शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
4
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
5
व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
7
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
8
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
9
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
10
बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
11
नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
12
Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
13
Aquarius Yearly Horoscope 2026: कुंभ राशीसाठी नवीन वर्ष 2026: आर्थिक चणचण संपणार! प्रवासातून भाग्योदय आणि सुखद बातम्यांचे वर्ष
14
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
15
Tiger Attack: वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
16
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
17
NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
18
दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
19
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
20
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
Daily Top 2Weekly Top 5

नियमानुसार काम म्हणजे हिटलरशाही कशी? - तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 04:22 IST

प्रवाशांच्या हितासाठी नियमानुसार काम केले, शिस्तभंगाची कारवाई केली म्हणजे हिटरलशाही आहे का? आतापर्यंत कोणत्याही नियम, रचनेशिवाय काम चालत होते. कोणतेही व्हिजन, मिशन नव्हते. अनेकांची मनमानी बंद केली. बससेवेत लक्षणीय बदल होत असून मार्गावरील बस, उत्पन्न, प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.

पुणे - प्रवाशांच्या हितासाठी नियमानुसार काम केले, शिस्तभंगाची कारवाई केली म्हणजे हिटरलशाही आहे का? आतापर्यंत कोणत्याही नियम, रचनेशिवाय काम चालत होते. कोणतेही व्हिजन, मिशन नव्हते. अनेकांची मनमानी बंद केली. बससेवेत लक्षणीय बदल होत असून मार्गावरील बस, उत्पन्न, प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. मग ही हिटलरशाही कशी़, असा सवाल पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी उपस्थित केला आहे. तसेच कोणीही काहीही म्हटले तरी यापुढील काळातही नियमानुसार काम करूनच ‘पीएमपी’ सक्षम करणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.‘पीएमपी’ची कमान मुंढे यांच्या हाती येणार असल्याने दहा महिन्यांपूर्वी ‘पीएमपी’तील कामगार संघटना तसेच प्रवासी संघटनांकडून आनंद व्यक्त करण्यात आला होता. पण मुंढे यांनी मागील दहा महिन्यांत घेतलेल्या विविध निर्णयांमुळे तसेच कर्मचाºयांवरील कारवाईच्या धडाक्यामुळे सर्व संघटना नाराज झाल्या आहेत. पास दरवाढीसह प्रवाशांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले जात नसल्याबद्दल प्रवासी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे, तर अनेक कर्मचाºयांची बडतर्फी, निलंबन बेकायदेशीरपणे केले जात असल्याचा आरोप कामगार संघटनांंकडून केला जात आहे. त्यातच काहींनी मुंढे यांच्यावर हिटलरशाहीचा आरोप केला होता. त्याला मुंढे यांनी आतापर्यंत केलेल्या सुधारणांचा आलेख मांडून सडेतोड उत्तर दिले आहे.मुंढे म्हणाले, ‘पीएमपी’चा पदभार स्वीकारला तेव्हा ‘कंपनी’ म्हणून कोणतीही रचनाच अस्तित्वात नव्हती. अधिकारी, कर्मचाºयांची उतरंड, त्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, पदोन्नती याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. कामाच्या तुलनेत अनेक कर्मचारी अतिरिक्त होते. त्यांच्या कामाच्या नियोजनात ढिसाळपणा होता. आधीचे प्रशासन हे कर्मचारीपूरक होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रशासनात अनेक बदल करावे लागले. ‘स्टाफिंग पॅटर्न’ तयार करण्यात आला. ही रचना शास्त्रीयदृष्ट्या सक्षम करण्यात आली. आस्थापना आराखडा तयार करण्यात आलेला नव्हता. हा आराखडा तयार करून भरती, पदोन्नतीचे नियम तयार करण्यात आले. विविध ५९ संवर्ग करण्यात आले असून प्रत्येकाचे ‘जॉब चार्ट’ तयार करण्यात आले आहे. प्रत्येक संवर्गाची जबाबदारी, कर्तव्य निश्चित केली आहे. त्यानुसार प्रत्येकाला काम ठरवून देण्यात आले आहे. यापूर्वी असे काहीच नव्हते.मनमानी बंदपूर्वी अनेक अधिकारी व कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करीत होते. आता कामात सुसूत्रता आणून प्रत्येकावर जबाबदारी निश्चित करण्यात आल्याने ही मनमानी बंद झाली आहे. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील ११०० बस मार्गावर आणण्यात यश मिळाले आहे. मार्गांचे सुसूत्रीकरण, आयटीएमएस यंत्रणा, नवीन मार्ग, पासचे सुसूत्रीकरण यांसह विविध बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पीएमपीचा तोटा कमी होण्याबरोबरच प्रवासीही वाढले आहेत, असे मुंढे यांनी सांगितले.आतापर्यंत कोणत्याही नियमाद्वारे काम चालत नव्हते. ते काम नियमानुसार सुरू करण्यात आले आहे. ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने अंमलबजावणी सुरू आहे. याअंतर्गत कर्मचाºयांवर होत असलेल्या कारवाया अचानक नाहीत. पूर्वी कर्मचाºयांचे रेकॉर्डच ठेवले जात नव्हते. आता रेकॉर्डनुसार कारवाई सुरू आहे. शिस्तभंग, नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई केली जात आहे. ‘पीएमपी’ ही कंपनी असून त्यानुसार काम करायचे नाही का? शिस्तभंगाची कारवाई म्हणजे हिटलरशाही आहे का? असे प्रश्न मुंढे यांनी उपस्थित केले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेPMPMLपीएमपीएमएल