शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

'मोदी सरकारने ७ वर्षात महागाई वाढवण्याबरोबरच जनसामान्यांची फसवणूकही केली', काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 18:48 IST

महाराष्ट्र काँग्रेस कमिटी आयोजित महागाईच्या विरोधात जनजागरण यात्रा ही पुणे जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे

बारामती : कोरोना काळामध्ये महाविकासआघाडी सरकारने चांगले काम केले. मात्र मोदी सरकारने आपल्या लोकांचे लसीकरण पूर्ण होण्याआधी जगाची वाहवा मिळवण्यासाठी आमच्या हक्काच्या लसी दुसऱ्या देशांना दिल्या. थांबवण्याचे काम राहुल गांधी यांनी केले. नाहीतर कोणाचेच लसीकरण झाले नसते. जनसामान्यांसाठी काम करण्याची वृत्ती कोणाची आहे हे आता लोकांनी समजून घेतले पाहिजे. सात वर्षांमध्ये भाव वाढ तर झालीच मात्र फसवणूक केली असल्याचा आरोप इंदापूरातून काँग्रेसने केला आहे. 

महाराष्ट्र काँग्रेस कमिटी आयोजित महागाईच्या विरोधात जनजागरण यात्रा ही पुणे जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे. शुक्रवारी इंदापूर येथील संविधान चौकापासून जनजागरण यात्रा सुरू झाली. त्यानंतर इंदापूर शहरांमधून ही यात्रा मुख्य बाजारपेठेत जाऊन पुढे नगरपालिकेच्या प्रांगणात स्थिरावली. यावेळी झालेल्या सभेत काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्ह्या सहप्रभारी उत्कर्षा रूपवते बोलत होत्या.

रूपवते म्हणाल्या, काँग्रेस पक्ष हा नेहमीच जनसामान्यांच्या बाजूने उभा राहणारा पक्ष आहे. काँग्रेसने अनेक योजना राबवल्या. निराधार महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना राबवली,  ही योजना आज अद्यापि सुरू आहे. गरजू व्यक्तींसाठी रेशन द्वारे भरडधान्य योजना काँग्रेस पक्षाने सुरू केल्या. मात्र देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ही योजना बंद झाली. ही योजना पुन्हा सुरू करण्याची खटपट महाविकास आघाडी सरकार करत आहे. उज्वला फक्त नावाला उज्वला आहे. त्याखाली सर्व अंधार आहे. ना शेतमालाला भाव, ना कोणत्या सोयी सुविधा पद्धतीचा गलथान कारभार सध्या सुरू आहे. त्याच्या विरोधात जनजागरण झालं पाहिजे,  म्हणून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आज गावोगावी फिरत आहे. 

पंतप्रधान मोदी यांना इंदापूरच्या चौकात बोलवायचे का? 

पंतप्रधान मोदी म्हणाले होते, 'अच्छे दिन आयेंगे मोदीजी को लायेंगे' पंधरा लाख रुपयांचे आमिष दिलं. उलट नोटबंदी करून आमच्या घरातील गरजेसाठी ठेवलेले पैसे काढून बँकेत भरायला लावले. सामान्य नागरिक नोटा बदलण्यासाठी बँकेच्या समोर उभी राहिली. त्यामध्ये अनेकांचा बळी गेला, याचा हिशोब कोण देणार? पंतप्रधान मोदी म्हणाले होते, मला पन्नास दिवस द्या मी सर्व व्यवस्थित करतो, नाही तर कोणत्याही चौकात मला जाळून टाका. हे मोदींचे शब्द आहेत. त्यामुळे आता इंदापूरच्या चौकात मोदींना बोलवायचं का? असाही सवाल यावेळी रूपवते यांनी उपस्थित केला.

टॅग्स :BaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNarendra Modiनरेंद्र मोदी