लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : ‘मला लग्न करायचे नाही,’ असा मेसेज करून नवरदेवाने लग्नाच्या दिवशीच विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी ही घटना घडली. सूरज राजेंद्र रायकर (२८, रा.माळीनगर, तळेगाव) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सूरजचे मंगळवारी लग्न होते. त्याने मामाला मेसेज केला आणि तो पहाटेच घराबाहेर पडला. सर्वत्र शोधाशोध केली असता परिसरातील विहिरीजवळ त्याची दुचाकी, तसेच मोबाइल आढळला. त्यावेळी त्याने आत्महत्या केल्याची बाब समोर आली. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.