शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

नाझरे धरणातून 85 हजार क्युसेक्सचा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 10:16 IST

नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी झाल्यामुळे नाझरे धरणातून 85 हजार क्युसेक्स एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी झाल्यामुळे नाझरे धरणातून 85 हजार क्युसेक्स विसर्ग.कऱ्हा नदीच्या लगतची सर्व गावे व बारामती शहरात नदीलगत सर्व ठिकाणी रेड अलर्ट.मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असल्याने संपूर्ण नाझरे गावातील नदीकाठच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

बाळासाहेब काळे, पुरंदर

जेजुरी - नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी झाल्यामुळे नाझरे धरणातून 85 हजार क्युसेक्स एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे कऱ्हा नदीच्या लगतची सर्व गावे व बारामती शहरात नदीलगत सर्व ठिकाणी रेड अलर्ट देण्यात येत आहे . सर्व नागरिकांनी व प्रशासकीय यंत्रणांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहावे. तरी सर्व प्रशासकीय यंत्रणाना याद्वारे रेड अलर्ट देण्यात येत आहे.

मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असल्याने संपूर्ण नाझरे गावातील नदीकाठच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.  नाझरे जलाशयातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असल्याने प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. जलाशयातील विसर्ग आता कमी करण्यात आला आहे. धरणाची साठवण क्षमता आणि नदी पात्रातून येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरण फुटू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने अशी अनुचित घटना घडली नाही.

पुरंदर तालुक्यामध्ये मध्यरात्री झालेल्या ढगफुटीचा फटका बारामती तालुक्याला बसला. पुरंधर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीला 50 वर्षात प्रथमच महापूर आला आहे. पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या अनेक कुटुंबांना वेळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. नदीकाठच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. तसेच हजारो विहिरी पाण्याखाली गेल्या आहेत. तालुक्यातील 15 हजार, बारामतीच्या 7 हजार 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

कऱ्हा नदीकाठी असणाऱ्या आंबी बु, आंबी खुर्द, मोरगाव, तरडोली, माळवाडी, बाबुर्डी,  जळगावकडे पठार, जळगाव सुपे आदी गावांमधील नदीकाठच्या नागरीकांना हलविण्यात आले आहे. पुरंदरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री दीड वाजता पाण्याचा मोठा विसर्ग नाझरे धरणातून सुरू करण्यात आला. तत्पूर्वी प्रशासनाने रिक्षातून भोंगा लावून पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील यांनी नदीकाठच्या गावांना भेटी दिल्या. रात्रीपासूनच मोरगावच्या मुख्य चौकातून सुपेकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली. नदीकाठची घरे पाण्याखाली गेली आहेत. अनेक नागरिकांनी स्वतः हून स्थलांतर केले.

 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीJejuriजेजुरीDamधरणRainपाऊस