शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

नियमानुसार काम म्हणजे हिटलरशाही कशी? - तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 04:22 IST

प्रवाशांच्या हितासाठी नियमानुसार काम केले, शिस्तभंगाची कारवाई केली म्हणजे हिटरलशाही आहे का? आतापर्यंत कोणत्याही नियम, रचनेशिवाय काम चालत होते. कोणतेही व्हिजन, मिशन नव्हते. अनेकांची मनमानी बंद केली. बससेवेत लक्षणीय बदल होत असून मार्गावरील बस, उत्पन्न, प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.

पुणे - प्रवाशांच्या हितासाठी नियमानुसार काम केले, शिस्तभंगाची कारवाई केली म्हणजे हिटरलशाही आहे का? आतापर्यंत कोणत्याही नियम, रचनेशिवाय काम चालत होते. कोणतेही व्हिजन, मिशन नव्हते. अनेकांची मनमानी बंद केली. बससेवेत लक्षणीय बदल होत असून मार्गावरील बस, उत्पन्न, प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. मग ही हिटलरशाही कशी़, असा सवाल पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी उपस्थित केला आहे. तसेच कोणीही काहीही म्हटले तरी यापुढील काळातही नियमानुसार काम करूनच ‘पीएमपी’ सक्षम करणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.‘पीएमपी’ची कमान मुंढे यांच्या हाती येणार असल्याने दहा महिन्यांपूर्वी ‘पीएमपी’तील कामगार संघटना तसेच प्रवासी संघटनांकडून आनंद व्यक्त करण्यात आला होता. पण मुंढे यांनी मागील दहा महिन्यांत घेतलेल्या विविध निर्णयांमुळे तसेच कर्मचाºयांवरील कारवाईच्या धडाक्यामुळे सर्व संघटना नाराज झाल्या आहेत. पास दरवाढीसह प्रवाशांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले जात नसल्याबद्दल प्रवासी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे, तर अनेक कर्मचाºयांची बडतर्फी, निलंबन बेकायदेशीरपणे केले जात असल्याचा आरोप कामगार संघटनांंकडून केला जात आहे. त्यातच काहींनी मुंढे यांच्यावर हिटलरशाहीचा आरोप केला होता. त्याला मुंढे यांनी आतापर्यंत केलेल्या सुधारणांचा आलेख मांडून सडेतोड उत्तर दिले आहे.मुंढे म्हणाले, ‘पीएमपी’चा पदभार स्वीकारला तेव्हा ‘कंपनी’ म्हणून कोणतीही रचनाच अस्तित्वात नव्हती. अधिकारी, कर्मचाºयांची उतरंड, त्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, पदोन्नती याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. कामाच्या तुलनेत अनेक कर्मचारी अतिरिक्त होते. त्यांच्या कामाच्या नियोजनात ढिसाळपणा होता. आधीचे प्रशासन हे कर्मचारीपूरक होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रशासनात अनेक बदल करावे लागले. ‘स्टाफिंग पॅटर्न’ तयार करण्यात आला. ही रचना शास्त्रीयदृष्ट्या सक्षम करण्यात आली. आस्थापना आराखडा तयार करण्यात आलेला नव्हता. हा आराखडा तयार करून भरती, पदोन्नतीचे नियम तयार करण्यात आले. विविध ५९ संवर्ग करण्यात आले असून प्रत्येकाचे ‘जॉब चार्ट’ तयार करण्यात आले आहे. प्रत्येक संवर्गाची जबाबदारी, कर्तव्य निश्चित केली आहे. त्यानुसार प्रत्येकाला काम ठरवून देण्यात आले आहे. यापूर्वी असे काहीच नव्हते.मनमानी बंदपूर्वी अनेक अधिकारी व कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करीत होते. आता कामात सुसूत्रता आणून प्रत्येकावर जबाबदारी निश्चित करण्यात आल्याने ही मनमानी बंद झाली आहे. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील ११०० बस मार्गावर आणण्यात यश मिळाले आहे. मार्गांचे सुसूत्रीकरण, आयटीएमएस यंत्रणा, नवीन मार्ग, पासचे सुसूत्रीकरण यांसह विविध बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पीएमपीचा तोटा कमी होण्याबरोबरच प्रवासीही वाढले आहेत, असे मुंढे यांनी सांगितले.आतापर्यंत कोणत्याही नियमाद्वारे काम चालत नव्हते. ते काम नियमानुसार सुरू करण्यात आले आहे. ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने अंमलबजावणी सुरू आहे. याअंतर्गत कर्मचाºयांवर होत असलेल्या कारवाया अचानक नाहीत. पूर्वी कर्मचाºयांचे रेकॉर्डच ठेवले जात नव्हते. आता रेकॉर्डनुसार कारवाई सुरू आहे. शिस्तभंग, नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई केली जात आहे. ‘पीएमपी’ ही कंपनी असून त्यानुसार काम करायचे नाही का? शिस्तभंगाची कारवाई म्हणजे हिटलरशाही आहे का? असे प्रश्न मुंढे यांनी उपस्थित केले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेPMPMLपीएमपीएमएल