शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Video: "EWS आरक्षणातील १० पैकी ८ टक्के लाभ मराठा समाजाने घेतला"; अजित पवारांना घेराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 11:09 IST

अजित पवार रविवारी बारामती दौऱ्यावर होते, त्यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानंतर त्यांनी बारामती तालुक्यातील पणदरे येथे सभा घेतली

पुणे - राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपुष्टात येत आहे. त्यातच, जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची भूमिका जाहीर केली. त्यानुसार, २५ ऑक्टोबरपासून ते पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी सकल मराठा समाज आणि जरांगे पाटील यांच्यावतीने करण्यात येत आहे. त्यातच, बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा समाज बांधवांनी घेराव घातला होता. यावेळी, अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. 

अजित पवार रविवारी बारामती दौऱ्यावर होते, त्यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानंतर त्यांनी बारामती तालुक्यातील पणदरे येथे सभा घेतली. या सभेनंतर मराठा समाजाच्या युवकांनी अजित पवारांना घेराव घातला. यावेळी मराठा युवकांनी आरक्षणाबाबत तुमची वैयक्तिक भूमिका काय असा प्रश्न अजित पवारांना विचारला होता. त्यावेळी, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लगता आरक्षण दिले जाईल ही सरकारची भूमिका आहे. वेगवेगळ्या घटंकाबरोबर मुख्यमंत्री यांनी बैठक घेतली आहे. त्यामध्ये  माहिती घेतली असता, EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील १० पैकी ८ टक्के लोक हे घेत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. 

अजित पवार यांनी येथील सभेत बोलतानाही मराठा आरक्षणावर भाष्य केलं. वेळ मारून नेण्यासाठी काहीही करणारं नाही. कायद्याच्या कसोटीवर खरं उतरणारे आरक्षण देणार असून तसे प्रयत्न सुरू असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. मी देखील मराठा समाजात जन्माला आलो आहे. अजित पवारांच्या मुलांना आरक्षणाची गरज नाही. पण ज्यांना गरज आहे त्यांना मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडताना जर एकाला आरक्षण देताना दुसऱ्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार असेल तर, ते शक्य होणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. 

२५ ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषण

मराठा आरक्षणासाठी शासनाला दिलेली मुदत संपली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आंदोलनाची दिशा काय असेल, याची माहिती देण्यासाठी मनोजर जरांगे पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सरकारने घेतलेल्या मुदतीत मराठा समाजाला सरसकट आरक्षण जाहीर केले नाही, तर २५ तारखेपासून आपण अन्नपाणी त्याग करून आमरण उपोषणास पुन्हा सुरुवात करणार आहोत. या कालावधीत उपचारही घेतले जाणार नाहीत. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कायद्याच्या पदावर बसलेल्या कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ दिले जाणार नाही. आरक्षण घेऊन आले, तरच गावाची शिव ओलांडू देणार आहोत.

सरकार टिकणारे आरक्षण देणार

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या भावांनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक आवाहन करतानाच सरकार कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षणBaramatiबारामतीreservationआरक्षण