शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जिल्ह्यातील आणीबाणीच्या कैद्यांना मिळणार ७६ लाख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 23:00 IST

देशात १९७५ ते १९७७ या कालावधीत आणीबाणी लागू केली होती. व्यक्तीस्वातंत्र्य आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच झाल्याच्या विरोधात देशभरातील लाखो नागरिकांनी आंदोलन केले.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाची माहिती : ४९८ पैकी, ७६ जणांचे अर्ज मंजूर या निवृत्ती वेतनापोटी वर्षाला ७६ लाख ५० हजार रुपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार

पुणे : आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींना केंद्र सरकारने स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ४९८ जणांनी अर्ज केले असून, त्यापैकी ७६ जणांच्या अर्जाला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या निवृत्ती वेतनापोटी वर्षाला ७६ लाख ५० हजार रुपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे. देशात १९७५ ते १९७७ या कालावधीत आणीबाणी लागू केली होती. व्यक्तीस्वातंत्र्य आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच झाल्याच्या विरोधात देशभरातील लाखो नागरिकांनी आंदोलन केले. अनेकांना मेंटनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी अ‍ॅक्ट (मिसा) अंतर्गत अटक करुन, तुरुंगात धाडण्यात आले. केंद्र सरकारने या कालावधीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींना अथवा त्यांच्या वारसांना स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणेच मानधन जाहीर केले आहे. त्यासाठी १ महिना अथवा त्या पेक्षा अधिक कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा १० हजार, त्या पेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना ५ हजार रुपये देण्यात येईल. तुरुंगवास पत्करलेली व्यक्ती हयात नसल्यास, पतीस अथवा पत्नीस जाहीर रक्कमेच्या निम्मी रक्कम दिली जाते. केंद्र सरकारने या योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन केले होते. तसेच, त्यासाठी कोणत्या तुरुंगामध्ये स्थानबद्ध होता याची माहितीही द्यावी लागते. जिल्ह्यातील ४९८ नागरिकांचे अर्ज १५ फेब्रुवारी २०१९ अखेरीस जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यापैकी ७६ अर्ज मंजूर झाले आहेत. तर, ५ व्यक्तींच्या पत्नीला वारस म्हणून मानधनाची रक्कम दिली जाईल. या अर्जदारांनी येरवडा आणि अहमदनगर येथील विसापूरच्या कारागृहात तुरुंगवास पत्करला होता. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती मिळविली आहे. मंजूर झालेल्या ७६ अर्जदारांपैकी ७१ अर्जदार हयात आहेत. त्यातील ५२ जणांना दरमहा १० हजार, १९ जणांना ५ हजार रुपयांची रक्कम मिळेल. तर, वारस असलेल्या चार जणांना प्रत्येकी ५ आणि एकास अडीच हजार रुपये मिळतील. त्या नुसार दरमहा ६ लाख ३७ हजार ५०० रुपये जिल्ह्यात वितरीत करण्यात येतील. 

टॅग्स :Puneपुणेjailतुरुंग