शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

आळंदीत पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 20:03 IST

आळंदी शहरात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे

आळंदी : आळंदी शहरात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास पाचशे रुपये दंड आकाराला जाणार आहे. तसेच यावर आळा घालण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने नळजोड बंद करणेकामी फिरते पथक स्थापन केले असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली आहे.                   आळंदी शहरात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. मात्र शहरात उपलब्ध पिण्याच्या पाण्याचा अपव्ययही सुरू आहे. अनेकजण पिण्याच्या पाण्याने रस्ते धुणे, गाड्या धुणे, पाण्याची टाकी भरुन वाहती सोडणे असे प्रकार निदर्शनास येत आहेत. याबाबत नगरपरिषद कार्यालयास वारंवार तक्रारीही प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने आळंदी नगरपरिषदेने पाणी अपव्ययाची गंभीर दखल घेत १० ऑक्टोबरपासुन पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांना प्रथम दर्शनी लेखी नोटीस व पुन्हा सापडलेस रक्कम पाचशे रुपये दंड वसूल केला जाणार आहे. शहरात नळजोड बंद करणेकामी फिरते पथक स्थापन केले आहे.                 दोन दिवसात शहरातील १४ नागरिकांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र सदर मालमत्ताधारक पुन्हा पाण्याचा अपव्यय करताना आढळलेस नळजोड बंद करणेची कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अपव्यय टाळावा असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीWaterपाणीDamधरण