राहक काही केल्या प्लॅस्टिकची बाटली दुकानदाराला आणून देईनात.

- युगंधर ताजणेपुणे  - प्लॅस्टिकची बाटली घ्या आणि ग्राहकाला दोन रुपये द्या, असा नियम दुकानदारांना शासनाने घालून दिला असताना प्रत्यक्षात ग्राहक काही केल्या प्लॅस्टिकची बाटली दुकानदाराला आणून देईनात. दुसरीकडे, काही विक्रेत्यांना नवीन नियमांची माहिती नसल्याने ‘आमच्यापर्यंत अजून काही माहिती नसल्याची’ गाºहाणे ते मांडत आहेत. नव्या बाटल्यांवर पुनर्खरेदी छापलेली असावी, असे असताना पूर्वीच्याच स्टॉकमधील बाटल्या अजून विकण्याचे काम सुरू आहे. या सगळ्यात मात्र प्लॅस्टिकबंदीला जो अर्धवट प्रतिसाद मिळाला, त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होत असल्याचे चित्र कायम आहे.महाराष्ट्र शासनाने २३ मार्च रोजी प्लॅस्टिक वस्तूंवर निर्बंध जारी केले. त्यापैकी पीईटी बाटल्यांवर असलेले निर्बंध अमलात आणण्यासाठी ११ जुलैची मुदत दिली होती. मात्र, त्याकडे दुकानदार, विक्रेते यांनी सोयीस्कररीत्या पाठ फिरवल्याचे दिसून येते. उत्पादक, विक्रेते व वितरक यांनी पर्यावरणासंबंधी विस्तारित जबाबदारी म्हणून पूर्वनिर्धारित पुनर्खरेदी किंमत निश्चित केलेल्या पीईटी व पीईटीई बाटल्यांच्या पुनर्चक्रण व पुनर्खरेदीसाठी ठेव व्यवस्था करणे अपेक्षित होते. हे संकलन व पुनर्चक्रण केंद्र नियम प्रकाशित होण्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत प्रस्तावित जागी कार्यान्वित करायचे होते. वापरलेली बाटली दुकानदार, विक्रेते यांनी पुनर्खरेदी करणे बंधनकारक आहे. याचबरोबर एक लिटर व त्यापेक्षा जास्त द्रव धारणक्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पीईटी व पीईटीई बाटल्यांवर ठेव व परतावा यांची किंमत १ रुपया अथवा उत्पादकाने ठरवलेली पुनर्खरेदी किंमत छापणे बंधनकारक असून एक लिटरपेक्षा कमी व २०० मिलीपेक्षा जास्त द्रव धारणक्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पीईटी व पीईटीई बाटल्यांवर ठेव व परतावा यांचे किंमत २ अथवा उत्पादकाने ठरवलेली पुनर्खरेदी किंमत छापणे सक्तीचे केले आहे. बदलत जाणाऱ्या प्लॅस्टिकबंदी धोरणाबाबत प्रतिक्रिया देताना पर्यावरणतज्ज्ञ व प्लॅस्टिक जनजागृती या विषयाचे अभ्यासक प्रा. मिलिंद पगारे म्हणाले, ‘‘नागरिक, विक्रेते, दुकानदार हे कायद्याचे पालन करावे याकरिता फारसे सजग असल्याचे दिसत नाही. साधकबाधक चर्चा व्हावी; मात्र त्यातून जो काही निर्णय समोर येईल त्याचा स्वीकार सर्वांनीच करणे बंधनकारक आहे, ही भावनाच मुळी आपल्या पचनी पडत नाही. आता तर प्रत्येक जण सोयीने आदेशाचा अर्थ लावू पाहतो, त्यातून पळवाटा शोधतो. यातून कायद्याची अंमलबजावणी होत नाही. सध्या व्यावसायिकदेखील वेगळ्या पद्धतीच्या बातम्या सोशल मीडियातून पसरवत असल्याने त्याचा नकारात्मक परिणाम ग्राहकांवर होत आहे.’’ग्राहक / विक्रेते म्हणतात...११ जुलैची मुदत संपण्याच्या आत या अटींचे पालन करणे गरजेचे होते-विक्रेत्यांपर्यंत त्यांच्या असोसिएशनकडून याविषयी कुठल्याही प्रकारच्या सूचना आलेल्या नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.- ग्राहकांना बाटली दुकानदाराकडे जमा करायची आहे, हेच माहिती नाही. तशा सूचना शासनाने प्रसिद्ध केल्या आहेत.- शासनाला कुठल्या प्रकारची प्लॅस्टिकबंदी अपेक्षित आहे? एकीकडे बंदी, दुसरीकडे नियमांमध्ये बदल; मग पुन्हा बंदी यामुळे सगळाच गोंधळ आहे.- खानपानाच्या वस्तू सोडून सरसकट प्लॅस्टिकबंदी केली, तरच काही होईल. पाण्याच्या बाटल्या एकाच मापाच्या ठेवाव्यात.- खाद्यपदार्थ साठविण्यायोग्य चांगल्या गुणवत्तेची बाटली असावी.- बिसफेनॉल अ विरहित (बीपीए फ्री) असावी.- पुनर्खरेदीसाठी ठेव व्यवस्था (बाय बँक डिपोझेटरी सिस्टीम) निर्माण करणे.- संकलन व पुनर्चक्रण केंद्र मोक्याच्या ठिकाणी कार्यान्वित करणे.- २०० मि.लि.पेक्षा कमी पेय द्रव धारण क्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांवर बंदी.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या