शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याप्रमाणे सर्व प्रार्थना स्थळांनी भोंगे उतरवावेत; भडकवणारी विधाने मात्र बेकायदेशीर-असीम सरोदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:27 IST

औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याबरोबरच भाषणाच्या शेवटी भोंग्याच्या मुद्द्याला हात घातला

पुणे : औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याबरोबरच भाषणाच्या शेवटी भोंग्याच्या मुद्द्याला हात घातला. मागील सभेत राज ठाकरे यांनी मशीदवरील भोंगे उतरवण्याबाबत ३ तारखेचा अल्टिमेटम दिला होता. कालच्या सभेत त्यांनी त्यांच्या सणांमध्ये आम्ही विश कालवणार नाही. असे म्हणत ४ तारखेपर्यंत सर्व मशीद वरील भोंगे उतरायला हवेत. अन्यथा त्यांच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावली जाईल, असा इशारा दिला आहे. तसेच पोलिसांनी लवकरात लवकर याबाबत ठोस पाऊले उचलावीत आणि भोंगे काढण्यासाठी मशिदीला सूचना द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यावर कायदेविषयक अभ्यासक असीम सरोदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. कायद्याप्रमाणे प्रार्थना स्थळांनी भोंगे उतरवले पाहिजेत. मात्र भडकवणारी विधाने ही बेकायदेशीर असल्याची टीका त्यांनी राज ठाकरेंवर केली आहे. 

सरोदे म्हणाले. मस्जिद,मंदिर,गुरुद्वारा,जैन व बौद्ध प्रार्थना स्थळे,चर्च सगळ्यांचे भोंगे उतरवले पाहिजेत. हेच आमच्या गोंगाट विरोधी मंचचे 2002 पासून म्हणणे आहे. कायदा सगळ्यांना मानवाच लागतो. सगळ्यांनी मस्जिद,मंदिरे या सगळ्यांनीच भोंगे उतरवावे हे म्हणावेच लागले. इतर भडकविणारी विधाने बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

भोंग्यांच्या भूमिकेबाबत सरोदे यांनी मागितले होते स्पष्टीकरण 

 आवाजाच्या मर्यादेवर आतापर्यंत देशातील न्यायालयात आठ महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. त्यामध्ये कार्यक्रमातील डिजे, फटाके तसेच चर्च, गुरुद्वारा, मंदिरे, मशीद, यामधील स्पीकर यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणावर प्रतिबंध लावण्यासाठी हे निर्णय दिले होते. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. एका निर्णयात न्यायालयाने शांतता क्षेत्रात ध्वनी प्रदुषण थांबवावे असं सांगितले होते. पण आतापर्यंत शांतता क्षेत्राची व्याख्याच केली नाही. न्यायालयाच्या कोणत्या निर्णयाचा दाखला देऊन मशिदीवरील भोंगे उतरावेत, अशी भूमिका घेतली याबाबत स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे असे सरोदे यांनी मागच्या वेळी सांगितले होते. 

इतर गोंगाटवेळी कोणी काही बोलत नाही 

ख्रिसमस, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, आंबेडकर जयंती, विश्वकर्मा जयंती, दत्त जन्म व जयंती, दुर्गाउत्सव, महावीर जयंती, स्वामी बसवेश्वर जयंती, गणपती उत्सव, दिवाळी, लग्न, क्रिकेटची मॅच जिंकणे अश्या अनेक वेळी 'गोंगाट' व उत्सवाच्या प्रदूषित साजरीकरण बंद करण्याबाबत कुणी बोलत नाहीत याबाबतचे अनेक ट्विटही त्यांनी केले होते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAsim Sarodeअसिम सराेदेadvocateवकिलTempleमंदिरMNSमनसे