शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्याचा काहीच फरक पडला नाही; पंडितांची तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 14:54 IST

राजकीय पदाधिकाऱ्यांकडून काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत असल्याबाबत खोटी माहिती दिली जात असल्याची टीका संघटनेच्या सदस्यांनी केली

पुणे: काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या सामाजिक किंवा राजकीय स्थितीत आजही कोणताही फरक पडलेला नाही, असा दावा यूथ फॉर पनून काश्मीर या संघटनेच्या वतीने करण्यात आला. सरकारजवळ या पीडित पंडितांच्या पुनर्वसनासाठी कसलीही ठोस योजना नसल्याची टीका त्यांनी केली.

संघटनेच्या काही सदस्यांनी काश्मीरचा दौरा केला. त्याविषयी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सरकार चुकीचे सांगत असल्याचे आम्हाला आढळले असे राहुल कौल याने सांगितले. त्याच्यासमवेत संघटनेचे राहुल भट, सुनील रैना अन्य सदस्य होते. कौल यांनी सांगितले की, या दौऱ्यात अनेक काश्मिरी पंडितांबरोबर संवाद साधण्यात आला. त्यांच्याकडून सरकारविषयी तीव्र नाराजीच आढळली. ३७० कलम रद्द केले असले तरी परिस्थिती मात्र पूर्वी होती तशीच आहे, असे त्यांनी सांगितले असल्याची माहिती संघटनेने पत्रकार परिषदेत दिली.

कौल म्हणाले की, पंतप्रधान पॅकेज योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेच वेतन मागील ५ महिन्यांपासून झालेले नाही. पीडित कुटुंबांच्या तेथील परंपरागत जमिनींच्या नोंदी दिल्या जात नाहीत. सरकारी अधिकारी, तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांकडून काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत असल्याबाबत खोटी माहिती दिली जात असल्याची टीका संघटनेच्या सदस्यांनी केली. संघटनेच्या या दाव्याला काही हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेJammu Kashmirजम्मू-काश्मीरAmit Shahअमित शाहCourtन्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार