शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: विवाह करून तरुणाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 13:00 IST

नारायणगाव ( पुणे ) : जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी आणि खोडद येथील गरजू विवाह इच्छुक दोन तरुणांशी नावे बदलून विवाह करून ...

नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी आणि खोडद येथील गरजू विवाह इच्छुक दोन तरुणांशी नावे बदलून विवाह करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला नारायणगाव पोलिसांनी नाशिकमधून गजाआड केली असल्याची माहिती जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर व सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

जयश्री काळू घोटाळे (वय ३५ ) (रा. मुरंबी शिरजगाव ता. त्र्यंबकेश्वर नाशिक) मीरा बंसी विसलकर (वय ३९) व तुकाराम भाऊराव मांगते (वय २३) (रा. अंबुजा वाडी, इगतपुरी, घोटी, नाशिक), बाळू भिकाजी काळे (वय ४६ ) (रा. बोटा तालुका संगमनेर), शिवाजी शंकर कुरकुटे (वय ६४ ) (रा. कुरकुटेवाडी, बोटा, संगमनेर), बाळू गुलाब सरवदे (वय ४१) (रा. गुंजाळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद सागर प्रभाकर वायकर (वय ३३, रा. गुंजाळवाडी, आर्वी, ता. जुन्नर) यांनी १ जून २०२३ला नारायणगाव पोलिस स्टेशनला दिली होती.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मे २०२३ या महिन्यात गुंजाळवाडी येथील सागर वायकर यांचा विवाह बाळू सरवदे व मीरा विसलकर यांच्या यांच्या मध्यस्थीने संध्या बदादे (वय २३, रा. विठ्ठल नगर, पोस्ट निळवंडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) हिच्याशी जुन्नर येथे झाला. त्यानंतर १७ मे २०२३ला संध्याची मावशी मीरा हिने यांनी संध्याला घेऊन जाण्यासाठी चार ते पाच लोकांना घेऊन घरी आल्या व तिला आमच्या सोबत घेऊन जायचे असे सांगितले असता वायकर यांनी नकार दिला. मात्र मीरा यांनी वकिलाची धमकी देऊन संध्याला त्या ठिकाणाहून घेऊन गेले व दोन दिवसांनंतर पाठवून देते असे सांगितले. परंतु दोन दिवसांनीही मीरा विसलकर यांनी पाठवते असे कारण सांगितले. २८ मे रोजी वायकर यांनी मीराला फोन केला असता मीरा यांनी सांगितलं की संध्या कुठेतरी पळून गेली आहे. तुम्हाला मी दुसरी मुलगी देते. तुम्ही कुठेही गाजावाजा नका व पोलिसात जाऊ नका असे सांगितले. यावरून वायकर यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तसेच खोडद येथील हरीश बाजीराव गायकवाड या तरुणाला मीरा विसलकर व शिवाजी कुरकुटे यांनी अश्विनी रामदास गवारी (वय २३, रा. मु. मोगरे, पो. वाघिरे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक) या मुलीबरोबर २३ मार्च २०२३ ला आळंदी येथील इंद्रायणी मंगल कार्यालय येथे लग्न लावून दिले. त्यानंतर गायकवाड यांची ही फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी तपास केला असता वायकर यांची पत्नी संध्या विलास बदादे व हरीश गायकवाड यांची पत्नी अश्विनी रामदास गवारी या दोन्हीही महिला एकच असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तालुक्यातील अविवाहित तरुणाशी मध्यस्थींच्या मार्फत एकाच मुलीने काही महिन्यांच्या अंतरावर लग्न केले होते. लग्नानंतर मुलगी चार ते पाच दिवस नवरदेवाच्या घरी राहून लग्नात बनवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम व आईवडील आजारी असल्याचे खोटे सांगून लाखो रुपये घेऊन जात असे. त्यानंतर फोन बंद करून पुन्हा येत नसे. वायकर व गायकवाड या तरुणांची प्रत्येकी दोन ते अडीच लाख रुपयांचे फसवणूक झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने त्याचाच गैरफायदा घेऊन विवाहासाठी अडलेल्या इच्छुकाबरोबर मुलीचे लग्न लावून द्यायचे आणि लग्नाच्या चार ते पाच दिवसांनंतर विवाहित मुलाकडून लग्नात बनविलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पळून जायचे अशा प्रकारची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. आजपर्यंत या टोळीने वीस ते बावीस तरुणांबरोबर अशा पद्धतीने लग्न लावून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे लग्न जमवताना नातेगोते, पाहुणे मित्र व घरदार पाहूनच खात्री झाल्यानंतर लग्न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक विनोद धुर्वे व पोलिस कर्मचारी यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेnarayangaonनारायणगावCrime Newsगुन्हेगारी