शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Pune Crime: विवाह करून तरुणाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 13:00 IST

नारायणगाव ( पुणे ) : जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी आणि खोडद येथील गरजू विवाह इच्छुक दोन तरुणांशी नावे बदलून विवाह करून ...

नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी आणि खोडद येथील गरजू विवाह इच्छुक दोन तरुणांशी नावे बदलून विवाह करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला नारायणगाव पोलिसांनी नाशिकमधून गजाआड केली असल्याची माहिती जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर व सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

जयश्री काळू घोटाळे (वय ३५ ) (रा. मुरंबी शिरजगाव ता. त्र्यंबकेश्वर नाशिक) मीरा बंसी विसलकर (वय ३९) व तुकाराम भाऊराव मांगते (वय २३) (रा. अंबुजा वाडी, इगतपुरी, घोटी, नाशिक), बाळू भिकाजी काळे (वय ४६ ) (रा. बोटा तालुका संगमनेर), शिवाजी शंकर कुरकुटे (वय ६४ ) (रा. कुरकुटेवाडी, बोटा, संगमनेर), बाळू गुलाब सरवदे (वय ४१) (रा. गुंजाळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद सागर प्रभाकर वायकर (वय ३३, रा. गुंजाळवाडी, आर्वी, ता. जुन्नर) यांनी १ जून २०२३ला नारायणगाव पोलिस स्टेशनला दिली होती.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मे २०२३ या महिन्यात गुंजाळवाडी येथील सागर वायकर यांचा विवाह बाळू सरवदे व मीरा विसलकर यांच्या यांच्या मध्यस्थीने संध्या बदादे (वय २३, रा. विठ्ठल नगर, पोस्ट निळवंडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) हिच्याशी जुन्नर येथे झाला. त्यानंतर १७ मे २०२३ला संध्याची मावशी मीरा हिने यांनी संध्याला घेऊन जाण्यासाठी चार ते पाच लोकांना घेऊन घरी आल्या व तिला आमच्या सोबत घेऊन जायचे असे सांगितले असता वायकर यांनी नकार दिला. मात्र मीरा यांनी वकिलाची धमकी देऊन संध्याला त्या ठिकाणाहून घेऊन गेले व दोन दिवसांनंतर पाठवून देते असे सांगितले. परंतु दोन दिवसांनीही मीरा विसलकर यांनी पाठवते असे कारण सांगितले. २८ मे रोजी वायकर यांनी मीराला फोन केला असता मीरा यांनी सांगितलं की संध्या कुठेतरी पळून गेली आहे. तुम्हाला मी दुसरी मुलगी देते. तुम्ही कुठेही गाजावाजा नका व पोलिसात जाऊ नका असे सांगितले. यावरून वायकर यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तसेच खोडद येथील हरीश बाजीराव गायकवाड या तरुणाला मीरा विसलकर व शिवाजी कुरकुटे यांनी अश्विनी रामदास गवारी (वय २३, रा. मु. मोगरे, पो. वाघिरे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक) या मुलीबरोबर २३ मार्च २०२३ ला आळंदी येथील इंद्रायणी मंगल कार्यालय येथे लग्न लावून दिले. त्यानंतर गायकवाड यांची ही फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी तपास केला असता वायकर यांची पत्नी संध्या विलास बदादे व हरीश गायकवाड यांची पत्नी अश्विनी रामदास गवारी या दोन्हीही महिला एकच असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तालुक्यातील अविवाहित तरुणाशी मध्यस्थींच्या मार्फत एकाच मुलीने काही महिन्यांच्या अंतरावर लग्न केले होते. लग्नानंतर मुलगी चार ते पाच दिवस नवरदेवाच्या घरी राहून लग्नात बनवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम व आईवडील आजारी असल्याचे खोटे सांगून लाखो रुपये घेऊन जात असे. त्यानंतर फोन बंद करून पुन्हा येत नसे. वायकर व गायकवाड या तरुणांची प्रत्येकी दोन ते अडीच लाख रुपयांचे फसवणूक झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने त्याचाच गैरफायदा घेऊन विवाहासाठी अडलेल्या इच्छुकाबरोबर मुलीचे लग्न लावून द्यायचे आणि लग्नाच्या चार ते पाच दिवसांनंतर विवाहित मुलाकडून लग्नात बनविलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पळून जायचे अशा प्रकारची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. आजपर्यंत या टोळीने वीस ते बावीस तरुणांबरोबर अशा पद्धतीने लग्न लावून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे लग्न जमवताना नातेगोते, पाहुणे मित्र व घरदार पाहूनच खात्री झाल्यानंतर लग्न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक विनोद धुर्वे व पोलिस कर्मचारी यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेnarayangaonनारायणगावCrime Newsगुन्हेगारी