शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
4
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
5
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
6
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
7
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
8
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
9
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
10
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
11
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
12
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
13
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
14
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
15
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
16
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
17
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
18
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
19
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
20
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या

राज्यात ७८ टक्के पेरण्या पूर्ण; सोयाबीन, कपाशी १०० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 06:25 IST

खरीपाचे सरासरी क्षेत्र १४२.०२ लाख हेक्टर असून, १ कोटी ११ लाख ४८ हजार ४५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गेल्या चार दिवसांपासून राज्यात सर्वत्र होत असलेल्या पावसाने खरिपाच्या पेरण्या मार्गी लागल्या असून, आतापर्यंत १ कोटी ११ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ७८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीनची गेल्या वर्षाच्या तुलनेत १०४ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. कपाशीचीही लागवड ३९ लाख ५९ हजार हेक्टरवर अर्थात १०० टक्के झाली आहे. 

खरीपाचे सरासरी क्षेत्र १४२.०२ लाख हेक्टर असून, १ कोटी ११ लाख ४८ हजार ४५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मुगाची पेरणी ३५ टक्केच म्हणजे १ लाख ३८ हजार ४९९ हेक्टरवर झाली आहे. उडीद पिकाची १ लाख ६० हजार ४३८ हेक्टरवर पेरणी झाली असून, ती सरासरी क्षेत्राच्या ४३ टक्के आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ जुलैपर्यंत राज्यात पाऊस राहील. त्यानंतर उर्वरित पेरण्या पूर्ण होतील, अशी माहिती कृषी आयुक्त  सुनील चव्हाण यांनी दिली.

तब्बल ४३ लाख हेक्टरवर सोयाबीन

n राज्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनखाली असून, सरासरी ४१ लाख ४९ हजार ९१२ हेक्टरवर पेरणी केली जाते. गेल्यावर्षी ४३ लाख २० हजार २७७ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र, १०० टक्के अर्थात ४३ लाख ४ हजार १७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. n कपाशीची आतापर्यंत ३९ लाख ५९ हजार १६१ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी हेच क्षेत्र ३९ लाख ७८ हजार ५६६ हेक्टर इतके होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत १०० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

भात लागवडीला वेगराज्यात कोकण, तसेच घाट परिसरातील पुणे, नाशिक, कोल्हापूर व पूर्व विदर्भात चांगला पाऊस झाल्याने भाताच्या पुनर्लागवडीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. राज्यात भाताचे सरासरी पेरणी क्षेत्र १५ लाख ८ हजार ३७४ हेक्टर असून, आतापर्यंत ५ लाख १७ हजार ४१ हेक्टरवर लागवड झाली आहे. सरासरीच्या ही लागवड ३४ टक्के, तर गेल्यावर्षीच्या तुलनेत ८३ टक्के आहे.

सांगली, कोल्हापुरात सर्वांत कमी पाऊसकोकण विभागात सरासरीच्या ९०.६ टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल नागपूर  ८८.५ टक्के, पुणे ४३.३, नाशिक ६७.६, अमरावती ७४.५, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ७१.२ टक्के पाऊस झाला आहे. सर्वांत कमी पाऊस सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात ३७ टक्के, तर सर्वाधिक पालघरमध्ये १२६ टक्के झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMumbaiमुंबईRainपाऊसPuneपुणे